शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

मॅटचा निर्णय सरकारच्या विरोधात जाण्यासाठी अधिका-यांचा कट

By अतुल कुलकर्णी | Updated: December 9, 2017 05:43 IST

अन्न व औषधी विभागातल्या बदली झालेल्या १२ अधिका-यांनी मंत्रालयातील अधिका-यांना हाताशी धरून सरकारने अन्याय केल्याचे भासवत खरी माहिती दडवून ठेवली

मुंबई : अन्न व औषधी विभागातल्या बदली झालेल्या १२ अधिका-यांनी मंत्रालयातील अधिका-यांना हाताशी धरून सरकारने अन्याय केल्याचे भासवत खरी माहिती दडवून ठेवली. शिवाय, मॅटचा निर्णय सरकारच्या विरोधात जावा यासाठी जाणीवपूर्वक कट रचला, असा गंभीर आक्षेप मॅटचे चेअरमन न्यायमूर्ती अंबादास जोशी यांनी नोंदवला आहे.एवढेच नाही तर, आम्ही नोंदविलेले आक्षेप संबंधित खात्याच्या मंत्री महोदयांना निदर्शनास आणून देण्यासाठी थेट अ‍ॅडव्होकेट जनरला नोटीस द्यावी का? अशी विचारणाही मॅटने केली. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या सरकारी वकिलांनी तात्काळ मंत्र्यांचे दालन गाठले. आता या प्रकरणी पापक्षालन करण्याची याचना करणारे शपथपत्र खात्याच्या सचिवांनी मॅटला सादर केले आहे.अन्न व औषधी विभागात मुंबई, ठाण्यात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकाºयांच्या बदल्या झाल्या पाहिजेत, अशी शिफारस लोकमत वृत्तमालिकेनंतर नेमण्यात आलेल्या महेश झगडे, अ‍ॅड. उदय बोपशेट्टी यांच्या समितीने केली होती. त्यानुसार मंत्री गिरीश बापट यांनी अशा १२ अधिकाºयांच्या बदल्या केल्या. त्या बदल्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मान्यता दिली. मात्र अर्धवट माहिती देत त्या १२ अधिकाºयांनी या आदेशाला मॅटमधून स्थगिती मिळवली. त्यामुळे मंत्री बापट यांनी उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. उच्च न्यायालयाने या प्रकरणी मॅटने तीन महिन्यात तातडीने निर्णय घ्यावा आणि तोपर्यंत मॅटच्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही तर तो ‘कंटेम्प्ट’ होणार नाही असे आदेश दिले. या निर्णयानंतर मॅटचे चेअरमन जोशी यांनी स्वत: हे प्रकरण सुनावणीस घेतले.

टॅग्स :Mantralayaमंत्रालय