शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
6
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
7
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
8
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
9
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
10
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
11
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
12
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
13
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
14
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
15
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
16
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
17
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
18
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
19
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
20
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...

आरटीओ बंदी निर्णयाचा अनेकांचा धसका

By admin | Updated: August 21, 2014 22:17 IST

राज्यात एका कार्यालयावर किमान ५00 जणांना रोजगार

खामगाव: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आरटीओ कार्यालय बंद करण्याच्या घोषणोमुळे करुन भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पावले उचलली असली तरी आरटीओवर अवलंबून असणार्‍या सुमारे २५ ते २६ हजार दलाल व त्यांच्याकडे काम करणार्‍या लोकांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे. गडकरी यांनी आरटीओ व वाहतूक पोलिसांना डोळ्य़ासमोर ठेवून केलेली ही घोषणा आहे. केवळ आरटीओमध्ये भ्रष्टाचार होतो, असे म्हणणे चुकीचे ठरेल. घोषणा केली म्हणजे आरटीओ बंद झाले असे नाही. मोटर वाहन कायदा १९८९ नुसार आरटीओचा कारभार चालत असतो. आरटीओचे काम केवळ वाहन परवाना देणे इतके नसून नवीन गाडीचे रजिस्ट्रेशन, सार्वजनिक वाहनांना उदाहरणार्थ एसटी ला परमिट देणे, त्याशिवाय रिक्षा- टॅक्सीचे परमिट चालक, वाहक परवाना आदी कामे आरटीओलाच करावी लागतात. गेल्या १४ वर्षात वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे महसुलात २000 पासून २0१४ पर्यंत ४00 कोटी रुपयांवरुन साडेपाच हजार कोटी इतकी वाढ झाली आहे. त्या तुलनेत कर्मचार्‍यांच्या संख्येत वाढ झाली नाही. एवढेच नाहीतर अनेकांना आरटीओच्या नियमांची माहिती नसते. रांगेत उभे राहण्यास कोणी तयार नसते. त्यामुळे दलालांचा आधार घेतला जातो. त्यामुळे नागरिकांना परवान्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. यातील काही पैसे आरटीओच्या कर्मचारी व अधिकार्‍यांना मिळत असतीलही पण सरसकट आरटीओचे कर्मचारी व अधिकारी भ्रष्ट्राचारी आहेत, असे म्हणणे कितपत योग्य ठरेल. ** आरटीओ बंद करुन एक चांगली पर्यायी व्यवस्था आणणे योग्य असले तरी बेरोजगार होणार्‍या लोकांचे काय याचा विचार सरकारला करावाच लागेल. एका आरटीओवर ५00 कर्मचारी असतील तर राज्यातील सर्व कार्यालयावर किमान २५ ते २६ हजार लोकांना रोजगार मिळतो. ** नवी वाहतूक व्यवस्था आणने चांगले आहे. पण, एखादे सरकारी कार्यालय भ्रष्ट्रारी आहे. म्हणून त्यामध्ये सुधारणा करण्यापेक्षा बंद करण्याचा मार्ग कितपत योग्य आहे. असेही एका अधिकार्‍यांने सांगितले. ** आरटीओमध्ये १९ हजार कर्मचार्‍यांसह अधिकार्‍यांची साडेतीन हजार मंजूर पदे आहेत. यापैकी ३५ टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे परवाना अथवा गाडी रजिस्ट्रेशनसाठी विलंब होतो. त्यामुळेही लोक दलालांकडे वळत आहेत, असे आरटीओच्या अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.