शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
3
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
4
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
5
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
6
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
7
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
8
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
9
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
10
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
11
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
12
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
13
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
14
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
15
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
16
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
17
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
18
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
19
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
20
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."

मराठवाड्याला दुष्काळकळा! आठही जिल्ह्यांत गंभीर परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 04:09 IST

चार वर्षांच्या दुष्काळानंतर गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने मराठवाड्यातील बळीराजा काहीसा सुखावला. पण यंदा पुन्हा मराठवाड्याला दुष्काळकळा जाणवू लागल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चार वर्षांच्या दुष्काळानंतर गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने मराठवाड्यातील बळीराजा काहीसा सुखावला. पण यंदा पुन्हा मराठवाड्याला दुष्काळकळा जाणवू लागल्या आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात दमदार पाऊस झाल्याने आठही जिल्ह्यांत पेरण्या आटोपण्यात आल्या. मात्र नंतर पावसाने पाठ फिरविल्याने बळीराजाचे जीवन वेदनादायी झाले आहे.औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३१.६७ टक्केच पाऊस झाला असून खरिप हंगाम धोक्यात आला आहे. जायकवाडी वगळता जिल्ह्यातील एकाही जलसाठ्यात पाणी वाढलेले नाही. पैठण तालुक्यांत ६० टक्के तर गंगापूर तालुक्यातील ७५ टक्के पेरणी वाया गेल्यात जमा आहे.वैजापूर तालुक्यात ४० टक्केक्षेत्रावर दुबार पेरणी करावी लागली. एक-दोन दिवसात पाऊस न आल्यास तिथेही गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे.जालना जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या १००.५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. म्बीड जिल्ह्यात जुलैअखेर ११५ टक्के पेरण्या झालेल्या आहेत. मात्र पावसाने मोठी ओढ दिल्याने हलक्या जमिनीवरील पिकांमध्ये घट होण्याची शक्यता वाढली आहे.हिंगोली जिल्ह्यात यंदा ३.८४ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली असून पावसाने ओढ दिल्याने पिके माना टाकू लागली आहेत. तर परभणी जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये ४ लाख ५२ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, येथेही पिके करपू लागली आहेत.उस्मानाबाद जिल्ह्यातील तब्बल ४ लाख ९६ हजार ४२२ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे़ येथे २८६ मिमी पावसाची नोंद झाली असून, सरासरी ३७ टक्क्यांपर्यंत पाऊस झाला आहे़पाच कर्जबाजारी शेतकऱ्यांची आत्महत्यामराठवाड्यातील पाच कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने हा परिसर हादरून गेला आहे. परभणीमधील शिवाजी जोगदंड (४५), पूर्णा तालुक्यातील अनिल रमेश शिंदे (२३) बीडमध्ये बिभीषण रामराव धस (३०) आणि दत्तात्रय बब्रुवान दातार (४५) तर नांदेडमधील रोहिदास मोहन जाधव (५०) या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.नांदेड जिल्ह्यावर जलसंकटनांदेड जिल्ह्यात पावसाअभावी भीषण जलसंकटाची परिस्थिती उद्भवली असून ५ आॅगस्टपर्यंत केवळ २९ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे.लातूरमध्ये १४.१८ टक्के उपयुक्त पाणीलातूर जिल्ह्यात पावसाने दडीने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. आठ मध्यम प्रकल्पांत केवळ १४.१८ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.