शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

अपयशाचे ‘माणिक’पर्व संपले !

By admin | Updated: March 3, 2015 02:30 IST

सर्वाधिक काळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद भूषविलेले माणिकराव ठाकरे अखेर पायउतार झाले आणि काँग्रेसमधील एक अपयशी ‘माणिकपर्व’ संपले.

पक्षाची दारुण स्थिती : नव्या प्रदेशाध्यक्षांकडून कार्यकर्त्यांच्या अपेक्षाअतुल कुलकर्णी - मुंबईसर्वाधिक काळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद भूषविलेले माणिकराव ठाकरे अखेर पायउतार झाले आणि काँग्रेसमधील एक अपयशी ‘माणिकपर्व’ संपले. दीर्घकाळ या पदावर राहिलेल्या ठाकरे यांनी काँग्रेसच्या यशाचा आलेख उंचावता आले नाही, उलट त्यांच्या कारकिर्दीत पक्षाची वाताहातच झाली.२१ आॅगस्ट २००८ रोजी माणिकराव प्रदेशाध्यक्ष झाले. जेव्हा त्यांनी सुत्रे हाती घेतली तेव्हा राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस नंबर एकवर होता. आज तो अनेक ठिकाणी दोन किंवा तीन नंबरवर गेला आहे. त्यांच्या काळात सुरुवातीला पक्षाने विधानसभेत, लोकसभेत यश मिळवले मात्र पुढे याच यशाने पक्षीय पातळीवर वाढत गेलल्या गटबाजीमुळ ठराविक चार डोक्यांच्या पलिकडे पक्ष गेलाच नाही. मुंबई महापालिका, लोकसभेत पक्षाचा दारुण पराभव झाला. आपापल्या जिल्ह्यात ज्या नेत्यांनी पक्ष वाढवला, मोठा केला, व ज्यांच्याकडे ताकद होती अशांना संपविण्याचा प्रयत्न केला गेल्याची अनेक उदाहरणे देता येतील. टिळक भवनात त्यांच्या सभोवताली फिरणाऱ्यांचेच पक्षात वर्चस्व राहीले. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विरोधी पक्ष नेते अथवा स्थायी समितीच्या निवडी देखील स्थानिक नगरसेवकांना विश्वासात न घेता केवळ फॅक्सवर होऊ लागल्या. पक्ष पातळीवर एकूणच बेदिलीचे चित्र निर्माण झाले आणि पक्षांतर्गत नेमणुकांसाठी व्यवहार केले जातात असे जाहीरपणे बोलले जाऊ लागले. एखादा नेता मोठा होतो हे लक्षात आले की त्याला अडचणीत कसे आणता येईल याची पक्षात जणू स्पर्धा लागली. प्रदेशाध्यक्ष या नात्याने माणिकराव कधी कोणत्या माध्यमांवर पक्षाची बाजू जोरकसपणे मांडताना दिसले नाहीत. यांच्या काळात पक्ष लोकसभेत २ तर विधानसभेत ४२ जागांवर गेला. कार्यकर्त्यांची फळी मोडलेली आहे. उत्साह उरलेला नाही. मोठी मरगळ आहे. निवडणुका जवळ आल्या की पक्ष जवळ बोलावतो बाकी वेळेस विचारतही नाही ही भावना बळावली आहे. ़या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. हा सगळा इतिहास त्यांना चांगला ठावूक आहे. त्यामुळे पक्षाला ते नवसंजिवनी मिळवून देतील, अशी भावना काँग्रेसजन व्यक्त करत आहेत.अशोक चव्हाण यांची कारकीर्दजन्म : २८ आॅक्टोबर १९५८ (मुंबई)शिक्षण : बीक़ॉम़, एम़बी़ए़ भवन्स कॉलेज, मुंबई़१९८२ : प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस१९८७ : लोकसभा पोटनिवडणुकीत विजयी़१९८९ : नांदेड लोकसभेत पराभव१९९२ : राज्याच्या मंत्रिमंडळात नगरविकास व बांधकाम राज्यमंत्र्यांची जबाबदारी़१९९२ : विधानपरिषदेवर निवड़१९९९ : मुदखेड मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेवर व राज्याचे महसूलमंत्री पदाची जबाबदारी़२००३ : सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात परिवहन व राजशिष्टाचार मंत्री़२००४ : विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात उद्योगमंत्री़२००८ : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड़२००९ : भोकर विधानसभा मतदारसंघातून एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी अन् दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी़२०१० : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा़२०१४ : नांदेड लोकसभेत ८२ हजारांच्या मताधिक्यांनी विजयी़२०१५ : प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड़नांदेडमध्ये जल्लोष : माजी मुख्यमंत्री खा़ अशोक चव्हाण यांची सोमवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने नांदेडमध्ये जल्लोष करण्यात आला़ शहर व जिल्हाभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून आतषबाजी करीत आनंद साजरा केला़ नांदेड लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने शहरातील आयटीआय चौक भागात आतषबाजी केली़ यावेळी ‘अशोकराव तुम आगे बढो़़़’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता़ त्यानंतर लगेचच नवीन मोंढा भागातील काँग्रेस मुख्यालयासमोर आ़ डी़पी़सावंत यांच्या हस्ते आतषबाजी करण्यात आली़ यावेळी झालेल्या बैठकीत अशोकरावांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला़ यावेळी आ़ वसंत चव्हाण, महापौर अब्दुल सत्तार, उपमहापौर आनंद चव्हाण, जिल्हाध्यक्ष बी़आरक़दम, आदींची उपस्थिती होती़जन्माने बिहारी, कर्माने मराठीच - निरुपम१मी जन्माने बिहारी असलो तरी कर्माने मराठीच आहे. त्यामुळे मुंबई अध्यक्षपदावरील माझ्या नियुक्तीवरून मराठी-अमराठी असा वाद निर्माण करू नका, असे आवाहन काँग्रेसचे नवनियुक्त मुंबई विभागीय अध्यक्ष संजय निरुपम यांनी केले.२नियुक्तीनंतर प्रथमच पत्रकारांशी बोलताना निरुपम यांनी मराठी-अमराठी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. आगामी मुंबई महापालिका निवडणुका मराठी-अमराठी मुद्द्यावर फिरण्याची शक्यता असताना मुंबईला निरुपम यांच्या रूपाने अमराठी अध्यक्ष देण्यात आला. ३त्याचा फटका पक्षाला बसल्याशिवाय राहणार नसल्याची टीका पक्षातून व्यक्त होत आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण राणे यांनी तर यावरून थेट तोफ डागली. निरुपम यांनी मात्र कर्माने मराठीच असल्याचे सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. नाइटलाइफच्या मुद्द्यावर निरुपम यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. निवडणुकीपूर्वी युवकांना रोजगार, नोकरीचे दिलेले आश्वासन पूर्ण करता येत नसल्यानेच शिवसेनेने नाइटलाइफचा मुद्दा उचलला आहे. युवकांना नाइटलाइफ नाही, तर रोजगार हवा आहे.