शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

शेतीतून साधला ‘माणिक’ने उद्योग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2017 16:43 IST

शेतकरी दिवसेंदिवस प्रगत होत आहे. नवनविन प्रयोग करुन शेती परवडण्यासारखी नाही म्हणणा-यांच्या समोर काही शेतकरी आदर्श ठरत आहेत.

ऑनलाइन लोकमत/ शंकर वाघ
 
शिरपूर जैन (वाशिम) दि. 25 - शेतकरी दिवसेंदिवस प्रगत होत आहे. नवनविन प्रयोग करुन शेती परवडण्यासारखी नाही म्हणणा-यांच्या समोर काही शेतकरी आदर्श ठरत आहेत. रिसोड तालुक्यातील किनखेडा ‘माणिक’ नामक युवा शेतक-याने शेतीत उसाची लागवड करुन बाजुलाच रसवंती व्यवसाय सुरु करुन शेतीला उद्योगाची जोड दिली आहे. यामधून त्याला दरमहा ६० ते ६५ हजार रुपयांचा व्यवसाय होत आहे.  या शेतक-याची मेहनत व युक्ती पाहून अनेक शेतक-यांनी याच परिसरात शेतातील डाळींब, पपई विकणे सुरु केल्याचे दिसून आले.
पश्चिम महाराष्ट्रात जात असतांना रस्त्यांवर अनेक शेतकरी बसून हुरडा, हळद, आंबे यासह अनेक शेतीतून निघणारी फळे, भाजी विकतांना दिसून येतात. विदर्भात हे प्रमाण फारच कमी असले तरी वाशिम जिल्हयातील मराठवाड्याकडे जाणारा रस्ता वगळता चोहोबाजूने शेतक-यांनी शेतीतून होत असलेले उत्पन्न बाजारात न नेताच स्वत विक्री करीत असल्याने याचा त्यांना चांगला फायदा होत आहे. रिसोड तालुक्यातील युवा शेतकरी माणिक पंढरराव अवचार यांच्याकडे साडेचार एकर शेती आहे. या शेतीमधील केवळ अर्धा एकर शेतात उसाची लागवड ते सतत करतात. यामधून त्यांना दरवर्षी चांगले उत्पन्न होते. परंतु यावर्षी उसाला पाहिजे तसे भाव नसल्याने त्यांनी रसवंती सुरु करुन स्वताच्या शेतातील उस तेथे वापरणे सुरु केले. यामधून त्यांना फार मोठया प्रमाणात फायदा झाला. हिवाळा असतांना सुध्दा अनेक गाडया रसवंती मालेगाव - रिसोड  महामार्गावर असल्याने थांबतात. अर्ध्या एकरात लावलेला हा उस त्यांना मे महिन्यापर्यंत पुरतो. यामधून त्यांना संपूर्ण ऊस काढणीपर्यंत ३ ते साडे तीन लाख रुपये उत्पन्न होत असल्याचे ते सांगतात. प्रत्येक शेतक-याने स्वताच्या शेतात पिकणारे पिकाचा असा प्रयोग केला तर नक्कीच शेतकरी सुखी झाल्याशिवाय राहणार नसल्याचे माणिक यांचे मत आहे.
 
उसाला भाव नसल्याने डोक्यात आले रसवंती सुरु करुन या उसाचे पैसे करावे. हिवाळा आहे लोकं मुर्खात काढतील आधी असे वाटले. उसाच्या शेताच्या बाजुलाच धु-यानजिक रसवंती टाकली जेणे करुन उसाची ने आण करण्यासाठी खर्च येवून नये. पहिल्यादिवशी ५५० रुपयांचा व्यवसाय झाला. दोन तीन दिवसानंतर यात वाढ होत गेली. आजच्या घडीला दोन ते अडीच हजार रुपये व्यवसाय रोज होत आहे.
- माणिक पंढरराव अवचार
शेतकरी, किनखेडा