शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

माउलींची पालखी सोलापूर जिल्ह्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 05:43 IST

विठुरायाच्या भेटीने आतुर होऊन पायी निघालेल्या लक्षावधी वैष्णवांचा मेळा मंगळवारी सकाळी सोलापूर जिल्ह्यात पोहोचला.

धर्मपुरी (जि. सोलापूर) : विठुरायाच्या भेटीने आतुर होऊन पायी निघालेल्या लक्षावधी वैष्णवांचा मेळा मंगळवारी सकाळी सोलापूर जिल्ह्यात पोहोचला. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा धर्मपुरी कालव्यावर पोहोचल्यावर जिल्हा प्रशासनाने केलेले जंगी स्वागत, बंदोबस्त व सुव्यवस्थेमुळे वारकरी भारावले. पालखी सोहळ्याचा नातेपुते येथे मुक्काम आहे.सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवरील धर्मपुरी गावाजवळील कालव्यालगत प्रशासनाच्या वतीने शामियाना उभारण्यात आला होता. सकाळी संत ज्ञानेश्वर माऊलींचा नगारा पोहोचला. त्यापाठोपाठ माऊलींचे अश्व पोहोचले. रथापुढे चालणाऱ्या मानाच्या २७ दिंड्यांनंतर माऊलींचा रथ पोहोचला.सकाळी ६ वाजता बरड तळावरील मुक्कामानंतर सोहळा नातेपुतेकडे मार्गस्थ झाला. फलटण ते बरड हा संपूर्ण प्रवासही पावसाच्या धारा झेलतच झाला होता. तरीही वारकºयांचा उत्साह कायम होता. बरडहून प्रस्थानानंतर साधूबुवांचा ओढा येथे परंपरेनुसार सकाळचा विसावा झाला. त्यानंतर सोहळा सकाळी १० वाजता पुढेनिघाला.>तुकोबारायांच्या पालखीचे बावड्यात स्वागत शाहीबावडा (जि. पुणे) : ‘ग्यानबा तुकाराम’च्या गजरात बावडानगरीत दुपारच्या विसाव्यासाठी दाखल झालेल्या संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराममहाराजांच्या पालखीचे मंगळवारी तोफांच्या सलामीत शाही स्वागत करण्यात आले.सोमवारचा इंदापूरचा मुक्काम आटोपून वडापुरी, रामवाडी, सुरवड, वकीलवस्ती आदी ठिकाणचा पाहुणचार घेऊन पालखी दुपारी तीन वाजता येथे दाखल झाली. ब्रह्मर्र्षी हरिभाऊ तोरणे गुरुजी चौकात पालखी येताच हजारो भक्तगणांनी दर्शन घेतले. सायंकाळी पाच वाजता पालखीचा जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम असणाºया सराटी गावाकडे प्रस्थान झाले.>भक्तनिवासात १२०३ भाविकांची सोयपंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सुमारे ७० कोटी रुपये खर्चून पंढरपुरात येणाºया भाविकांच्या सोयीसाठी सुसज्ज असे भक्तनिवास उभाण्यात आले आहे.आषाढी वारीदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता होती, पण काही काम अपूर्ण आहे़>सोलापूरकर नतमस्तकसोलापूर : मागील ३३ दिवसांपासूनचा प्रवास करीत आलेल्या शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचे टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ‘गण गण गणात बोते़़़’चा जयघोष करीत उपलप मंगल कार्यालयात आगमन झाले़ उपलप कुटुंबाने प्रथेप्रमाणे पालखीचे स्वागत करून अन्नदानाची सेवा बजावली़>संत एकनाथ पालखीचे जिल्ह्यात स्वागतमाढा : पैठणहून निघालेल्या संत एकनाथ महाराज पालखीचे मंगळवारी तालुक्यातील मुंगशीत भक्तिमय वातावरणात आगमन झाले. तहसीलदार सदाशिव पडदुणे, गटविकास अधिकारी गोकुळदास बैरागी यांनी पालखीचे दर्शन घेत स्वागत केले.>पंढरीवर ‘सीसीटीव्ही कॅमेरा’चा वॉचपंढरपूर : आषाढी यात्रा सोहळ्यादरम्यान कोणत्याही ठिकाणी काही अनुचित प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आल्यास तो तत्काळ थांबवता यावा, यासाठी मंदिर व पोलीस प्रशासनाकडून विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व शहरात एकूण १५३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़ हेच सीसीटीव्ही कॅमेरे संपूर्ण आषाढी वारी सोहळ्यावर लक्ष ठेवणार आहेत़

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा