शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

"मी जीवघेणा प्रवास सुरू केलाय, तुम्ही आरक्षण नाही दिले ना..."; मनोज जरांगेंचा शिंदे सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 13:51 IST

Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे पाटील यांच्या सहाव्या आमरण उपोषणाचा पहिला दिवस. तुमचे बारा-तेरा वाजल्याशिवाय सोडणार नाही : मनोज जरांगे पाटील  

लोकमत न्यूज नेटवर्क 

वडीगोद्री : मी जीवघेणा प्रवास सुरू केलाय, तुम्ही आरक्षण नाही दिले ना, मग तुमचे बारा-तेरा वाजल्याशिवाय सोडणार नाही. माझ्या नावाने नंतर बोंबलायचे नाही. मराठ्यांचे पोरं सोपे नाही. 2024 ला तुमचा भुगा करणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सरकारला दिला आहे.

अंतरवाली सराटी येथे सोमवारी मध्यरात्री मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरूवात केली असून सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी व्हावी, मराठ्याना ओबीसी तून आरक्षण मिळावे या मागणी साठी त्यांचे हे मुक्ती संग्राम दिनी सहावे उपोषण आहे. 

आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, महायुती असो महाविकास आघाडी असो तिकडे खड्ड्यात जा; पडा नाहीतर निवडून या नाहीतर वाकडे तिकडे व्हा, आम्हाला काहीही देणेघेणे नाही. सरकारशी बोलण्यासाठी त्यांनी यावे म्हणून आंदोलन नाही करत केव्हाच आपल्या ताकदीवर आणि समाजावर विश्वास आहे. मला राजकीय स्टेटमेंट करायचे नाही, फडणवीस साहेब म्हणतात ना राजकीय भाषा बोलतात. काम न करणाऱ्याला लोक कसा फायदा होऊन देतील. तुम्ही फायदा केला तर उघड्या डोळ्याने समाज बघतो ना कोणी फायदा केला तर आम्हाला राजकीय स्टेटमेंट करायचं नाही आम्ही फडणवीस यांना संधी दिली, असे जरांगे म्हणाले. 

तुम्ही आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा. आमच्या सगळ्या मागण्या सगळ्यांच्या पाठ झाल्या आहेत. मला माझा समाज सांगतो की आता उपोषण नाही करायचे. तुम्ही फक्त सांगा कोणाला पाडायचे कोणाला उभे करायचे. माझ्या समाजाला राजकारणात जायचे नाही आम्हाला काही गरज नाही, असा इशारा जरांगे यांनी शिंदे सरकारला दिला आहे.

बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर टीका 

मला राजकीय बोलायचे नाही. मी आता राजकीय भाषा बोलणार नाही. फडणवीस साहेबांना संधी दिली. माकडचाळे करण्यापेक्षा, चोरटे पुढे घालण्यापेक्षा यांनी तिकडे ताकद लावायची. आता त्यांनी (राजेंद्र राऊत) फडणवीस साहेबांना सांगायचे की तो गप बसलाय राजकीय भाषा बोलत नाही. त्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी करा. फडणवीस साहेबांना ही संधी आहे. माझ्या गोरगरीब मराठ्यांना आरक्षण द्या. मला समोरून कितीही बोलले तरी मी राजकीय भाषा बोलणार नाही, असे जरांगे म्हणाले.

अंबडचे तहसीलदार यांनी घेतली भेट

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला सुरुवात केली. आज अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी अंतरवाली सराटीत येऊन मनोज जरांगे यांची भेट घेऊन आमरण उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यावर बोलतांना जरांगे म्हणाले त्यांच्या हातात काही नाही. त्यांना दोष देऊन फायदा नाही. ते बिचारे अधिकारी आहेत. त्यांचे काम करत आहेत. याच्यात मुख्य फडणवीस साहेब, मंत्र्यांना आमदारांना काम करून देत नाहीत. मराठा समाजाला साक्षी ठेवून फडणवीस यांना एक संधी दिली. आरक्षण नाही दिले तर दोषी फडणवीस साहेब, जाणून-बुजून मराठ्यांचा वाटोळ करायला निघाला, अशी टीका जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण