शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

मराठी जगभरात पोहोचविणार

By admin | Updated: February 28, 2016 02:08 IST

संचारक्रांतीमुळे अभिव्यक्तीची विविध साधने आपल्याला लाभली आहेत. याचा उपयोग करून मराठी जगभरात पोहोचविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे मत मुख्यमंत्री

मुंबई : संचारक्रांतीमुळे अभिव्यक्तीची विविध साधने आपल्याला लाभली आहेत. याचा उपयोग करून मराठी जगभरात पोहोचविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.ज्येष्ठ साहित्यिक व कवी वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर सभागृहात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. मराठी राजभाषा दिनानिमित्त ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना स्व. शाहीर साबळे आणि ज्येष्ठ लेखिका डॉ. विजया वाड यांना स्व. कविवर्य मंगेश पाडगावकर जीवनगौरव पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले. ५१ हजार रु. रोख, शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहेमुख्यमंत्री म्हणाले की, मराठीच्या संवर्धनासाठी सर्वोपरी पुढाकार घेतला जाईल. राज्य सरकार युनिकोड कन्सॉर्टियम या संघटनेचे सदस्यत्व प्राप्त करून मराठीला संगणकाद्वारे जगभर पोहोचविणार आहे. ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे.आज २१व्या शतकाने जी मूल्ये तयार करून दिली, त्यामुळे संचारक्रांती झाली आहे. या संचारक्रांतीमुळे अभिव्यक्तीची विविध दालने खुली झाली आहेत. या दालनांचा वापर करून जोपर्यंत मराठी तरुणांच्या मनामध्ये शिरकाव करत नाही तोपर्यंत मराठीच्या विस्ताराची अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही. मुख्यमंत्री म्हणाले की, आपण ज्या ज्ञानाधारित समाजाचा विचार करतो या समाज रचनेत चपखल बसणारी मराठी करायची असेल तर मराठी ही ज्ञानभाषा करावी लागेल. त्यासाठी संचारक्रांतीच्या युगात मराठीचा संचार मराठी मनात करावा लागेल. या कार्यक्रमास मराठी भाषा व सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, कार्यक्रमाचे आयोजक आमदार आशिष शेलार, पराग अळवणी, मनीषा चौधरी, उपमहापौर अलका केळकर, देवदत्त साबळे, अंजली पाडगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)सहकार्य करूमराठीला साहित्याची, संस्कृतीची उज्ज्वल परंपरा लाभली आहे. ही परंपरा जोपासण्यासाठी अनेक दिग्गजांनी मोलाचे कार्य केले; आणि त्यांचे कार्य अविरत सुरू राहावे यासाठी राज्य सरकार त्यांना सर्वोपरी सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या वेळी सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे म्हणाले की, मराठीच्या संवर्धनासाठी भविष्यात काय करावे यासाठी मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात येत आहे. मराठी भाषा आणि साहित्य यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.