शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
4
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
5
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
6
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
7
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
8
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
9
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
10
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
11
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
12
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
13
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
14
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
15
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
16
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
17
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
18
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
19
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
20
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?

मनपाला मिळणार संजीवनी

By admin | Updated: October 23, 2014 00:30 IST

एलबीटी (सथानिक संस्था कर) मुळे डबघाईस आलेल्या नागपूर महापालिकेला आता संजीवनी मिळण्याची चिन्हे आहेत. केंद्रात भाजपचे सरकार आले. त्या पाठोपाठ आता राज्यातही फेरबदल होऊन

केंद्रानंतर राज्यातही सत्ता : विशेष अनुदान मिळण्याची अपेक्षा नागपूर : एलबीटी (सथानिक संस्था कर) मुळे डबघाईस आलेल्या नागपूर महापालिकेला आता संजीवनी मिळण्याची चिन्हे आहेत. केंद्रात भाजपचे सरकार आले. त्या पाठोपाठ आता राज्यातही फेरबदल होऊन भाजपचे सरकार स्थापन होत आहे. मुख्यमंत्रीही नागपूरचाच होईल, अशी चिन्हे आहेत. केंद्रातील व राज्यातील भाजपचे सरकार नागपुरात भाजपच्या ताब्यात असलेल्या महापालिकेतील मदत करेल, अशी अपेक्षा सत्ताधाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.आघाडी सरकारने एलबीटी लागू केला. त्याला भाजपने कडाडून विरोध केला. व्यापाऱ्यांचे समर्थन केले. लोकसभा निवडणुकीत याचा परिणाम दिसून आला. व्यापाऱ्यांनी भाजपला एकतर्फी कौल दिला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही शहरातील सहाच्या सहाही जागा भाजपच्या पदरात टाकल्या. राज्यातील भाजप सरकार याची दखल घेईल व एलबीटी रद्द करून महापालिकेचे उत्पन्न वाढविणारा नवा पर्याय दईल, असा विश्वास महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना आहे. महापालिकेत काँग्रेसची सत्ता असताना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी नागपूर महापालिकेला दरवर्षी विशेष अनुदान देण्याची घोषणा केली होती.सुरुवातीची दोन वर्षे काही प्रमाणात अनुदान मिळाले. पण महापालिकेत सत्ताबदल होऊन भाजपचे सरकार येताच राज्य सरकारकडून येणारे विशेष अनुदान थांबले. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्षांनी वेळोवेळी मुख्यमंत्र्यांना निधीसाठी गळ घातली, मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही.गेल्या हिवाळी अधिवेशनात तर तत्कालीन महापौर अनिल सोले यांना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महापालिकेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी वेळही दिली नाही. आता सत्ताबदलामुळे आशा पल्लवित झाल्या आहेत. राज्य सरकारकडे महापालिकेचे अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत. पाण्याची वाढीव बिले कमी करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. जेएनएनयुआरएम प्रकल्पांतर्गतसुरू असलेल्या कामांसाठी स्वत:च्या वाट्याची रक्कम भरण्यासाठी महापालिकेकडे पैसे नाहीत. रजिस्ट्रीवर आकारण्यात येणाऱ्या एक टक्का एलबीटीची रक्कम शासनाकडे थकीत आहे. असे सर्व प्रश्न आता तडकाफडकी निकाली निघतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.(प्रतिनिधी)नागपूरसाठी विशेष अनुदान मिळावे५७२ व १९०० ले-आऊट अंतर्गत येणाऱ्या अनधिकृत ले-आऊटच्या विकासासाठी नासुप्रने नागरिकांकडून विकास शुल्क आकारले होते. त्यात काही विकास कामे करण्यात आली. मात्र, आता आपल्याकडील विकास निधी संपल्याचे सांगत नासुप्रने हात वर केले आहे. शिवाय एलबीटीचे कारण देत महापालिकेनेही विकास कामांना कात्री लावली आहे. यामुळे झपाट्याने वाढत असलेले नागपूर शहर भविष्यात एक नियोजनशून्य व मागाश शहर होण्याचा धोका नाकारता येत नाही. ही परिस्थिती बदलून येथील विकास कामांना गती देण्यासाठी राज्य सरकारने महापालिका व नासुप्रला विशेष अनुदान द्यावे, अशी अपेक्षा नागपूरकर व्यक्त करीत आहेत.