शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

राज्यातील ११ शहरांत होणार आंबा महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 06:29 IST

पणन मंडळाचा उपक्रम : ‘शेतकरी ते ग्राहक’ थेट विक्रीसाठी प्रयत्नशील

रत्नागिरी : ‘शेतकरी ते ग्राहक’ थेट विक्रीसाठी पणन मंडळातर्फे दरवर्षी राज्यातील विविध शहरामध्ये आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यामुळे ग्राहकांना चांगल्या दर्जाचा आंबा प्राप्त होतोच, शिवाय हमाली, दलालीची कटकट न राहता शेतकऱ्यांच्या हातात चांगले पैसेही मिळतात. पणन मंडळाने यावर्षीही राज्यातील अकरा मोठ्या शहरांमध्ये आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे.

यंदा रत्नागिरीतील १२५ आंबा उत्पादकांनी पणनकडे स्टॉलची मागणी केली असून, यातील ६० शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करून दिली आहे. पणन मंडळाने राज्यातील ११ प्रमुख शहरांमध्ये थेट विक्री स्टॉल्स उपलब्ध करून दिले आहेत. ‘उत्पादक ते ग्राहक’ अशी साखळी निर्माण करण्यासाठी थेट विक्रीचा हा उपाय शेतकºयांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

विक्रेत्यांना सुविधा पुरविणारपुणे, नाशिक, कोथरूड, इंदोर, पनवेल, भिवंडी, वसई, मुंबई, सोलापूर, औरंगाबाद, कल्याण येथे आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. उत्पादक ते ग्राहक थेट विक्रींतर्गत शेतकºयांना संधी प्राप्त होणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. पर्यटकांना खात्रीशीर व दर्जेदार आंबा मिळावा, यासाठी बाजार समितीच्या मदतीने आंबा उत्पादकांना स्टॉल्स दिले जाणार आहेत. शेतकºयाच्या शेतमाल विक्रीकरिता विविध पर्याय उपलब्ध करून देण्याबरोबरच थेट ग्राहकांना विक्रीबाबतच्या आवश्यक सुविधा उभारण्यावर पणन मंडळाने भर दिला आहे. आंबा विक्रीकरिता पुणे, मुंबई शिवाय राज्यातील अन्य शहरांमध्ये, तसेच परराज्यातील काही मोठ्या शहरांमध्ये विक्री व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी पणन मंडळ प्रयत्नशील आहे.