शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओ बंदी निर्णयाचा अनेकांचा धसका

By admin | Updated: August 21, 2014 22:17 IST

राज्यात एका कार्यालयावर किमान ५00 जणांना रोजगार

खामगाव: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आरटीओ कार्यालय बंद करण्याच्या घोषणोमुळे करुन भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पावले उचलली असली तरी आरटीओवर अवलंबून असणार्‍या सुमारे २५ ते २६ हजार दलाल व त्यांच्याकडे काम करणार्‍या लोकांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे. गडकरी यांनी आरटीओ व वाहतूक पोलिसांना डोळ्य़ासमोर ठेवून केलेली ही घोषणा आहे. केवळ आरटीओमध्ये भ्रष्टाचार होतो, असे म्हणणे चुकीचे ठरेल. घोषणा केली म्हणजे आरटीओ बंद झाले असे नाही. मोटर वाहन कायदा १९८९ नुसार आरटीओचा कारभार चालत असतो. आरटीओचे काम केवळ वाहन परवाना देणे इतके नसून नवीन गाडीचे रजिस्ट्रेशन, सार्वजनिक वाहनांना उदाहरणार्थ एसटी ला परमिट देणे, त्याशिवाय रिक्षा- टॅक्सीचे परमिट चालक, वाहक परवाना आदी कामे आरटीओलाच करावी लागतात. गेल्या १४ वर्षात वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे महसुलात २000 पासून २0१४ पर्यंत ४00 कोटी रुपयांवरुन साडेपाच हजार कोटी इतकी वाढ झाली आहे. त्या तुलनेत कर्मचार्‍यांच्या संख्येत वाढ झाली नाही. एवढेच नाहीतर अनेकांना आरटीओच्या नियमांची माहिती नसते. रांगेत उभे राहण्यास कोणी तयार नसते. त्यामुळे दलालांचा आधार घेतला जातो. त्यामुळे नागरिकांना परवान्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. यातील काही पैसे आरटीओच्या कर्मचारी व अधिकार्‍यांना मिळत असतीलही पण सरसकट आरटीओचे कर्मचारी व अधिकारी भ्रष्ट्राचारी आहेत, असे म्हणणे कितपत योग्य ठरेल. ** आरटीओ बंद करुन एक चांगली पर्यायी व्यवस्था आणणे योग्य असले तरी बेरोजगार होणार्‍या लोकांचे काय याचा विचार सरकारला करावाच लागेल. एका आरटीओवर ५00 कर्मचारी असतील तर राज्यातील सर्व कार्यालयावर किमान २५ ते २६ हजार लोकांना रोजगार मिळतो. ** नवी वाहतूक व्यवस्था आणने चांगले आहे. पण, एखादे सरकारी कार्यालय भ्रष्ट्रारी आहे. म्हणून त्यामध्ये सुधारणा करण्यापेक्षा बंद करण्याचा मार्ग कितपत योग्य आहे. असेही एका अधिकार्‍यांने सांगितले. ** आरटीओमध्ये १९ हजार कर्मचार्‍यांसह अधिकार्‍यांची साडेतीन हजार मंजूर पदे आहेत. यापैकी ३५ टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे परवाना अथवा गाडी रजिस्ट्रेशनसाठी विलंब होतो. त्यामुळेही लोक दलालांकडे वळत आहेत, असे आरटीओच्या अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.