शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

“छत्रपती शिवरायांपेक्षा कुणी मोठे नाही, अपशब्द काढणाऱ्यांना रट्टे द्या”; मनोज जरांगे संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 19:11 IST

Manoj Jarange Patil News: छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी जीव की प्राण आहेत, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

Manoj Jarange Patil News: मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यातील सुटकेबाबत मोठे विधान केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून सुटण्यासाठी पेटारे-बिटारे असे काहीच नव्हते, छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परतले, असा दावा राहुल सोलापूरकर यांनी केला होता. या विधानावरुन आता राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. यातच मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठीच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनीही याबाबत प्रतिक्रिया देताना तीव्र संताप व्यक्त केला.

मराठा आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरावली सराटीमध्ये उपोषण सुरू केले होते. त्यानंतर त्यांनी उपोषण स्थगित करून उपचार घेण्यासाठी गॅलेक्सी हॉस्पिटल येथे भरती झाले असता त्यांच्यावर पाच दिवस उपचार सुरू होते. त्यांना डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला असून, ते त्यांच्या मूळ गावी निघाले आहे. त्याआधी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या विधानाचा खरपूस शब्दांत समाचार घेतला.

छत्रपती शिवरायांपेक्षा कुणी मोठे नाही

राहुल सोलापूरकर यांच्या विधानाचा जाहीर निषेध आहे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांचा केवळ निषेध करून भागणार नाही, अशांना नीट रट्टे दिले पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जेल भोगले, तर काही हरकत नाही. अशा लोकांचा माज आणि मस्ती उतरवायला हवी. ही अशी माणसे पटकन काही बोलून जातात. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी जीव की प्राण आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलले, त्यांना हाणायचे, सोडायचे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा कुणीही मोठे नाही, या शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी हल्लाबोल केला. 

दरम्यान, ज्या लोकशाहीमध्ये आपण वावरतो त्या लोकशाहीचा पाया छत्रपती शिवाजी महाराज यांनी रचला. त्यांनी स्वत:चे कुटुंब कधी पाहिले नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीच तडजोड केली नाही, त्यांच्याबद्दल गलिच्छ विधान केली जातात. दोन, तीन दिवसापूर्वी असंच एक विधान केले. या विधानामुळे अनेक शिवभक्तांना वेदना झाल्या. हा राहुल सोलापूरकर कोण आहे? अशी लोक काही लाच घेतात, त्यांनी लाचे पलिकडे काही समजत नाही. हे लोक बोलत असताना काहीही बोलतात. अशा लोकांच्या जिभा हासडल्या पाहिजेत. अशा लोकांना जनतेने दिसेल तिथे ठेचले पाहिजे, असा सांगत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज