शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

“आरक्षण मिळेल तेव्हाच आमच्यासाठी खरे नववर्ष, २५ जानेवारीला...”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 10:37 IST

Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर टीका केली आहे.

Manoj Jarange Patil News: राज्यात एकीकडे बीड आणि परभणीतील प्रकरणांवरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच दुसरीकडे मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. बीड प्रकरणासंदर्भात करण्यात आलेल्या आंदोलनातही मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थिती लावली होती. यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारला अल्टिमेटम दिला आहे. तसेच सरकारवर निशाणा साधत आहेत.

नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथील खंडोबारायाचे मनोज जरांगे पाटील यांनी दर्शन घेतले. यावेळी पूजा करून मनोज जरांगे पाटील यांनी गोरगरीब मराठ्यांवर अन्याय होत आहे. त्यांना आरक्षण मिळू दे, शेतकरी अडचणीत आहे त्यांना बळ मिळू दे, सरकारने शेतकर्‍यांना मदत करावी, असा आशीर्वाद आपण खंडोबाकडे मागितल्याचे सांगितले. नवीन वर्ष आम्हाला आहे की नाही असे वाटत आहे. सुख आमच्या वाट्याला नाही. आरक्षण नसल्यामुळे गरिबांच्या लेकराच्या आयुष्याचे नुकसान होत आहे. नवीन वर्ष येतात जातात, पण आम्हाला न्याय कधी मिळेल याची अपेक्षा आहे. खरे नवीन वर्ष ज्या दिवशी आरक्षण मिळेल त्या दिवशी असेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

शेवटची टक्कर द्यायची, अंतिम लढाई करून आरक्षण मिळवायचे आहे

राज्यात बहुमताच सरकार आहे. तेव्हादेखील हेच होते ना. नुसते खांदे बदलले. पूर्वीही तेच होते आत्ता ही तेच आहेत . मराठ्यापुढे सरकार काही करत नाही. आमचे आंदोलन सरकार गांभीर्याने घेईल का नाही, हे आम्ही बघू आता. आतापर्यंत ढकलाढकली होती . आता मुख्यमंत्री फडणवीस आहेत. त्यांना २५ तारखेपर्यंत काही बोलणार पण नाही, नंतर सोडणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. देवेंद्र फडणवीस म्हणत होते की, मी कोणाला अडसर नाही. एकनाथ शिंदे यांना विचारा की, मी अडसर आहे का ते. आता लक्षात येईल. कारण आता तेच मुख्यमंत्री आहेत. २५ तारखेपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढतेत की नाही, ते स्पष्ट होईल. आमरण उपोषण २५ जानेवारीला फायनल आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, गृहमंत्रालयावर समाधानी असण्याचे कारण नाही . मस्साजोग आणि परभणीत जीव गेला. मस्साजोग प्रकरणात आणखी आरोपी फरार आहेत. धनंजय मुंडेनी राजीनामा द्यावा का त्याबद्दल मला माहिती नाही . मला एवढेच माहिती आहे , या प्रकरणात जे येतील, मग मंत्री असो , आमदार असो की राष्ट्रपती असो, सुट्टी द्यायची नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण