शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

माऊलींची आषाढी वाट आणखी बिकट

By admin | Updated: June 8, 2017 01:01 IST

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्याची पुण्यापर्यंतची पालखीची वाट बिकट झालेली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : आषाढीवारी अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्याची पुण्यापर्यंतची पालखीची वाट बिकट झालेली आहे. पालखी महामार्ग रुंदीकरणाचे रखडलेले काम, बांधकामांचे अस्ताव्यस्त पडलेले साहित्य, नियोजनशून्य काम, खोदलेले चर, पडलेला राडारोडा यामुळे वारकऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागणार आहे. आषाढीवारी येत्या १६ जूनपासून सुरू होणार आहे. शुक्रवारी देहूतून संतश्रेष्ठ तुकाराममहाराज आणि शनिवारी श्री क्षेत्र आळंदीतून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज यांची पालखी श्रीक्षेत्र पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. पावसाळा तोंडावर आला असला तरी रस्त्यांची कामे संथगतीने सुरू आहेत. पालखी सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला असला तरी देहूतून पिंपरीपर्यंत आणि आळंदीतून विश्रांतवाडीपर्यंतची पालखीची वाट बिकट आहे. रस्ता रुंदीकरणाची कामे अपूर्ण असल्याने यंदा वारकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागणार आहे. मात्र महापालिका आणि जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नाही. काम संथगतीने : ‘लोकमत’ने आळंदीतील देहूफाट्यापासून दिघीपर्यंतच्या रस्त्याची पाहणी केली. विश्रांतवाडीतून दिघीपर्यंतचा रस्ता अपूर्ण आहे. रुंदीकरण रखडलेले आहे. तसेच दिघी गावठाणातही रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. एकच लेन खुली ठेवली आहे. पुढे मॅगझिन चौकापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण झाले आहे. मॅगझिन चौकापासून साई मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. तसेच मधील रस्त्याचे काम सुरू असून बाजूने वाहने जाण्याची सोय केली आहे. काम संथगतीने : ‘लोकमत’ने आळंदीतील देहूफाट्यापासून दिघीपर्यंतच्या रस्त्याची पाहणी केली. विश्रांतवाडीतून दिघीपर्यंतचा रस्ता अपूर्ण आहे. रुंदीकरण रखडलेले आहे. तसेच दिघी गावठाणातही रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. एकच लेन खुली ठेवली आहे. पुढे मॅगझिन चौकापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण झाले आहे. मॅगझिन चौकापासून साई मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. तसेच मधील रस्त्याचे काम सुरू असून बाजूने वाहने जाण्याची सोय केली आहे. जीवघेण्या लोखंडी सळयाजाताना साई मंदिराच्या अलीकडे शंभर मीटरवरील रस्त्यावरच लोखंडी सळया बाहेर आलेल्या आहेत. उघड्या सळयांमुळे अपघात संभवतो. जीवघेण्या लोखंडी सळया येथे आहेत. तसेच येथे मोठ्या प्रमाणावर राडारोडा पडलेला आहे. पुढे साईमंदिरापासून वळणावर असलेल्या अडरपासचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला राडारोडा आणि खड्डे आहेत. त्यामुळे हा रस्ता धोक्याचा बनला आहे. दंडात्मक कारवाई करारस्त्यावर पडलेल्या सळया आणि राडारोडा रात्रीच्या वेळी दिसत नाही. त्यामुळे गाडी घसरून अपघात होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या अपघातांना जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पावसाळ्यापूर्वी काम होणे अपेक्षित होते. मात्र, वाढीव खर्चाच्या आशेपायी ठेकेदाराने हे काम संथगतीने सुरू ठेवले आहे. पारदर्शक कारभाराचा टेंभा मिरविणारे भाजपाचे नेते आता कुठे गेले, असा सवाल उपस्थित करून वेळेवर काम न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी, दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणीही या भागातील नागरिकांनी केली आहे.