शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

अपयशाचे ‘माणिक’पर्व संपले !

By admin | Updated: March 3, 2015 02:30 IST

सर्वाधिक काळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद भूषविलेले माणिकराव ठाकरे अखेर पायउतार झाले आणि काँग्रेसमधील एक अपयशी ‘माणिकपर्व’ संपले.

पक्षाची दारुण स्थिती : नव्या प्रदेशाध्यक्षांकडून कार्यकर्त्यांच्या अपेक्षाअतुल कुलकर्णी - मुंबईसर्वाधिक काळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद भूषविलेले माणिकराव ठाकरे अखेर पायउतार झाले आणि काँग्रेसमधील एक अपयशी ‘माणिकपर्व’ संपले. दीर्घकाळ या पदावर राहिलेल्या ठाकरे यांनी काँग्रेसच्या यशाचा आलेख उंचावता आले नाही, उलट त्यांच्या कारकिर्दीत पक्षाची वाताहातच झाली.२१ आॅगस्ट २००८ रोजी माणिकराव प्रदेशाध्यक्ष झाले. जेव्हा त्यांनी सुत्रे हाती घेतली तेव्हा राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस नंबर एकवर होता. आज तो अनेक ठिकाणी दोन किंवा तीन नंबरवर गेला आहे. त्यांच्या काळात सुरुवातीला पक्षाने विधानसभेत, लोकसभेत यश मिळवले मात्र पुढे याच यशाने पक्षीय पातळीवर वाढत गेलल्या गटबाजीमुळ ठराविक चार डोक्यांच्या पलिकडे पक्ष गेलाच नाही. मुंबई महापालिका, लोकसभेत पक्षाचा दारुण पराभव झाला. आपापल्या जिल्ह्यात ज्या नेत्यांनी पक्ष वाढवला, मोठा केला, व ज्यांच्याकडे ताकद होती अशांना संपविण्याचा प्रयत्न केला गेल्याची अनेक उदाहरणे देता येतील. टिळक भवनात त्यांच्या सभोवताली फिरणाऱ्यांचेच पक्षात वर्चस्व राहीले. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विरोधी पक्ष नेते अथवा स्थायी समितीच्या निवडी देखील स्थानिक नगरसेवकांना विश्वासात न घेता केवळ फॅक्सवर होऊ लागल्या. पक्ष पातळीवर एकूणच बेदिलीचे चित्र निर्माण झाले आणि पक्षांतर्गत नेमणुकांसाठी व्यवहार केले जातात असे जाहीरपणे बोलले जाऊ लागले. एखादा नेता मोठा होतो हे लक्षात आले की त्याला अडचणीत कसे आणता येईल याची पक्षात जणू स्पर्धा लागली. प्रदेशाध्यक्ष या नात्याने माणिकराव कधी कोणत्या माध्यमांवर पक्षाची बाजू जोरकसपणे मांडताना दिसले नाहीत. यांच्या काळात पक्ष लोकसभेत २ तर विधानसभेत ४२ जागांवर गेला. कार्यकर्त्यांची फळी मोडलेली आहे. उत्साह उरलेला नाही. मोठी मरगळ आहे. निवडणुका जवळ आल्या की पक्ष जवळ बोलावतो बाकी वेळेस विचारतही नाही ही भावना बळावली आहे. ़या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. हा सगळा इतिहास त्यांना चांगला ठावूक आहे. त्यामुळे पक्षाला ते नवसंजिवनी मिळवून देतील, अशी भावना काँग्रेसजन व्यक्त करत आहेत.अशोक चव्हाण यांची कारकीर्दजन्म : २८ आॅक्टोबर १९५८ (मुंबई)शिक्षण : बीक़ॉम़, एम़बी़ए़ भवन्स कॉलेज, मुंबई़१९८२ : प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस१९८७ : लोकसभा पोटनिवडणुकीत विजयी़१९८९ : नांदेड लोकसभेत पराभव१९९२ : राज्याच्या मंत्रिमंडळात नगरविकास व बांधकाम राज्यमंत्र्यांची जबाबदारी़१९९२ : विधानपरिषदेवर निवड़१९९९ : मुदखेड मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेवर व राज्याचे महसूलमंत्री पदाची जबाबदारी़२००३ : सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात परिवहन व राजशिष्टाचार मंत्री़२००४ : विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात उद्योगमंत्री़२००८ : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड़२००९ : भोकर विधानसभा मतदारसंघातून एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी अन् दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी़२०१० : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा़२०१४ : नांदेड लोकसभेत ८२ हजारांच्या मताधिक्यांनी विजयी़२०१५ : प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड़नांदेडमध्ये जल्लोष : माजी मुख्यमंत्री खा़ अशोक चव्हाण यांची सोमवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने नांदेडमध्ये जल्लोष करण्यात आला़ शहर व जिल्हाभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून आतषबाजी करीत आनंद साजरा केला़ नांदेड लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने शहरातील आयटीआय चौक भागात आतषबाजी केली़ यावेळी ‘अशोकराव तुम आगे बढो़़़’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता़ त्यानंतर लगेचच नवीन मोंढा भागातील काँग्रेस मुख्यालयासमोर आ़ डी़पी़सावंत यांच्या हस्ते आतषबाजी करण्यात आली़ यावेळी झालेल्या बैठकीत अशोकरावांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला़ यावेळी आ़ वसंत चव्हाण, महापौर अब्दुल सत्तार, उपमहापौर आनंद चव्हाण, जिल्हाध्यक्ष बी़आरक़दम, आदींची उपस्थिती होती़जन्माने बिहारी, कर्माने मराठीच - निरुपम१मी जन्माने बिहारी असलो तरी कर्माने मराठीच आहे. त्यामुळे मुंबई अध्यक्षपदावरील माझ्या नियुक्तीवरून मराठी-अमराठी असा वाद निर्माण करू नका, असे आवाहन काँग्रेसचे नवनियुक्त मुंबई विभागीय अध्यक्ष संजय निरुपम यांनी केले.२नियुक्तीनंतर प्रथमच पत्रकारांशी बोलताना निरुपम यांनी मराठी-अमराठी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. आगामी मुंबई महापालिका निवडणुका मराठी-अमराठी मुद्द्यावर फिरण्याची शक्यता असताना मुंबईला निरुपम यांच्या रूपाने अमराठी अध्यक्ष देण्यात आला. ३त्याचा फटका पक्षाला बसल्याशिवाय राहणार नसल्याची टीका पक्षातून व्यक्त होत आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण राणे यांनी तर यावरून थेट तोफ डागली. निरुपम यांनी मात्र कर्माने मराठीच असल्याचे सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. नाइटलाइफच्या मुद्द्यावर निरुपम यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. निवडणुकीपूर्वी युवकांना रोजगार, नोकरीचे दिलेले आश्वासन पूर्ण करता येत नसल्यानेच शिवसेनेने नाइटलाइफचा मुद्दा उचलला आहे. युवकांना नाइटलाइफ नाही, तर रोजगार हवा आहे.