शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

"मी जीवघेणा प्रवास सुरू केलाय, तुम्ही आरक्षण नाही दिले ना..."; मनोज जरांगेंचा शिंदे सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 13:51 IST

Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे पाटील यांच्या सहाव्या आमरण उपोषणाचा पहिला दिवस. तुमचे बारा-तेरा वाजल्याशिवाय सोडणार नाही : मनोज जरांगे पाटील  

लोकमत न्यूज नेटवर्क 

वडीगोद्री : मी जीवघेणा प्रवास सुरू केलाय, तुम्ही आरक्षण नाही दिले ना, मग तुमचे बारा-तेरा वाजल्याशिवाय सोडणार नाही. माझ्या नावाने नंतर बोंबलायचे नाही. मराठ्यांचे पोरं सोपे नाही. 2024 ला तुमचा भुगा करणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सरकारला दिला आहे.

अंतरवाली सराटी येथे सोमवारी मध्यरात्री मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरूवात केली असून सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी व्हावी, मराठ्याना ओबीसी तून आरक्षण मिळावे या मागणी साठी त्यांचे हे मुक्ती संग्राम दिनी सहावे उपोषण आहे. 

आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, महायुती असो महाविकास आघाडी असो तिकडे खड्ड्यात जा; पडा नाहीतर निवडून या नाहीतर वाकडे तिकडे व्हा, आम्हाला काहीही देणेघेणे नाही. सरकारशी बोलण्यासाठी त्यांनी यावे म्हणून आंदोलन नाही करत केव्हाच आपल्या ताकदीवर आणि समाजावर विश्वास आहे. मला राजकीय स्टेटमेंट करायचे नाही, फडणवीस साहेब म्हणतात ना राजकीय भाषा बोलतात. काम न करणाऱ्याला लोक कसा फायदा होऊन देतील. तुम्ही फायदा केला तर उघड्या डोळ्याने समाज बघतो ना कोणी फायदा केला तर आम्हाला राजकीय स्टेटमेंट करायचं नाही आम्ही फडणवीस यांना संधी दिली, असे जरांगे म्हणाले. 

तुम्ही आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा. आमच्या सगळ्या मागण्या सगळ्यांच्या पाठ झाल्या आहेत. मला माझा समाज सांगतो की आता उपोषण नाही करायचे. तुम्ही फक्त सांगा कोणाला पाडायचे कोणाला उभे करायचे. माझ्या समाजाला राजकारणात जायचे नाही आम्हाला काही गरज नाही, असा इशारा जरांगे यांनी शिंदे सरकारला दिला आहे.

बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर टीका 

मला राजकीय बोलायचे नाही. मी आता राजकीय भाषा बोलणार नाही. फडणवीस साहेबांना संधी दिली. माकडचाळे करण्यापेक्षा, चोरटे पुढे घालण्यापेक्षा यांनी तिकडे ताकद लावायची. आता त्यांनी (राजेंद्र राऊत) फडणवीस साहेबांना सांगायचे की तो गप बसलाय राजकीय भाषा बोलत नाही. त्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी करा. फडणवीस साहेबांना ही संधी आहे. माझ्या गोरगरीब मराठ्यांना आरक्षण द्या. मला समोरून कितीही बोलले तरी मी राजकीय भाषा बोलणार नाही, असे जरांगे म्हणाले.

अंबडचे तहसीलदार यांनी घेतली भेट

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला सुरुवात केली. आज अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी अंतरवाली सराटीत येऊन मनोज जरांगे यांची भेट घेऊन आमरण उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यावर बोलतांना जरांगे म्हणाले त्यांच्या हातात काही नाही. त्यांना दोष देऊन फायदा नाही. ते बिचारे अधिकारी आहेत. त्यांचे काम करत आहेत. याच्यात मुख्य फडणवीस साहेब, मंत्र्यांना आमदारांना काम करून देत नाहीत. मराठा समाजाला साक्षी ठेवून फडणवीस यांना एक संधी दिली. आरक्षण नाही दिले तर दोषी फडणवीस साहेब, जाणून-बुजून मराठ्यांचा वाटोळ करायला निघाला, अशी टीका जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण