शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
3
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
4
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
5
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
6
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
7
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
8
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
9
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
10
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
11
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
12
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
13
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
14
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
15
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
16
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
17
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
18
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
19
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
20
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

मराठी संवर्धन पंधरवडा मुंबई-पुण्यापुरताच का? राज्यातील साहित्य संघटनेने घेतला आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 09:18 IST

केवळ पुण्या-मुंबईतील साहित्यिक व साहित्य संस्थांचा समावेश मराठी संवर्धन पंधरवड्यात केला असल्याने याबाबत मराठी भाषा विभागासह मुख्यमंत्री, मराठी भाषा मंत्री, तसेच विश्वकोश मंडळ सचिव आणि राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक यांनाही पत्र लिहिण्यात आले आहे.

मुंबई : राज्यात १४ जानेवारीपासून मराठी भाषा विभागाने मराठी भाषा पंधरवडा निमित्ताने ‘साहित्य सेतू’  उपक्रम जाहीर केला आहे. हा उपक्रम केवळ मुंबई, पुणे केंद्री व तिथलेच मान्यवर केंद्री का, असा प्रश्न राज्यातील इतर विभागांना पडत असतो हे लक्षात ठेवणे शासनाचेच काम आहे, अशी तीव्र भावना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक डॉ. श्रीपाद जोशी यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे. 

केवळ पुण्या-मुंबईतील साहित्यिक व साहित्य संस्थांचा समावेश मराठी संवर्धन पंधरवड्यात केला असल्याने याबाबत मराठी भाषा विभागासह मुख्यमंत्री, मराठी भाषा मंत्री, तसेच विश्वकोश मंडळ सचिव आणि राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक यांनाही पत्र लिहिण्यात आले आहे. या पत्रात, आम्ही महाराष्ट्राचेच भाग आहोत, याचे शासनाला वारंवार स्मरण का करून द्यावे लागते, अशी विचारणा शासनाला केली आहे. शासनाला अशा उपक्रमांमध्ये महाराष्ट्राच्या सर्व विभागांतील प्रतिभेला सामावून घेणारा सहभाग द्यावा असे धोरण असावे असे का वाटत नाही, असा सवालही जोशी यांनी पत्रात उपस्थित केला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. श्रीपाद जोशी यांनी सांगितले की, शासनाच्या अशा कार्य पद्धतीमुळेच विविध विभागांत विलगतेची भावना प्रबळ होण्यास खतपाणी मिळते आणि महाराष्ट्र संयुक्तच राखू इच्छिणाऱ्यांचे बळ क्षीण केले जात आहे. त्यायोगे भाषिक, सांस्कृतिक ऐक्यालादेखील बाधा पोहोचते, हेदेखील पत्रातून शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

टॅग्स :marathiमराठी