शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्या!

By admin | Updated: October 17, 2016 04:13 IST

मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसह ११ मागण्यांचे निवेदन ठाण्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांना मराठा क्रांती मोर्चातर्फे रविवारी देण्यात आले.

ठाणे : मराठा समाज हा परंपरेने शेती करणारा असून रूमणे अर्थात कुणबा धरणारा तो कुणबी अशी व्याख्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली असल्याने मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसह ११ मागण्यांचे निवेदन ठाण्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांना मराठा क्रांती मोर्चातर्फे रविवारी देण्यात आले.मराठा आणि कुणबी एकच असल्याचे पुरावे गेल्या ३५० वर्षांच्या कागदपत्रांत सापडतात. हे पुरावे असूनही शाळेमध्ये जन्माची नोंद करताना कुणबी लिहिले नाही, फक्त मराठा अशी नोंद आहे म्हणून कुणबी जातीचे प्रमाणपत्र नाकारण्यात येते. हा घोर अन्याय असून तो सरकारने तत्काळ दूर करावा व मराठा जात लिहिलेल्या सर्व अर्जदारांना मराठा-कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जमल्यानंतर तेथे युवतींनी त्याचे प्रतिनिधित्व केले. आपल्या भावना व्यक्त केल्या आणि आठ युवतींच्या शिष्टमंडळाने ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मुख्यमंत्र्यांसाठी ११ मागण्यांचे निवेदन दिले. तत्पूर्वी दोन युवतींनी निवेदन आणि प्रमुख मागण्यांचे वाचन जिल्हाधिकाऱ्यांसमोर केले.कोणीही नेता नसलेल्या या मोर्चाच्या शिस्तीचे अमेरिकेपासून जपानपर्यंत जगभरात सर्वांनी तोंडभरून कौतुक केले. परंतु, हा मूक मोर्चा कौतुकासाठी, गर्दीचे उच्चांक स्थापन करावे यासाठी नाही; तर शेती परवडत नाही. भरमसाट फीमुळे शिक्षण घेऊ शकत नाही, उद्योगासाठी भांडवल नाही, आरक्षण नाही म्हणून नोकरी नाही, अ‍ॅट्रॉसिटीसारखे जाचक कायदे, यातून आलेले नैराश्य व होणाऱ्या आत्महत्या, यासह एकंदरीतच व्यवस्थेविरोधात मराठा समाजाने मोर्चारूपाने व्यक्त केलेली ही खदखद आहे, अशा आशयाचे निवेदन वाचण्यात आले. त्यानंतर, युवतींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या वेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे, अन्य सरकारी व पोलीस अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)>मराठा क्रांती मोर्चात प्रामुख्याने कोपर्डी घटनेतील आरोपींविरोधातील खटला शीघ्रगतीने चालवणे, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील बदल, मराठा समाजासाठी नोकरी व शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण, मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळणे, आदिवासी क्षेत्रासाठीच्या पेसा कायद्याची चुकीच्या पद्धतीने चाललेली अंमलबजावणी थांबवणे, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे, जमीन संपादन करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणे बंद करणे, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांस आर्थिक मदत देणे आणि छत्रपती शिवरायांचे भव्य स्मारक मुंबईत उभारणे, या मागण्या व त्यावरील उपाययोजनांचे वाचन करण्यात आले.