शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
5
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
6
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
7
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
8
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
9
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
10
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
13
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
14
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
15
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
16
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
17
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
18
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
19
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
20
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...

“ST कर्मचाऱ्यांचे हाल देवेंद्र फडणवीस यांनी चालवले”; संपावरुन मनोज जरांगेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 18:29 IST

Manoj Jarange Patil ST Strike News: एसटी कर्मचारी आणि शेतकऱ्यांना वेठीस धरले, तर आम्ही सरकारचा कार्यक्रम लावल्याशिवाय थांबणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

Manoj Jarange Patil ST Strike News: ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभरात संप पुकारला आहे. राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामुळे अनेक ठिकाणी प्रवाशांचे हाल झाले. यातच एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एसटी कामगार कृती समितीत एक बैठक होणार आहे. त्यात तोडगा निघेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. मंत्री उदय सामंत यांच्यासह एक बैठक झाली. परंतु, ती निष्फळ ठरली. यानंतर आता मराठा आरक्षणाची आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी एसटी आंदोलनावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. 

पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांचे हाल देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या सरकारपासून चालवले आहेत. आता त्यांचे सरकार आहे, तरीही एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत. सर्वांची सेवा करणारा एसटी कर्मचारी आहे. त्यांचे प्रश्न का ऐकले जात नाहीत. त्यांचा पगार का वाढवू नये. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या का मान्य केल्या जात नाहीत. त्यांना घरे, मुलं-बाळं नाहीत का, त्यांना संसार नाही का, एसटी कर्मचारी त्याचा संसार सोडून जनतेची सेवा करत आहे. त्याचा संसार तुम्ही बुडवायला लागले आणि तुमचा सरकारचा संसार मोठा करायला लागले. तुम्ही तुमचे लोक आंदोलनात घुसवले, असा मोठा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

...तर सरकारचा कार्यक्रम संपवणार

एसटी कर्मचाऱ्यांचा, शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावला नाही, तर सरकारचा कार्यक्रम संपवणार. फडणवीस यांनी आंदोलनांमध्ये पेरलेले लोक आता समस्यांना वाढवण्याचे काम करत आहेत. आता लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक झालीच पाहिजे, नाहीतर हा संघर्ष थांबणार नाही, असे जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांना सरकारसमोर मांडण्याचे आणि त्यांची तातडीने सोडवणूक न झाल्यास संघर्षाला पुढे नेण्याचे इशारा दिला आहे.

दरम्यान, जरांगे पाटील यांनी सरकारकडे तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. निसर्गाने शेतकऱ्यांशी दगा फटका केला आहे, परंतु सरकारने दगा करू नये. सरकारने जर शेतकऱ्यांना वेठीस धरले, तर आम्ही सरकारचा कार्यक्रम लावल्याशिवाय थांबणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :ST Strikeएसटी संपManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस