शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याला दुष्काळकळा! आठही जिल्ह्यांत गंभीर परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 04:09 IST

चार वर्षांच्या दुष्काळानंतर गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने मराठवाड्यातील बळीराजा काहीसा सुखावला. पण यंदा पुन्हा मराठवाड्याला दुष्काळकळा जाणवू लागल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चार वर्षांच्या दुष्काळानंतर गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने मराठवाड्यातील बळीराजा काहीसा सुखावला. पण यंदा पुन्हा मराठवाड्याला दुष्काळकळा जाणवू लागल्या आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात दमदार पाऊस झाल्याने आठही जिल्ह्यांत पेरण्या आटोपण्यात आल्या. मात्र नंतर पावसाने पाठ फिरविल्याने बळीराजाचे जीवन वेदनादायी झाले आहे.औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३१.६७ टक्केच पाऊस झाला असून खरिप हंगाम धोक्यात आला आहे. जायकवाडी वगळता जिल्ह्यातील एकाही जलसाठ्यात पाणी वाढलेले नाही. पैठण तालुक्यांत ६० टक्के तर गंगापूर तालुक्यातील ७५ टक्के पेरणी वाया गेल्यात जमा आहे.वैजापूर तालुक्यात ४० टक्केक्षेत्रावर दुबार पेरणी करावी लागली. एक-दोन दिवसात पाऊस न आल्यास तिथेही गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे.जालना जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या १००.५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. म्बीड जिल्ह्यात जुलैअखेर ११५ टक्के पेरण्या झालेल्या आहेत. मात्र पावसाने मोठी ओढ दिल्याने हलक्या जमिनीवरील पिकांमध्ये घट होण्याची शक्यता वाढली आहे.हिंगोली जिल्ह्यात यंदा ३.८४ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली असून पावसाने ओढ दिल्याने पिके माना टाकू लागली आहेत. तर परभणी जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये ४ लाख ५२ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, येथेही पिके करपू लागली आहेत.उस्मानाबाद जिल्ह्यातील तब्बल ४ लाख ९६ हजार ४२२ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे़ येथे २८६ मिमी पावसाची नोंद झाली असून, सरासरी ३७ टक्क्यांपर्यंत पाऊस झाला आहे़पाच कर्जबाजारी शेतकऱ्यांची आत्महत्यामराठवाड्यातील पाच कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने हा परिसर हादरून गेला आहे. परभणीमधील शिवाजी जोगदंड (४५), पूर्णा तालुक्यातील अनिल रमेश शिंदे (२३) बीडमध्ये बिभीषण रामराव धस (३०) आणि दत्तात्रय बब्रुवान दातार (४५) तर नांदेडमधील रोहिदास मोहन जाधव (५०) या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.नांदेड जिल्ह्यावर जलसंकटनांदेड जिल्ह्यात पावसाअभावी भीषण जलसंकटाची परिस्थिती उद्भवली असून ५ आॅगस्टपर्यंत केवळ २९ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे.लातूरमध्ये १४.१८ टक्के उपयुक्त पाणीलातूर जिल्ह्यात पावसाने दडीने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. आठ मध्यम प्रकल्पांत केवळ १४.१८ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.