शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
3
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
4
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
5
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
6
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
7
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
8
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
9
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
10
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
11
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
12
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
13
Video - "मी GPS लावला होता..."; हॉटेलमध्ये बायकोला रंगेहाथ पकडल्यावर ढसाढसा रडला नवरा
14
जागावाटपावरून महायुतीत तणाव! मुंबईत शिंदेसेनेला हव्यात १०० हून अधिक जागा, भाजपाचा प्लॅन बी तयार
15
वसंत मोरे मनसे कार्यालयात जाणार; ठाकरे बंधू युतीमुळे पुण्यात पदाधिकाऱ्यांमधील रुसवे फुगवे दूर
16
IPL ऑक्शनच्या दिवशीच परफेक्ट ऑडिशन! व्यंकटेश अय्यरचा SMAT स्पर्धेतील टी-२० सामन्यात मोठा धमाका
17
पश्चिम बंगालमध्ये लाखो मतदारांची नावं वगळली, SIRच्या मसुदा यादीतून धक्कादायक आकडेवारी समोर 
18
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
19
ICICI Prudential IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आज अखेरची संधी; GMP ₹३०० च्या पार, धमाकेदार लिस्टिंगचे संकेत
20
पीएम नरेंद्र मोदी जॉर्डनच्या दौऱ्यावर; भारतासाठी का महत्वाचा आहे हा देश? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

“देशमुख कुटुंबाचा अपमान होईल अशी भूमिका CM फडणवीसांनी घेऊ नये, अन्यथा...”: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 16:04 IST

Manoj Jarange Patil News: बीड प्रकरणातील एक आरोपी सुटला, तरी देशमुख कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

Manoj Jarange Patil News: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. पोलिसांची पथकांनी महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात त्याचा शोध सुरू केला आहे. पण, अजूनही त्याचा पत्ता लागलेला नाही. यामुळे आता पोलिसांनी कृष्णा आंधळे यांला वान्टेड घोषित केले आहे. तर दुसरीकडे वाल्मीक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बीड प्रकरणावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील पहिल्या दिवसापासून आक्रमक झाले आहेत. बीड प्रकरणावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकावर टीका केली आहे. 

मीडियाशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, खून करणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचणारा सगळ्यात मोठा गु्न्हेगार आहे. देशमुख कुटुंब तुमच्या घरी आले, त्या कुटुंबाचा अपमान होईल, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊ नये. या प्रकरणातील एक आरोपी जरी सुटला तरी देशमुख कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. न्यायदेवता न्याय करेल आणि आरोपींना फासावर लटकवेल, अशी अपेक्षा मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली.

गुंडाच्या टोळ्या चालवणाऱ्यांना पाठीशी घालणार असाल तर हा महाराष्ट्राला कलंक

गुंडाच्या टोळ्या चालवणाऱ्यांना पाठीशी घालणार असाल तर हा महाराष्ट्राला कलंक आहे. मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर मराठा समाज शांत आहे. मुख्यमंत्र्यांना आपले कुटुंब म्हणून देशमुख कुटुंबाकडे पाहावे लागणार आहे. तुम्ही जर एखाद्या आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्राची जनता शांत बसणार नाही. मी संतोष देशमुख यांना न्याय मागतो तर मी जातीयवादी आहे का? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला.

दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांना देखील सहआरोपी केले पाहिजे. सांभाळणाऱ्यांना सहआरोपी करत नाहीत. सरकार यांना पाठीशी घालत आहे का? मुख्यमंत्री, एसआयटी, सीआयडी, आणि पोलिस प्रशासनाकडून एक आशा आहे ते एकाही आरोपी सुटू देणार नाहीत. या गुंडाचे राज्यात खूप मोठे नेटवर्क आहे. राज्यात खूप मोठी साखळी आहे, ते संपूर्ण बाहेर काढून त्यांना अटक करायला हवी. हे मुख्यमंत्री करतीलच. नाहीतर आम्ही राज्य बंद पाडू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. 

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील