शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

मराठवाड्याला दुष्काळकळा! आठही जिल्ह्यांत गंभीर परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 04:09 IST

चार वर्षांच्या दुष्काळानंतर गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने मराठवाड्यातील बळीराजा काहीसा सुखावला. पण यंदा पुन्हा मराठवाड्याला दुष्काळकळा जाणवू लागल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चार वर्षांच्या दुष्काळानंतर गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने मराठवाड्यातील बळीराजा काहीसा सुखावला. पण यंदा पुन्हा मराठवाड्याला दुष्काळकळा जाणवू लागल्या आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात दमदार पाऊस झाल्याने आठही जिल्ह्यांत पेरण्या आटोपण्यात आल्या. मात्र नंतर पावसाने पाठ फिरविल्याने बळीराजाचे जीवन वेदनादायी झाले आहे.औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३१.६७ टक्केच पाऊस झाला असून खरिप हंगाम धोक्यात आला आहे. जायकवाडी वगळता जिल्ह्यातील एकाही जलसाठ्यात पाणी वाढलेले नाही. पैठण तालुक्यांत ६० टक्के तर गंगापूर तालुक्यातील ७५ टक्के पेरणी वाया गेल्यात जमा आहे.वैजापूर तालुक्यात ४० टक्केक्षेत्रावर दुबार पेरणी करावी लागली. एक-दोन दिवसात पाऊस न आल्यास तिथेही गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे.जालना जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या १००.५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. म्बीड जिल्ह्यात जुलैअखेर ११५ टक्के पेरण्या झालेल्या आहेत. मात्र पावसाने मोठी ओढ दिल्याने हलक्या जमिनीवरील पिकांमध्ये घट होण्याची शक्यता वाढली आहे.हिंगोली जिल्ह्यात यंदा ३.८४ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली असून पावसाने ओढ दिल्याने पिके माना टाकू लागली आहेत. तर परभणी जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये ४ लाख ५२ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, येथेही पिके करपू लागली आहेत.उस्मानाबाद जिल्ह्यातील तब्बल ४ लाख ९६ हजार ४२२ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे़ येथे २८६ मिमी पावसाची नोंद झाली असून, सरासरी ३७ टक्क्यांपर्यंत पाऊस झाला आहे़पाच कर्जबाजारी शेतकऱ्यांची आत्महत्यामराठवाड्यातील पाच कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने हा परिसर हादरून गेला आहे. परभणीमधील शिवाजी जोगदंड (४५), पूर्णा तालुक्यातील अनिल रमेश शिंदे (२३) बीडमध्ये बिभीषण रामराव धस (३०) आणि दत्तात्रय बब्रुवान दातार (४५) तर नांदेडमधील रोहिदास मोहन जाधव (५०) या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.नांदेड जिल्ह्यावर जलसंकटनांदेड जिल्ह्यात पावसाअभावी भीषण जलसंकटाची परिस्थिती उद्भवली असून ५ आॅगस्टपर्यंत केवळ २९ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे.लातूरमध्ये १४.१८ टक्के उपयुक्त पाणीलातूर जिल्ह्यात पावसाने दडीने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. आठ मध्यम प्रकल्पांत केवळ १४.१८ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.