शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

मराठवाड्यात पूरस्थिती

By admin | Updated: October 2, 2016 02:55 IST

मराठवाड्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून शनिवारी लातूर, नांदेड जिल्ह्यात पूरस्थिती ओढविली. दोन्ही जिल्ह्यांतील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून शनिवारी लातूर, नांदेड जिल्ह्यात पूरस्थिती ओढविली. दोन्ही जिल्ह्यांतील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ३० गावकरी पुरात अडकल्यामुळे त्यांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर व एनडीआरएसच्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सात पाझर तलाव फुटले. बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली जिल्ह्यांनाही परतीच्या पावसाने तडाखा दिला. अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यात जनावरे वाहून गेली. नांदेड जिल्ह्यात लिंबोटी धरणाचे १७ दरवाजे उघडल्याने डोंगरगाव येथे २३ गावकरी शनिवारी सकाळी सात वाजेपासून पुरामुळे झाडावर अडकले होते. त्यातील १५ जणांची सुटका केल्याचे समजते. लातूरमधील अहमदपूर तालुक्यात सावरगाव थोट येथे एक मुलगा पुरात वाहून गेला. मावलगावचे १० तर कामखेड्यातील २१ शेतकरी पुरात अडकले होते. त्यातील काहींची संध्याकाळी सुटका करण्यात आली. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रशासनाने सायंकाळी हेलिकॉप्टर मागविले होते. दोन्ही जिल्ह्यांत रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते. उदगीरमध्ये तिरु नदीला मोठा पूर आल्याने जवळपास १५० घरांमध्ये पाणी शिरले. पानगावातील रेल्वे रुळही पाण्याखाली गेल्यामुळे शनिवारी सकाळी नांदेड-बंगळरू एक्स्प्रेस दोन तास पानगाव रेल्वेस्थानकावर थांबविण्यात आली होती. मांजरा आणि तावरजाकाठच्या ५८ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उस्मानाबादचा तेरणा मध्यम प्रकल्प तुडूंब भरला़ जिल्ह्यातील ११५ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. बीड जिल्ह्यातही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अंबाजोगाई तालुक्यातील घाट नांदूर जवळच्या वाघदरवाडी येथील ३० वर्षे जूना लघु सिंचन तलाव शनिवारी सकाळी फुटला. माजलगाव येथील मोठ्या धरणाचे ११ पैकी पाच दरवाजे अर्धा मीटरने उघडलेले आहेत. परभणी जिल्ह्यात मासोळी नदीच्या पुराचे पाणी पिंपळदरीसह दोन गावांत घुसले. (लोकमत न्यूज नेटवर्क)राज्य सरकार मराठवाड्यातील विशेषत: लातूर व नांदेड जिल्ह्यातील पूरस्थितीवर विशेष लक्ष ठेऊन आहे. प्रशासनाकडून लोकांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे. मी स्वत: मदतीचा आढावा घेतला. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार लातूर जिल्ह्यात रेणापूरमध्ये १२, अहमदपूरमध्ये १० तर नांदेड जिल्ह्यात डोंगरगाव येथे ८ गावकरी पुरात अडकले आहेत. जळकोट तालुक्यात दोघांची सुटका करण्यात आली आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीपूरग्रस्तांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर...लातूर, नांदेड जिल्ह्यात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टरदोन्ही जिल्ह्यांत ‘एनडीआरएफ’ला पाचारणबीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली जिल्ह्यांनाही तडाखा लातूर-नांदेड-सोलापूरची वाहतूक बंद जळगावमध्ये पाऊसजळगाव जिल्ह्याच्या काही भागात शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी मुसळधार पाऊस झाला. वरणगाव (ता. भुसावळ) येथील रामपेठ व अयोध्यानगर भागात घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले.धुळ््यात चौघांचा बुडून मृत्यूधुळे जिल्ह्यात दोन वेगवेगळ््या घटनांमध्ये शनिवारी चार जणांचा बुडून मृत्यू झाला. साक्री तालुक्यातील मालपूर येथे दोन महिलांचा विहिरीत तर सोनगीर येथे पाण्याच्या डबक्यात दोन शाळकरी मुलांना बुडून मृत्यू झाला. उजनी भरले!उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात परतीच्या पावसाच्या दमदार हजेरीमुळे धरणाच्या पाण्याची पातळी १०० टक्क्यांवर पोहोचली आहे. धरणात ११६.९८ टीएमसी पाणी असून उपयुक्त पाणीसाठा ५३.२२ टीएमसी आहे. गतवर्षी १ आॅक्टोबरला हा साठा ३.९९ टीएमसी पाणी होता.