शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

मराठा आरक्षण हे घटनेच्या आधारेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 05:24 IST

राज्य सरकारचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापर्त्र

मुंबई : सामाजिक व शैक्षणिक मागास घटकांना शैक्षणिक क्षेत्रात व सरकारी नोकऱ्यांत पुरेसे प्रतिनिधित्व देणे, हे राज्य सरकारचे घटनात्मक कर्तव्यच आहे. घटनेच्या चौकटीत बसवूनच राज्य सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा कायदा केला आहे, असा दावा राज्य सरकारने उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे

असा प्रवर्ग तयार करून व त्यात मराठा समाजाला समाविष्ट करून १६ टक्के आरक्षण देणे अयोग्य वा अतिरिक्त ठरत नाही, असाही सरकारचा दावा आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणासंदर्भात घालून दिलेली ५० टक्क्यांची मर्यादा सवराज्यांना लागू होऊ शकत नाही, अशी भूमिका सरकारने घेतली आहे.

मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यासंबंधी कायद्याला अनेकांनी आव्हान दिले आहे. त्यावर सामान्य प्रशासन विभागाने प्रतिज्ञापत्र सादर करून बाजू मांडली. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा कायदा घटनेच्या चौकटीत असून, त्यात घटनेतील तरतुदीचे उल्लंघन झालेले नाही. मागासवर्ग आयोगाने सर्वेक्षण, विश्लेषण, तपास आणि संशोधन करूनच मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण अधोरेखित केले आहे. हा कायदा करण्यामागे आयोगाचा अहवाल हे सबळ कारण आहे, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकांचा विचार करून, मराठा समाजाला आरक्षण दिल्याचा आरोपही सरकारने फेटाळला आहे. याविषयीच्या सर्व याचिकांवरील सुनावणी २३ जानेवारी रोजी आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण