शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

मराठी कादंबरीने दिले प्रभूंच्या प्रश्नाचे उत्तर!

By admin | Updated: February 27, 2015 02:30 IST

वर्षानुवर्षांचे दुर्लक्ष आणि तुटपुंजी गुंतवणूक यामुळे गलितगात्र झालेल्या भारतीय रेल्वेचा येत्या पाच वर्षांत पुनर्जन्म घडवून आणण्याचा

वर्षानुवर्षांचे दुर्लक्ष आणि तुटपुंजी गुंतवणूक यामुळे गलितगात्र झालेल्या भारतीय रेल्वेचा येत्या पाच वर्षांत पुनर्जन्म घडवून आणण्याचा संकल्प रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अर्थसंकल्पात व्यक्त केला. त्यासाठी काय करावे लागेल, याची रूपरेषाही त्यांनी मांडली. पण हे सर्व साध्य कसे करायचे, असा प्रश्न त्यांनाच पडला. या प्रश्नाचे उत्तर त्यांना परमेश्वराकडूनही मिळाले नाही. शेवटी शुभदा गोगटे यांनी लिहिलेल्या ‘खंडाळ्याच्या घाटासाठी’ या जुन्या मराठी कादंबरीच्या कथानकात त्यांना याचे उत्तर मिळाले. सह्याद्रीचे कडे पार करून भारतातील पहिला रेल्वे मार्ग कसा बांधला गेला याचे लालित्यपूर्ण वर्णन शुभदा गोगटे यांनी या कादंबरीत केले आहे.यासंदर्भात रेल्वेमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातील संदर्भित उतारा मुळातूनच उद््धृत करणे उद््बोधक आहे. प्रभू म्हणाले..... ‘‘पर मेरे मन मे सवाल उठता है- हे प्रभू, ये कैसे होगा? प्रभू ने तो जवाब नही दिया, तब ये प्रभूने सोचा (यावर सभागृहात हशा पिकतो) की, गांधीजी जिस साल भारत (वापस) आये थे, इनकी शताब्दी वर्ष में भारतीय रेल्वे को एक भेंट मिलनी चाहिये, की परिस्थिती बदल सकती है, रास्ते खोजे जा सकते है, इतना बडा देश, इतना बडा नेटवर्क, इतने सारे रिसोर्सेस, इतनी विशाल मॅनपॉवर, (पंतप्रधान मोदींकडे पाहात) इतनी स्ट्राँग पोलिटिकल विल, तो क्यों नही हो सकता रेल्वे का पुनर्जन्म.....(या प्रश्नाचे उत्तर शोधताना) मला शुभदा गोगटे यांच्या ‘खंडाळ्याच्या घाटासाठी’ या कादंबरीची आठवण झाली. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून भारतातील पहिला रेल्वेमार्ग कसा बांधला गेला याचे मार्मिक वर्णन या कादंबरीत आहे. एकावेळी रेल्वेमार्गाचा एक तुकडा बांधायचा. एकावेळी एक बोगदा खणायचा. ते पूर्ण झाले की पुढील रेल्वेमार्ग व बोगद्याचे काम हाती घ्यायचे. मूळ रेल्वेमार्ग जसा थोडा थोडा करून बांधला गेला तसाच रेल्वेचा पुनर्जन्मही टप्प्याटप्प्यानेच करता येईल.