शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

मराठवाड्यातील दोन वजीर आमने-सामने!

By admin | Updated: March 3, 2015 02:27 IST

महाराष्ट्राच्या राजकीय पटावर आज मराठवाड्यातील दोन वजीर एकमेकांना शह देण्यासाठी समोरासमोर उभे आहेत.

सुधीर महाजन - औरंगाबाद महाराष्ट्राच्या राजकीय पटावर आज मराठवाड्यातील दोन वजीर एकमेकांना शह देण्यासाठी समोरासमोर उभे आहेत. एकाला उधळलेला डाव पुन्हा मांडायचा, तर दुसरा सत्तेच्या जोरावर त्याचे मनसुबे उधळण्यासाठी तयारीत आहे. अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्तीने राज्यात चव्हाण-दानवे शह-काटशहाचे राजकारण रंगणार आहे. अशोक चव्हाणांची नियुक्ती ही पक्षापुढील आव्हान पेलण्यासाठी सक्षम नेता या निकषातून झाली. कारण उद्योगमंत्री, महसूलमंत्री, मुख्यमंत्री अशी यशस्वी कारकीर्द त्यांच्या खात्यावर जमा आहे. त्याच वेळी केंद्रातील मंत्रीपद सोडून दानवे राज्यात आले. चव्हाणांना पक्षाची पुनर्बांधणी करण्याचे आव्हान आहे; पण त्याच वेळी दानवे यांना पक्ष वाढविण्याची जबाबदारी, भाजपाच्या दारात मुंडावळ्या बांधून उभ्या असलेल्यांच्या डोक्यावर अक्षता टाकण्याचे काम.या दोघांना येत्या काही दिवसांतच औरंगाबाद पालिकेशिवाय इतर स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने मोर्चेबांधणी करण्याचे आव्हान. सत्ताधारी असल्याने साम, दाम, दंड, भेदाचा वापर करणे दानवे यांच्या दृष्टीने सोपे काम; पण त्याच वेळी चव्हाणांसमोर मोठे आव्हान. कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील सलग पराभवामुळे पक्ष कार्यकर्त्यांनी आत्मविश्वास गमावला आहे. या दोन्ही निवडणुकांत पक्षाचा दारुण पराभव झाला. दानवेंसाठी हे आव्हान वेगळ्या कारणाने. कारण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांवर आजही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. ते मोडीत काढून तेथे आपली सत्ता स्थापन करणे ही त्यांची कसोटी ठरू शकते. त्याच वेळी चव्हाणांना पक्षाचे हे छोटे गड टिकवायचे आहेत.चव्हाण यांची बलस्थाने... चव्हाण आक्रमक आहेत, त्यांच्याकडे संघटनात्मक कौशल्य आहे. राज्यातील प्रश्नांची जाण, मराठी, इंग्रजी या दोन्ही भाषांवर प्रभुत्व ही त्यांची बलस्थाने. गल्ली ते दिल्ली असे नेटवर्क असणारा विलासराव देशमुखांनंतर काँग्रेसमधील नेता; शिवाय राज्याच्या सर्वच भागांत कार्यकर्त्यांचे नेटवर्क. मराठवाड्याचा विचार केला तर येथेही कार्यकर्त्यांची फळी आहेच. देशभर काँग्रेसची पडझड होत असताना त्यांनी आपला नांदेड जिल्हा शाबूत ठेवला. दानवेंसमोर पक्षांतर्गत आव्हान... रावसाहेब दानवे हे भाजपामधील ज्येष्ठ नेते आहेत. मराठवाड्यात चांगला संपर्क, सहज उपलब्ध होणारे मोकळे ढाकळे अस्सल ग्रामीण बाज असलेले व्यक्तिमत्त्व ही त्यांची खासियत. पक्ष केंद्रात व राज्यातही सत्तेवर असल्याने तसे संघटनात्मक आव्हान नाही. पक्षांतर्गत कुरबुरी, गटबाजी असली तरी तेवढी उफाळून आलेली नाही. पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना लागलेले पदांचे डोहाळे आणि नव्या कार्यकर्त्यांची व्यवस्था या बाबींमुळे धुसफूस आहे.