शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

वंचित आघाडीने बदलले मराठवाड्याचे राजकारण

By सुधीर महाजन | Updated: May 25, 2019 05:35 IST

यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या राजकीय प्रयोगाने राजकारणाचा ताळेबंदच बाद ठरवला.

ठळक मुद्दे नरेंद्र मोदी आणि प्रकाश आंबेडकर यांच्याकडे पाहून मतदान झाले.राजकारणात ‘वंचित’चे महत्त्व वाढणार

-सुधीर महाजन

मराठवाड्यातील निकालांचे वैशिष्ट्य म्हणजे अशोक चव्हाण आणि चंद्रकांत खैरे या दोन दिग्गजांचा पराभव. तसेच पहिल्यांदाच मराठवाड्यातून काँग्रेसचा एकही खासदार नाही. मोदी लाटेत नांदेडची जागा काँग्रेसने गमावणे आश्चर्य नाही; पण औरंगाबादसारखी शिवसेनेची महत्त्वाची जागा एमआयएमने हिसकावणे ही गोष्ट विचार करायला लावणारी आहे. हा पराभव सेनेच्या जिव्हारी लागणारा आहे. कारण मुंबईबाहेर शिवसेनेच्या राजकारणाची मुहूर्तमेढ औरंगाबादेतच रोवली गेली होती.

गेल्या निवडणुकीत मोदी लाट असतानाही नांदेडची जागा काँग्रेसने राखली होती; परंतु यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या राजकीय प्रयोगाने काँग्रेसच्या राजकारणाचा ताळेबंदच बाद ठरवला. त्याचा फायदा भाजपने उठवला. हे चित्र महाराष्ट्रभर दिसले. धर्मनिरपेक्ष मतांच्या विभाजनाचा फटका काँग्रेसला बसला. अशोक चव्हाणांचा पराभव झाला असला तरी त्यांना साडेचार लाख मते मिळाली. या गोष्टीकडे कानाडोळा करता येणार नाही. यावेळी पहिल्यांदाच भाजप आणि वंचित आघाडी या दोन्ही पक्षांना मिळालेली मते ही पक्षाकडे न पाहता नरेंद्र मोदी आणि प्रकाश आंबेडकर यांच्याकडे पाहून मतदान झाले. या ठिकाणी पक्षाचा उमेदवार दुय्यम ठरला. गेल्या निवडणुकीत ‘अशोकराव पाहिजेत’ या मुद्यावर मतदान झाले होते. यावेळी हा मुद्या गायब होता. ‘वंचित’च्या उदयामुळे काँग्रेसच्या परंपरागत मतदाराचे विभाजन ही बाब निर्णायक ठरली.

नांदेडमध्ये पाटील, देशमुख वाद ऐन निवडणुकीत उफाळून आला. त्याचाही फटका बसला. नांदेडमधील काँग्रेस व भाजपला मिळणाऱ्या मतांचा १९९७ पासून आढावा घेतला तर ही मते सारखीच आहेत. २००४ साली काँग्रेसच्या मतांच्या विभाजनामुळे भास्करराव पाटील खतगावकर पराभूत झाले होते, त्याची पुनरावृत्ती यावेळी झाली. पाच टक्के नवामतदार भाजपकडे झुकला.

औरंगाबादेत खैरेंचा पराभव अपेक्षाभंग करणारा अजिबात नव्हता. जनतेला गृहीत धरण्याची प्रवृत्ती हे पराभवाचे मूळ कारण आहे. गेल्या वर्षभरात कचरा, पाणी, रस्ते या समस्यांनी औरंगाबादचे नागरिक त्रस्त आहेत आणि या समस्यांवर अजुनही उपाय योजले नाहीत. शिवाय महानगरपालिकेतील अनागोंदी या सगळ्यांचा फटका खैरेंना बसला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आळसावलेली शिवसेना. त्याचा परिणाम झालाच अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी खैरेंच्या मतांचे विभाजन झाले. एम.आय.एम.चे इम्तियाज जलील यांनी औरंगाबादेतून विधानसभेची निवडणूक जिंकली होती. त्यांच्या औरंगाबाद मध्य मतदारसंघातच शिवसेनेचा बालेकिल्ला समजली जाणारी गुलमंडी येथे. तेथेच त्यांनी सेनेचा पराभव केला; पण या पराभवातून सेनेने धडा घेतला नाही.

‘वंचित’चे महत्त्व वाढणारमराठवाड्यात उर्वरीत जागांचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागले. हिंगोलीत गेल्या वेळेस काँग्रेसचे राजीव सातव निसटत्या बहुमताने विजयी झाले होते आणि आता ते उमेदवारही नव्हते. त्यामुळे हिंगोली काँग्रेसने गमावली. रावसाहेब दानवे, प्रीतम मुंडे जिंकणार हे अधोरेखीत होतेच. उस्मानाबादेत सेनेने उमेदवार बदलला त्याचा फायदा झाला. बहुजन वंचित आघाडीने मराठवाड्यातील राजकारणाचे समीकरण बदलून टाकले, याची झलक मोदी त्सुनामीतही पहायला मिळाली; पण आता आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडीचे महत्त्व आणखी निश्चितच वाढणार.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालMarathwadaमराठवाडाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९