शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

मराठा क्रांती मोर्चाचा २७ आॅक्टोबरला मंत्रालयाला दुचाकी, चारचाकींनी घेराव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 06:29 IST

मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदनंतर राज्यभरात मराठा समाजाच्या तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुंबई : मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदनंतर राज्यभरात मराठा समाजाच्या तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील शेकडो गुन्हे खोटे असल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाने हे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा २७ आॅक्टोबरला मंत्रालयाला दुचाकी आणि चार चाकींचा घेराव घालण्याचा इशारा संघटनेच्या समन्वयकांनी मुंबई मराठी पत्रकार संघात शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.

समन्वयकांनी दिलेल्या माहितीनुसार, बंददरम्यान कोणतीही हिंसा केली नसतानाही, पोलिसांनी सरसकट गुन्हे दाखल केले आहेत. डॉक्टर, वकील आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या तरुणांवर दाखल झालेल्या या गुन्ह्यांमुळे एका पिढीचे आयुष्य वाया जाण्याची भीती आहे. त्यामुळे हे गुन्हे रद्द झाले नाही, तर भविष्यातील आंदोलनात हेच तरुण हिंसेचा मार्ग स्वीकारतील, असा इशाराही क्रांती मोर्चाने दिला आहे.

मराठ्यांना आरक्षण न देणाऱया सरकारने किमान मराठा समाजातील तरुणांना तरी गुन्हेगार होण्यास भाग पाडू नये, असे आवाहनही संघटनेने केले आहे. आतापर्यंत अशा प्रकारचे साडेतीन हजार गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार संबंधित गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, अन्यथा २७ आॅक्टोबरला हजारो दुचाकी आणि चार चाकी गाड्या मंत्रालयाला घेराव घालतील, असा इशारा समन्वयकांनी दिला.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMumbaiमुंबईMantralayaमंत्रालय