शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
2
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
3
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
4
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
5
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
6
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
8
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
9
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
10
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
11
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
12
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
14
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
15
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
16
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
17
Vijay Mallya : 'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
18
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
19
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?

शेतीतून साधला ‘माणिक’ने उद्योग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2017 16:43 IST

शेतकरी दिवसेंदिवस प्रगत होत आहे. नवनविन प्रयोग करुन शेती परवडण्यासारखी नाही म्हणणा-यांच्या समोर काही शेतकरी आदर्श ठरत आहेत.

ऑनलाइन लोकमत/ शंकर वाघ
 
शिरपूर जैन (वाशिम) दि. 25 - शेतकरी दिवसेंदिवस प्रगत होत आहे. नवनविन प्रयोग करुन शेती परवडण्यासारखी नाही म्हणणा-यांच्या समोर काही शेतकरी आदर्श ठरत आहेत. रिसोड तालुक्यातील किनखेडा ‘माणिक’ नामक युवा शेतक-याने शेतीत उसाची लागवड करुन बाजुलाच रसवंती व्यवसाय सुरु करुन शेतीला उद्योगाची जोड दिली आहे. यामधून त्याला दरमहा ६० ते ६५ हजार रुपयांचा व्यवसाय होत आहे.  या शेतक-याची मेहनत व युक्ती पाहून अनेक शेतक-यांनी याच परिसरात शेतातील डाळींब, पपई विकणे सुरु केल्याचे दिसून आले.
पश्चिम महाराष्ट्रात जात असतांना रस्त्यांवर अनेक शेतकरी बसून हुरडा, हळद, आंबे यासह अनेक शेतीतून निघणारी फळे, भाजी विकतांना दिसून येतात. विदर्भात हे प्रमाण फारच कमी असले तरी वाशिम जिल्हयातील मराठवाड्याकडे जाणारा रस्ता वगळता चोहोबाजूने शेतक-यांनी शेतीतून होत असलेले उत्पन्न बाजारात न नेताच स्वत विक्री करीत असल्याने याचा त्यांना चांगला फायदा होत आहे. रिसोड तालुक्यातील युवा शेतकरी माणिक पंढरराव अवचार यांच्याकडे साडेचार एकर शेती आहे. या शेतीमधील केवळ अर्धा एकर शेतात उसाची लागवड ते सतत करतात. यामधून त्यांना दरवर्षी चांगले उत्पन्न होते. परंतु यावर्षी उसाला पाहिजे तसे भाव नसल्याने त्यांनी रसवंती सुरु करुन स्वताच्या शेतातील उस तेथे वापरणे सुरु केले. यामधून त्यांना फार मोठया प्रमाणात फायदा झाला. हिवाळा असतांना सुध्दा अनेक गाडया रसवंती मालेगाव - रिसोड  महामार्गावर असल्याने थांबतात. अर्ध्या एकरात लावलेला हा उस त्यांना मे महिन्यापर्यंत पुरतो. यामधून त्यांना संपूर्ण ऊस काढणीपर्यंत ३ ते साडे तीन लाख रुपये उत्पन्न होत असल्याचे ते सांगतात. प्रत्येक शेतक-याने स्वताच्या शेतात पिकणारे पिकाचा असा प्रयोग केला तर नक्कीच शेतकरी सुखी झाल्याशिवाय राहणार नसल्याचे माणिक यांचे मत आहे.
 
उसाला भाव नसल्याने डोक्यात आले रसवंती सुरु करुन या उसाचे पैसे करावे. हिवाळा आहे लोकं मुर्खात काढतील आधी असे वाटले. उसाच्या शेताच्या बाजुलाच धु-यानजिक रसवंती टाकली जेणे करुन उसाची ने आण करण्यासाठी खर्च येवून नये. पहिल्यादिवशी ५५० रुपयांचा व्यवसाय झाला. दोन तीन दिवसानंतर यात वाढ होत गेली. आजच्या घडीला दोन ते अडीच हजार रुपये व्यवसाय रोज होत आहे.
- माणिक पंढरराव अवचार
शेतकरी, किनखेडा