शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

मराठा आरक्षण हे घटनेच्या आधारेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 05:24 IST

राज्य सरकारचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापर्त्र

मुंबई : सामाजिक व शैक्षणिक मागास घटकांना शैक्षणिक क्षेत्रात व सरकारी नोकऱ्यांत पुरेसे प्रतिनिधित्व देणे, हे राज्य सरकारचे घटनात्मक कर्तव्यच आहे. घटनेच्या चौकटीत बसवूनच राज्य सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा कायदा केला आहे, असा दावा राज्य सरकारने उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे

असा प्रवर्ग तयार करून व त्यात मराठा समाजाला समाविष्ट करून १६ टक्के आरक्षण देणे अयोग्य वा अतिरिक्त ठरत नाही, असाही सरकारचा दावा आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणासंदर्भात घालून दिलेली ५० टक्क्यांची मर्यादा सवराज्यांना लागू होऊ शकत नाही, अशी भूमिका सरकारने घेतली आहे.

मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यासंबंधी कायद्याला अनेकांनी आव्हान दिले आहे. त्यावर सामान्य प्रशासन विभागाने प्रतिज्ञापत्र सादर करून बाजू मांडली. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा कायदा घटनेच्या चौकटीत असून, त्यात घटनेतील तरतुदीचे उल्लंघन झालेले नाही. मागासवर्ग आयोगाने सर्वेक्षण, विश्लेषण, तपास आणि संशोधन करूनच मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण अधोरेखित केले आहे. हा कायदा करण्यामागे आयोगाचा अहवाल हे सबळ कारण आहे, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकांचा विचार करून, मराठा समाजाला आरक्षण दिल्याचा आरोपही सरकारने फेटाळला आहे. याविषयीच्या सर्व याचिकांवरील सुनावणी २३ जानेवारी रोजी आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण