शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

मुंबईत ९ आॅगस्टला मराठा महामोर्चा

By admin | Updated: May 25, 2017 02:31 IST

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, परीक्षा अशा अनेक कारणांनी लांबणीवर पडलेल्या मुंबईतील मराठा क्रांती

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, परीक्षा अशा अनेक कारणांनी लांबणीवर पडलेल्या मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाची तारीख अखेर ठरली आहे. येत्या ९ आॅगस्ट रोजी क्रांतिदिनाचे निमित्त साधत मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचे वादळ धडकणार आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने बुधवारी सम्राट हॉटेलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.समन्वयक रवींद्र काळे-पाटील म्हणाले की, ९ आॅगस्ट रोजीच राज्यातील मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झाली होती. त्यामुळे राजधानीत महामोर्चा काढण्यासाठी हाच दिवस निवडण्यात आला आहे. सर्व आचारसंहितांचे पालन करून निघणाऱ्या या मोर्चात देशातील मराठा समाजाला आणण्याचे नियोजन केले जाईल. या नियोजन अभियानाची घोषणा ६ जूनला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे निमित्त साधत केली जाईल. व्यापक अभियानातून खेड्यापाड्यामधील मराठा तरुणापर्यंत पोहोचले जाईल. १३ जुलैला कोपर्डी येथील क्रांतिज्योतीला श्रद्धांजली वाहून अभियानाचा आढावा घेतला जाईल. एक वर्ष पूर्ण होत असतानाही कोपर्डीतील पीडितेला न्याय मिळाला नसल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली.राणीबाग मैदान ते आझाद मैदानपर्यंत धडक देणारा हा महामोर्चा खऱ्या अर्थाने देशव्यापी महामोर्चा ठरेल, असा दावाही समन्वयकांनी केला आहे. आतापर्यंत सरकारसोबत चर्चेसाठी एक चेहरा नसल्याने मराठा समाजाच्या प्रश्नांची सरकारने गंभीरतेने दखल घेतली नाही, असा आरोप समन्वयक राजेंद्र कोंडरे यांनी केला. ते म्हणाले की, मराठा विद्यार्थ्यांना शुल्कमाफी व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची प्रमुख मागणी येत्या आठवड्याभरात पूर्ण करण्याचे आवाहन सरकारला केले आहे. सरकारसोबत चर्चा करण्यासाठी आणि मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर २० महत्त्वाच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी एक समन्वय समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये शिक्षण, शेती आणि इतर क्षेत्रांतील जाणकारांसह मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे..................................इतर समाजांनी विरोध करू नये!मराठा समाजाला कोणत्याही जातीचे आरक्षण नको आहे. शिवाय अ‍ॅट्रोसिटी कायदा रद्द करण्याची मराठा क्रांती मोर्चाची मागणी नाही. तर अ‍ॅट्रोसिटी कायदा कडक करताना त्याचा गैरवापर होणार नाही, अशी तरतूद करण्याचा संघटनेचा आग्रह आहे. त्यामुळे कोणत्याही समाजाने मराठा क्रांती मोर्चा विरोधात मोर्चा काढण्याची गरज नसल्याचे मत नाना कुटे-पाटील यांनी व्यक्त केले.शेतकरी संपाला पाठिंबा१ जूनपासून संपावर जाणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना मराठा क्रांती मोर्चाने पाठिंबा घोषित केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रामाणिक आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चा पाठिंबा देईल, असेही समन्वय समितीने स्पष्ट केले.