शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडूत चेंगराचेंगरीमुळे गेला ३१ जणांचा जीव, अभिनेत्याला पाहण्याचा नादात मृत्यू, आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
5
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
6
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
7
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
8
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
9
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
10
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
11
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
12
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
13
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
14
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
15
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
16
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
17
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
18
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
19
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
20
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी

कुपोषणावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय समिती बनवणार - मंगलप्रभात लोढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 21:04 IST

पुढील १ महिन्याच्या आत महिला व बालविकास विभागाची मोठी बैठक आदिवासी भागात घेऊन तेथील समस्यांचे निरसन करण्याचा प्रयत्न करू असंही महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत म्हटलं.

मुंबई - बालमृत्यूमागे कुपोषण एक कारण असू शकते. कुपोषण ही मोठी समस्या केवळ राज्यात नाही तर देशभरात आहे. कुपोषणामुळे मृत्यू नाही हे नाकारू शकत नाही. जिल्हास्तरावर आदिवासी विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, महिला आणि बाल विकास विभाग, अन्न व औषध प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची समन्वय समिती बनवू अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत केली. 

कुपोषणाच्या मुद्द्यावर मंगलप्रभात लोढा म्हणाले की, कुपोषण ही गंभीर समस्या आहे. याबाबत जिल्हास्तरावर समन्वयाचा अभाव असल्याची तक्रार अनेक सदस्यांनी सभागृहात केली. त्यावर लवकरच जिल्हास्तरीय शासनाच्या विभागांशी, लोकप्रतिनिधींशी समन्वय समिती बनवण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमोर ठेवला जाईल. जेणेकरून विभागांच्या योजनांचा कुपोषित बालकांपर्यंत लाभ पोहचेल यासाठी ही समिती काम करेल असं त्यांनी म्हटलं. 

तसेच पुढील १ महिन्याच्या आत महिला व बालविकास विभागाची मोठी बैठक आदिवासी विकास विभागासोबत घेऊन समस्यांचे निरसन करण्याचा प्रयत्न करू असंही महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत म्हटलं. कुपोषणाच्या मुद्द्यावर सभागृहात विरोधकांनी सरकारला आक्रमकपणे धारेवर धरले. आदिवासी विभागाच्या मंत्र्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने विरोधकांनी या प्रश्नावर सभात्यागही केला होता. 

प्रश्न राखून ठेवण्याची मागणी  राज्यात कुपोषित बालकांचा मृत्यू होत असताना आदिवासी विकास मंत्री योग्य उत्तर देत नाही. ते आरोग्यमंत्र्यांकडे बोट दाखवत आहेत. परंतु आरोग्य मंत्र्यांकडेही त्याचे उत्तर नाही. सभागृहात योग्य उत्तर मिळत नाही तोवर आमचे समाधान होणार नाही. त्यामुळे हा प्रश्न राखून ठेवावा अशी मागणी आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत केली. परंतु त्यानंतर प्रश्न रेटून नेण्याचा प्रयत्न केला असता विरोधकांनी गोंधळ घालत सभात्याग केला. 

टॅग्स :Mangalprabhat Lodhaमंगलप्रभात लोढा