शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
6
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
7
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
8
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
9
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
10
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
11
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
12
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
13
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
14
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
15
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
16
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
17
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

मराठवाड्याला अखेर वरुणराजा पावला !

By admin | Updated: August 5, 2015 01:18 IST

कृत्रिम पावसाचे तळ्यात-मळ्यात सुरू असताना मराठवाड्यावर मंगळवारी निसर्गराजाचीच कृपा झाली. उस्मानाबाद वगळता सातही जिल्ह्यात रिमझिम

औरंगाबाद/नागपूर : कृत्रिम पावसाचे तळ्यात-मळ्यात सुरू असताना मराठवाड्यावर मंगळवारी निसर्गराजाचीच कृपा झाली. उस्मानाबाद वगळता सातही जिल्ह्यात रिमझिम पावसाने हजेरी लावली. तब्बल दीड महिन्यांच्या विश्रांतीनंतर पाऊस पडल्याने बळीराजाला काहीसा दिलासा मिळाला आहे.मंगळवारी औरंगाबाद जिल्ह्यात सर्वदूर रिमझिम पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील ५८७ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया मंगळवारी पार पडली. अनेक ठिकाणी भरपावसात रांगा लावून मतदारांनी त्यांचा हक्क बजावला. पैठण तालुक्यातील बिडकीन भागात काहीवेळ जोरदार सरी कोसळल्या. परभणी जिल्ह्यातही रिमझिम पाऊस झाला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने घेतलेल्या नोंदीनुसार ४.६ मि.मी. पाऊस झाला होता. नांदेड, जालना, हिंगोली, बीड आदी जिल्ह्यांत सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू होता. खान्देशात दमदारखान्देशातील जळगाव व धुळे जिल्ह्यात ४० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी पावसाचे दमदार आगमन झाले. नंदुरबार जिल्ह्यातही दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर रिपरिप झाली. पुढील २४ तासांत मराठवाडा, कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. गेल्या २४ तासांत कोकण आणि विदर्भात मुसळधार पाऊस झाला. विदर्भात संततधार दीर्घ उघडीप दिल्यानंतर सोमवारपासून विदर्भात पुन्हा पावसाला सुरुवात झाली. मंगळवारी दिवसभर सर्वदूर संततधार सुरू होती. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. अमरावती जिल्ह्यात २८.१ मि.मी. पावसाची नोंद झाली. दर्यापूर तालुक्यात शहानूर नदीच्या पुरामध्ये मनोहर श्रीराम काळे (५५) हे वाहून गेले. पावसाच्या संततधारेमुळे कपाशी, सोयाबीन यासह इतर पिकांना नवसंजीवनी मिळण्याची आशा आहे. गेल्या चोवीस तासांत भंडारा (३२ मिमी), चंद्रपूर (१७.२ मिमी), यवतमाळ (२७ मिमी), वर्धा (२९६.५० मिमी), गोंदिया (३४४.०३ मिमी) व गडचिरोलीत (२८.२ मिमी) पावसाची नोंद झाली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)