शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

वैद्यकीय आस्थापना कायदा लवकरच; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 06:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  मुंबई : राज्यात येत्या तीन महिन्यांत डॉक्टरांशी चर्चा करूनच सर्वसमावेशक वैद्यकीय आस्थापना कायदा लागू करण्यात येईल. ...

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात येत्या तीन महिन्यांत डॉक्टरांशी चर्चा करूनच सर्वसमावेशक वैद्यकीय आस्थापना कायदा लागू करण्यात येईल. महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्याने हा कायदा अमलात आणावा, यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवियादेखील आग्रही आहेत. त्यामुळे लवकरच तज्ज्ञ समितीचा अहवाल घेऊन त्यानुसार या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याणमंत्री राजेश टोपे यांनी ‘लोकमत वेलनेस मेन्टाॅर पुरस्कार सोहळ्या’त गुरुवारी दिली. 

टोपे म्हणाले, वैद्यकीय आस्थापना कायद्याविषयी अजूनही वैद्यकीय वर्तुळात मतमतांतरे आहेत. त्यामुळे हा कायदा आणताना यात वैद्यकीय क्षेत्रातील सर्व घटकांची मते आणि विचार जाणून घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. उपचार शुल्क, रुग्णालयाची जागा, तेथील मनुष्यबळ, चाचण्यांच्या सेवा, औषधांचे प्रिस्क्रिप्शन कायद्याच्या चौकटीत येणार आहे. परिणामी, कोणत्याही वैद्यकीय शाखा किंवा घटकावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. 

खासगी क्षेत्राच्या अडचणी जाणून घेणार कोरोना काळात ज्याप्रमाणे सार्वजनिक आणि खासगी वैद्यकीय सेवा क्षेत्रांनी मिळून योगदान दिले. त्याप्रमाणे, येत्या काळात खासगी वैद्यकीय सेवा क्षेत्राकडे दुर्लक्ष न करता त्यांच्याही अडचणी जाणून घेण्यात येणार आहेत, असेही टोपे यांनी सांगितले.

जन आरोग्य योजनेचे बळकटीकरणमहात्मा फुले जन आरोग्य योजनेची आणखी प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक बदल करण्यात येणार आहे. या योजनेचे विमा कवच दीड लाखाहून अधिक करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे टोपे यांनी अधोरेखित केले, तसेच धर्मादाय रुग्णालयांना या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक बदल करून या योजनेसाठी किमान तीस टक्के खाटा उपलब्ध करून देण्यात येतील. योजनेत आणखी काही आजारांचा समावेश करण्याबाबत विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.    

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपे