शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्या!

By admin | Updated: October 17, 2016 04:13 IST

मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसह ११ मागण्यांचे निवेदन ठाण्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांना मराठा क्रांती मोर्चातर्फे रविवारी देण्यात आले.

ठाणे : मराठा समाज हा परंपरेने शेती करणारा असून रूमणे अर्थात कुणबा धरणारा तो कुणबी अशी व्याख्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली असल्याने मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसह ११ मागण्यांचे निवेदन ठाण्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांना मराठा क्रांती मोर्चातर्फे रविवारी देण्यात आले.मराठा आणि कुणबी एकच असल्याचे पुरावे गेल्या ३५० वर्षांच्या कागदपत्रांत सापडतात. हे पुरावे असूनही शाळेमध्ये जन्माची नोंद करताना कुणबी लिहिले नाही, फक्त मराठा अशी नोंद आहे म्हणून कुणबी जातीचे प्रमाणपत्र नाकारण्यात येते. हा घोर अन्याय असून तो सरकारने तत्काळ दूर करावा व मराठा जात लिहिलेल्या सर्व अर्जदारांना मराठा-कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जमल्यानंतर तेथे युवतींनी त्याचे प्रतिनिधित्व केले. आपल्या भावना व्यक्त केल्या आणि आठ युवतींच्या शिष्टमंडळाने ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मुख्यमंत्र्यांसाठी ११ मागण्यांचे निवेदन दिले. तत्पूर्वी दोन युवतींनी निवेदन आणि प्रमुख मागण्यांचे वाचन जिल्हाधिकाऱ्यांसमोर केले.कोणीही नेता नसलेल्या या मोर्चाच्या शिस्तीचे अमेरिकेपासून जपानपर्यंत जगभरात सर्वांनी तोंडभरून कौतुक केले. परंतु, हा मूक मोर्चा कौतुकासाठी, गर्दीचे उच्चांक स्थापन करावे यासाठी नाही; तर शेती परवडत नाही. भरमसाट फीमुळे शिक्षण घेऊ शकत नाही, उद्योगासाठी भांडवल नाही, आरक्षण नाही म्हणून नोकरी नाही, अ‍ॅट्रॉसिटीसारखे जाचक कायदे, यातून आलेले नैराश्य व होणाऱ्या आत्महत्या, यासह एकंदरीतच व्यवस्थेविरोधात मराठा समाजाने मोर्चारूपाने व्यक्त केलेली ही खदखद आहे, अशा आशयाचे निवेदन वाचण्यात आले. त्यानंतर, युवतींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या वेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे, अन्य सरकारी व पोलीस अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)>मराठा क्रांती मोर्चात प्रामुख्याने कोपर्डी घटनेतील आरोपींविरोधातील खटला शीघ्रगतीने चालवणे, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील बदल, मराठा समाजासाठी नोकरी व शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण, मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळणे, आदिवासी क्षेत्रासाठीच्या पेसा कायद्याची चुकीच्या पद्धतीने चाललेली अंमलबजावणी थांबवणे, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे, जमीन संपादन करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणे बंद करणे, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांस आर्थिक मदत देणे आणि छत्रपती शिवरायांचे भव्य स्मारक मुंबईत उभारणे, या मागण्या व त्यावरील उपाययोजनांचे वाचन करण्यात आले.