शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

Maratha Kranti Morcha : औरंगाबादेतील दुर्दैवी घटनेस प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत – जयंत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 22:19 IST

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील अागर कांनडगाव इथे काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरीच्या पात्रात जलसमाधी घेतली.

मुंबई - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील अागर कांनडगाव इथे काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरीच्या पात्रात जलसमाधी घेतली. आषाढी एकादशीलाच घडलेल्या या दुर्दैवी घटनेस पोलिस व प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा जबाबदार आहे, आंदोलनकर्त्या तरुणांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून प्रशासनाने काकासाहेब शिंदे या आंदोलकाचा बळी घेतला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. याआधी मराठा समाजाने शांतपणे लाखोंच्या संख्येने मोर्चे काढले, इतके दिवस उलटूनही सरकारने अद्यापही मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. मराठा क्रांती मोर्चामधील तरूणांनी निवेदन दिले असताना आणि अशी घटना घडू शकते याबाबतची माहिती असतानाही प्रशासनाने कोणतीही आवश्यक खबरदारी घेतली नाही वा घटना रोखण्यासाठी पावले उचलली नाहीत, त्यामुळे प्रशासनाची दिरंगाईच यासाठी कारणीभूत असल्याची टीका पाटील यांनी केली आहे. 

या सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या, मुस्लिम आणि लिंगायत समाजाचे आरक्षण प्रलंबित आहे. ओबीसी समाजातील सर्व घटकांना सरकारने फसवी आश्वासने दिली, आता मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतही सरकार वेळकाढूपणाची भूमिका घेत आहे. दलित समाजातही असंतोष आहे. आरक्षणाबाबत पुनर्विचार करण्याची भाषा केंद्रीय मंत्री करतात. सरकारची पलायनवादी भूमिका याला कारणीभूत आहे. त्यामुळे सर्वच समाजांमध्ये एक असुरक्षिततेची भावना आहे. एवढी अशांतता, अस्थिरता याआधी महाराष्ट्राने कधी अनुभवली नव्हती, असा उद्वेग पाटील यांनी व्यक्त केला. 

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोणतेही राजकारण करायचे नाही. मराठा समाजाने शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करावे. आक्रमक होणे हे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही. आपल्या देशात लोकशाही आहे. तुम्ही मतांच्या माध्यमातून आपली नाराजी प्रकट करा, असे आवाहन त्यांनी आंदोलकर्त्या तरूणांना केले. तसेच सरकारने जनतेचा अंत पाहू नये, आरक्षणाबाबत त्वरित भूमिका घ्यावी, असे प्रतिपादन जयंत पाटील यांनी केले.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा