शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मराठी वाङ्मयाला परंपरा नाही- श्याम मनोहर; अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 05:54 IST

‘‘नीट जगणे आणि अनेक प्रकारचे कुतूहल या माणसाच्या दोन मूलभूत प्रेरणा आहेत. सभ्यतेचा संदर्भ जगण्याशी आणि संस्कृतीचा संदर्भ शोधण्याशी असतो. संस्कृतीचे वाङ्मय अभिजात आणि कालातीत असते. अभिजात मराठी वाङ्मयाला इतिहास आहे; परंतु परंपरा नाही,’’ अशी खंत ज्येष्ठ लेखक श्याम मनोहर यांनी व्यक्त केली.

महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी (बडोदा) :‘‘नीट जगणे आणि अनेक प्रकारचे कुतूहल या माणसाच्या दोन मूलभूत प्रेरणा आहेत. सभ्यतेचा संदर्भ जगण्याशी आणि संस्कृतीचा संदर्भ शोधण्याशी असतो. संस्कृतीचे वाङ्मय अभिजात आणि कालातीत असते. अभिजात मराठी वाङ्मयाला इतिहास आहे; परंतु परंपरा नाही,’’ अशी खंत ज्येष्ठ लेखक श्याम मनोहर यांनी व्यक्त केली.‘‘आपल्या देशात सुंदर, प्रशस्त, मोफत, सुसज्ज आणि जावेसे वाटेल अशी वाचनालये असावीत. सर्व राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये समृद्ध वाचनालयांचा मुद्दा समाविष्ट करावा आणि तो पूर्ण करावा. आपला देश वाचनालयांचा व्हायला हवा. शेतकरी, लेखक आपल्या कामातून जगतील, अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही,’’ हेही त्यांनी अधोरेखित केले.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे श्याम मनोहर यांचा सत्कार करण्यात आला. गंगाधर पानतवणे प्रकृती-अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. या वेळी गुर्जर साहित्यिक सीतांशू यश्चचंद्र, महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, संमेलनाचे कार्याध्यक्ष दिलीप खोपकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, चित्रा मनोहर आदी उपस्थित होते.मनोहर म्हणाले, ‘‘साहित्यात आपल्याला संस्कृतीपर्यंत पोहोचायचे आहे. तत्त्व जाणून पुढे जायचे आहे. गहन प्रश्न आणि उत्तर मिळविण्याचे प्रयत्न हे संस्कृतीचे लक्षण आहे. जगणे प्रसंगांनी बनलेले असते आणि एखाद्या प्रसंगातून जीवनाचा अर्थ निघतो. जगण्यात सभ्यता आणली आणि सभ्यतेत एक कोपरा ज्ञानासाठी जिवंत ठेवला पाहिजे. असे केल्यास जगण्यातले विकार किमान उफाळून येणार नाहीत.’’श्रीपाद जोशी म्हणाले, ‘‘मराठीबरोबरच विज्ञानही अभ्यासक्रमात अत्यावश्यक करणे गरजेचे आहे, हे श्याम मनोहर यांच्याकडे पाहून पटते. भारतीय ज्ञानपरंपरेमध्ये सुसूत्रतेला सर्वाधिक महत्त्व आहे. आपण सर्व भारतीयतेच्या नावाखाली अभारतीय झालो आहोत. मात्र, ज्ञान, बुद्धीची जाणीव करून देणारा श्याम मनोहर हा एकमेव नाटककार आहे. आजकाल प्रश्न पडणारे, भूमिका घेणारे लेखक दुर्मिळ झाले आहेत. अशा वेळी परखड भूमिका घेणारे लेखक महत्त्वाचे ठरतात.’’अरुणा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. इंद्रजित घोडके यांनी आभार मानले.जिंकण्याचा हट्ट नको...‘‘साहित्य, कथा, कविता ही ज्ञानक्षेत्रे आहेत. गणितज्ञ, इतिहासकार, कलावंत, लेखक कसे असतात, कसे काम करतात, त्यांचे मन आणि बुद्धी कशी असते, हे कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? असा सवाल करीत मनोहर म्हणाले, ‘‘राजकारण, डावे-उजवे होऊ द्या; मात्र ज्ञानाची चर्चा होते का, हा खरा प्रश्न आहे. ज्ञान केवळ मिळवायचे नसते, तर ते निर्माणही करायचे असते. समाजाला नुसते सांगण्याची तपश्चर्या करावी, जिंकण्याचा हट्ट नको. सांगावे, बोलावे आणि सविस्तर लिहावे.’’

टॅग्स :Baroda Sahitya Samelanबडोदा साहित्य संमेलन