शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
2
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
3
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
4
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
5
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
6
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
7
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
8
तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
9
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
10
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
11
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?
12
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
13
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
14
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
15
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
16
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
17
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
18
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
19
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
20
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...

माऊलींची आषाढी वाट आणखी बिकट

By admin | Updated: June 8, 2017 01:01 IST

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्याची पुण्यापर्यंतची पालखीची वाट बिकट झालेली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : आषाढीवारी अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्याची पुण्यापर्यंतची पालखीची वाट बिकट झालेली आहे. पालखी महामार्ग रुंदीकरणाचे रखडलेले काम, बांधकामांचे अस्ताव्यस्त पडलेले साहित्य, नियोजनशून्य काम, खोदलेले चर, पडलेला राडारोडा यामुळे वारकऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागणार आहे. आषाढीवारी येत्या १६ जूनपासून सुरू होणार आहे. शुक्रवारी देहूतून संतश्रेष्ठ तुकाराममहाराज आणि शनिवारी श्री क्षेत्र आळंदीतून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज यांची पालखी श्रीक्षेत्र पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. पावसाळा तोंडावर आला असला तरी रस्त्यांची कामे संथगतीने सुरू आहेत. पालखी सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला असला तरी देहूतून पिंपरीपर्यंत आणि आळंदीतून विश्रांतवाडीपर्यंतची पालखीची वाट बिकट आहे. रस्ता रुंदीकरणाची कामे अपूर्ण असल्याने यंदा वारकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागणार आहे. मात्र महापालिका आणि जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नाही. काम संथगतीने : ‘लोकमत’ने आळंदीतील देहूफाट्यापासून दिघीपर्यंतच्या रस्त्याची पाहणी केली. विश्रांतवाडीतून दिघीपर्यंतचा रस्ता अपूर्ण आहे. रुंदीकरण रखडलेले आहे. तसेच दिघी गावठाणातही रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. एकच लेन खुली ठेवली आहे. पुढे मॅगझिन चौकापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण झाले आहे. मॅगझिन चौकापासून साई मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. तसेच मधील रस्त्याचे काम सुरू असून बाजूने वाहने जाण्याची सोय केली आहे. काम संथगतीने : ‘लोकमत’ने आळंदीतील देहूफाट्यापासून दिघीपर्यंतच्या रस्त्याची पाहणी केली. विश्रांतवाडीतून दिघीपर्यंतचा रस्ता अपूर्ण आहे. रुंदीकरण रखडलेले आहे. तसेच दिघी गावठाणातही रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. एकच लेन खुली ठेवली आहे. पुढे मॅगझिन चौकापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण झाले आहे. मॅगझिन चौकापासून साई मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. तसेच मधील रस्त्याचे काम सुरू असून बाजूने वाहने जाण्याची सोय केली आहे. जीवघेण्या लोखंडी सळयाजाताना साई मंदिराच्या अलीकडे शंभर मीटरवरील रस्त्यावरच लोखंडी सळया बाहेर आलेल्या आहेत. उघड्या सळयांमुळे अपघात संभवतो. जीवघेण्या लोखंडी सळया येथे आहेत. तसेच येथे मोठ्या प्रमाणावर राडारोडा पडलेला आहे. पुढे साईमंदिरापासून वळणावर असलेल्या अडरपासचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला राडारोडा आणि खड्डे आहेत. त्यामुळे हा रस्ता धोक्याचा बनला आहे. दंडात्मक कारवाई करारस्त्यावर पडलेल्या सळया आणि राडारोडा रात्रीच्या वेळी दिसत नाही. त्यामुळे गाडी घसरून अपघात होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या अपघातांना जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पावसाळ्यापूर्वी काम होणे अपेक्षित होते. मात्र, वाढीव खर्चाच्या आशेपायी ठेकेदाराने हे काम संथगतीने सुरू ठेवले आहे. पारदर्शक कारभाराचा टेंभा मिरविणारे भाजपाचे नेते आता कुठे गेले, असा सवाल उपस्थित करून वेळेवर काम न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी, दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणीही या भागातील नागरिकांनी केली आहे.