शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

दुधावरील ‘माया’ आटली; दूध प्रकल्पासाठी तुटपुंजा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 07:15 IST

२५ लाख दूध उत्पादकांसाठी अडीच वर्षांत अवघा ४३.७२ कोटी

- विशाल शिर्केपुणे : शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादन हा महत्त्वाचा पूरक उद्योग मानला जातो; मात्र केंद्र सरकारच या उद्योगाला पुरेसा ‘भाव’ देत नसल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अडीच वर्षांत राज्यातील शेतकºयांना दूध उत्पादन आणि शितीकरण प्रकल्पासाठी ५८.६३ कोटी रुपयांपैकी अवघ्या ४३ कोटी ७२ लाख ४५ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला योग्य भाव मिळावा, यासाठी नुकतेच राज्यव्यापी आंदोलन केले. त्यांच्या या मागणीची दखल घेत राज्य सरकारने लिटरमागे ५ रुपये अनुदान देण्याची घोषणाही केली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्यातील दूध क्षेत्राला चालना देण्यासाठी किती निधी दिला जातो, याचा शोध घेतला असता ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.केंद्र सरकार नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चरल अ‍ॅण्ड रुरल डेव्हलपमेंट अर्थात, नाबार्डच्या माध्यमातून कृषी क्षेत्रासाठी निधी उपलब्ध करून देत असते. डेअरी उद्यम विकास योजनेद्वारे (डीईडीएस) नाबार्ड दुग्ध विकासासंदर्भात योजना राबविते. त्यात गाई, म्हशी, वासरू पालन याचबरोबर दूध शितीकरण आणि इतर काही यंत्रांसाठी अनुदान दिले जाते. या सर्वांसाठी मिळून अवघे साडेचौदा कोटी रुपये प्रतिवर्षी दिले जात आहेत. राज्यात सुमारे २५ लाख दूध उत्पादक शेतकरी असून, सुमारे १ कोटी ४० लाख लिटर दूध संकलन प्रतिदिन होते. यातील चाळीस टक्के दूध द्रवस्वरूपात वापरले जाते. तर, इतर दुधावर प्रक्रिया होते. म्हणजेच दुधाचा मोठा भाग हा प्रक्रियेसाठी वापरला जातो. असे असतानाही दूध प्रक्रियेसाठी निधी दिला जात नाही. तर, दूध शितीकरणासाठी अत्यल्प निधी दिला जात आहे. केंद्र सरकारने २०१६-१७ मध्ये साडेसात आणि २०१८-१९ मध्ये साडेसोळा कोटी रुपयांचा निधी दिला आहे. तर, २०१७-१८ मध्ये ३४ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी दुधासाठी दिला आहे. या वर्षी पूर्वीच्या प्रलंबित प्रकरणांनादेखील निधी देण्यात आल्याने रक्कम अधिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.दूधच नव्हे तर एकूणच कृषी क्षेत्रासाठी केंद्र सरकारने गेल्या चार वर्षांत फारसा निधी उपलब्ध करून दिलेला नाही. कृषीसाठी आवश्यक असणाºया गोदामांसाठी आणि शितीकरण प्रकल्पासाठी गेल्या पाच वर्षांत नाबार्डच्या माध्यमातून निधी देण्यात आलेला नाही. त्याचा परिणाम बाजारपेठेवर होत आहे. कृषी क्षेत्रासाठीच्या जवळपास सगळ्याच चांगल्या योजना थांबविण्यात आल्या आहेत. अशीस्थिती असेल तर शेतकºयांना उत्पादनखर्चाच्या दुप्पट भाव कसा देणार?- राजू शेट्टी,खासदार व अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना 

टॅग्स :milkदूधMilk Supplyदूध पुरवठाRaju Shettyराजू शेट्टी