शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

मंत्रालयात भरली हौशा-नवशांची जत्रा!

By admin | Updated: January 14, 2015 05:04 IST

मंत्रालयात होणारी गर्दी कमी करण्यासाठी प्रवेश पद्धत सुलभ करण्याचा विचार नवे सरकार करीत असताना दुसरीकडे गर्दीचा ओघ वाढतच आहे

मुंबई : मंत्रालयात होणारी गर्दी कमी करण्यासाठी प्रवेश पद्धत सुलभ करण्याचा विचार नवे सरकार करीत असताना दुसरीकडे गर्दीचा ओघ वाढतच आहे. मंगळवारी तर कडेलोट झाला. तब्बल ५२ हजार अभ्यागतांनी एकच गर्दी केल्यामुळे मंत्रालयाचे व्यवस्थापन कोलमडून गेले. हौशे, नवशे आणि बघ्यांच्या गर्दीमुळे मंंत्रालयाला अक्षरश: जत्रेचे स्वरूप आले आहे.नवे सरकार सत्तेत आल्यापासून मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांचा ओघ वाढला आहे. या आधी मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी फार तर १२ ते १५ हजार लोक मंत्रालयात येत असत. आज त्याच्या पाचपट गर्दी होती. खरेतर अभ्यागतांना दुपारी २ नंतर मंत्रालयात प्रवेश दिला जातो; पण आज मंत्र्यांच्या दालनात सकाळपासूनच कार्यकर्त्यांची तोबा गर्दी होती. अनाहूत गर्दीने मंत्र्यांसह अधिकाऱ्यांचा कोंडमारा होण्याची वेळ आली. मंत्र्यांच्या दालनात तर पाय ठेवायलाही जागा नव्हती. अधिकारी-कर्मचाऱ्यांना काम करणेही अशक्य झाले. त्यामुळे मंत्र्यांचे पीए, पीएस, ओएसडी हैराण झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंड, महसूल मंत्री एकनाथ खडसे, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे येणाऱ्या अभ्यागतांची संख्या अधिक असते. मंत्रालयात गर्दी करणाऱ्यांमध्ये हौशे-नवसे कार्यकर्त्यांचाच अधिक भरणा असतो. एकेका आमदारासोबत दहा-पंधरा कार्यकर्ते येत असतात. त्यापैकी एक-दोघांचेच तेवढे काम असते, बाकीचे सगळे बघ्ये! अशा बघ्यांमुळे मंत्रालयाला अक्षरश: जत्रेचे स्वरूप आले आहे. (विशेष प्रतिनिधी)