शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचे कमाल तापमान ३९ अंशांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 06:17 IST

राजकीय वातावरणाचा पारा चढत असतानाच राज्यातील शहरांच्या कमाल तापमानाचा पाराही वाढत आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीची धामधूम देशभरात सर्वत्र सुरू असतानाच राजकीय पक्षांकडून एकमेकांवर होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय वातावरणाचा पारा चढत असतानाच राज्यातील शहरांच्या कमाल तापमानाचा पाराही वाढत आहे. महत्त्वाचे म्हणजे बुधवारी तब्बल सात शहरांचे कमाल तापमान ३९ अंश व त्याहून अधिक नोंदविण्यात आले.समुद्र जवळ असलेल्या मुंबईचे कमाल तापमान मात्र ३० अंशावर स्थिर आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश गुरुवारसह शुक्रवारी मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३१, २१ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला.१४ मार्च रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.१५ मार्च रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.१६ मार्च रोजी मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.१७ मार्च रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.राज्यातील शहरांचे बुधवारचे कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये.अकोला ३९, अमरावती ३९, औरंगाबाद ३५.२, बीड ३८, चंद्रपूर ३९.४, गोंदिया ३५.६, जळगाव ३५.२, जेऊर ३७, कोल्हापूर ३६, मालेगाव ३७.२, मुंबई ३०.६, नागपूर ३८.५, नांदेड ३९.५, परभणी ३९.४, पुणे ३५.६, सांगली ३७, सातारा ३६.३, सोलापूर ३८.९, वर्धा ३९, यवतमाळ ३९.