शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

राज्यातील ११ शहरांत होणार आंबा महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 06:29 IST

पणन मंडळाचा उपक्रम : ‘शेतकरी ते ग्राहक’ थेट विक्रीसाठी प्रयत्नशील

रत्नागिरी : ‘शेतकरी ते ग्राहक’ थेट विक्रीसाठी पणन मंडळातर्फे दरवर्षी राज्यातील विविध शहरामध्ये आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यामुळे ग्राहकांना चांगल्या दर्जाचा आंबा प्राप्त होतोच, शिवाय हमाली, दलालीची कटकट न राहता शेतकऱ्यांच्या हातात चांगले पैसेही मिळतात. पणन मंडळाने यावर्षीही राज्यातील अकरा मोठ्या शहरांमध्ये आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे.

यंदा रत्नागिरीतील १२५ आंबा उत्पादकांनी पणनकडे स्टॉलची मागणी केली असून, यातील ६० शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करून दिली आहे. पणन मंडळाने राज्यातील ११ प्रमुख शहरांमध्ये थेट विक्री स्टॉल्स उपलब्ध करून दिले आहेत. ‘उत्पादक ते ग्राहक’ अशी साखळी निर्माण करण्यासाठी थेट विक्रीचा हा उपाय शेतकºयांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

विक्रेत्यांना सुविधा पुरविणारपुणे, नाशिक, कोथरूड, इंदोर, पनवेल, भिवंडी, वसई, मुंबई, सोलापूर, औरंगाबाद, कल्याण येथे आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. उत्पादक ते ग्राहक थेट विक्रींतर्गत शेतकºयांना संधी प्राप्त होणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. पर्यटकांना खात्रीशीर व दर्जेदार आंबा मिळावा, यासाठी बाजार समितीच्या मदतीने आंबा उत्पादकांना स्टॉल्स दिले जाणार आहेत. शेतकºयाच्या शेतमाल विक्रीकरिता विविध पर्याय उपलब्ध करून देण्याबरोबरच थेट ग्राहकांना विक्रीबाबतच्या आवश्यक सुविधा उभारण्यावर पणन मंडळाने भर दिला आहे. आंबा विक्रीकरिता पुणे, मुंबई शिवाय राज्यातील अन्य शहरांमध्ये, तसेच परराज्यातील काही मोठ्या शहरांमध्ये विक्री व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी पणन मंडळ प्रयत्नशील आहे.