शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

शेतीतून साधला ‘माणिक’ने उद्योग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2017 16:43 IST

शेतकरी दिवसेंदिवस प्रगत होत आहे. नवनविन प्रयोग करुन शेती परवडण्यासारखी नाही म्हणणा-यांच्या समोर काही शेतकरी आदर्श ठरत आहेत.

ऑनलाइन लोकमत/ शंकर वाघ
 
शिरपूर जैन (वाशिम) दि. 25 - शेतकरी दिवसेंदिवस प्रगत होत आहे. नवनविन प्रयोग करुन शेती परवडण्यासारखी नाही म्हणणा-यांच्या समोर काही शेतकरी आदर्श ठरत आहेत. रिसोड तालुक्यातील किनखेडा ‘माणिक’ नामक युवा शेतक-याने शेतीत उसाची लागवड करुन बाजुलाच रसवंती व्यवसाय सुरु करुन शेतीला उद्योगाची जोड दिली आहे. यामधून त्याला दरमहा ६० ते ६५ हजार रुपयांचा व्यवसाय होत आहे.  या शेतक-याची मेहनत व युक्ती पाहून अनेक शेतक-यांनी याच परिसरात शेतातील डाळींब, पपई विकणे सुरु केल्याचे दिसून आले.
पश्चिम महाराष्ट्रात जात असतांना रस्त्यांवर अनेक शेतकरी बसून हुरडा, हळद, आंबे यासह अनेक शेतीतून निघणारी फळे, भाजी विकतांना दिसून येतात. विदर्भात हे प्रमाण फारच कमी असले तरी वाशिम जिल्हयातील मराठवाड्याकडे जाणारा रस्ता वगळता चोहोबाजूने शेतक-यांनी शेतीतून होत असलेले उत्पन्न बाजारात न नेताच स्वत विक्री करीत असल्याने याचा त्यांना चांगला फायदा होत आहे. रिसोड तालुक्यातील युवा शेतकरी माणिक पंढरराव अवचार यांच्याकडे साडेचार एकर शेती आहे. या शेतीमधील केवळ अर्धा एकर शेतात उसाची लागवड ते सतत करतात. यामधून त्यांना दरवर्षी चांगले उत्पन्न होते. परंतु यावर्षी उसाला पाहिजे तसे भाव नसल्याने त्यांनी रसवंती सुरु करुन स्वताच्या शेतातील उस तेथे वापरणे सुरु केले. यामधून त्यांना फार मोठया प्रमाणात फायदा झाला. हिवाळा असतांना सुध्दा अनेक गाडया रसवंती मालेगाव - रिसोड  महामार्गावर असल्याने थांबतात. अर्ध्या एकरात लावलेला हा उस त्यांना मे महिन्यापर्यंत पुरतो. यामधून त्यांना संपूर्ण ऊस काढणीपर्यंत ३ ते साडे तीन लाख रुपये उत्पन्न होत असल्याचे ते सांगतात. प्रत्येक शेतक-याने स्वताच्या शेतात पिकणारे पिकाचा असा प्रयोग केला तर नक्कीच शेतकरी सुखी झाल्याशिवाय राहणार नसल्याचे माणिक यांचे मत आहे.
 
उसाला भाव नसल्याने डोक्यात आले रसवंती सुरु करुन या उसाचे पैसे करावे. हिवाळा आहे लोकं मुर्खात काढतील आधी असे वाटले. उसाच्या शेताच्या बाजुलाच धु-यानजिक रसवंती टाकली जेणे करुन उसाची ने आण करण्यासाठी खर्च येवून नये. पहिल्यादिवशी ५५० रुपयांचा व्यवसाय झाला. दोन तीन दिवसानंतर यात वाढ होत गेली. आजच्या घडीला दोन ते अडीच हजार रुपये व्यवसाय रोज होत आहे.
- माणिक पंढरराव अवचार
शेतकरी, किनखेडा