शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

पावसाळ्यापूर्वी माळीणकरांना मिळणार घर

By admin | Updated: May 11, 2016 00:58 IST

माळीण दुर्घटनाग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम सुरू झाले आहे. घरबांधकामे सुरू करण्यात आली असून पावसाळ््यापूर्वी ६७ पैकी निम्मी घरे पूर्ण करण्यात येणार आहेत.

घोडेगाव : माळीण दुर्घटनाग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम सुरू झाले आहे. घरबांधकामे सुरू करण्यात आली असून पावसाळ््यापूर्वी ६७ पैकी निम्मी घरे पूर्ण करण्यात येणार आहेत. दिवाळीपर्र्यंत घरे, मूलभूत सोई-सुविधा अशी सर्व कामे पूर्ण करून घरे ताब्यात देण्याचे नियोजन असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.माळीण ग्रामस्थांसाठी सुरू असलेल्या कायमस्वरूपी पुनर्वसनाच्या कामाची पाहणी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केली. या वेळी प्रांताधिकारी कल्याणराव पांढरे, कार्यकारी अभियंता एस. बी. देवढे, जे. आर. विभूते, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एम. कुलकर्णी, वास्तुविशारद योगेश राठी, प्रकल्पाधिकारी चेतना मोरे, तहसीलदार बी. जे. गोरे, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, पंचायत समितीचे उपसभापती सुभाष तळपे, सदस्य संजय गवारी, सरपंच दिगंबर भालचिम आदी उपस्थित होते. राव म्हणाले, ‘‘सध्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्राथमिक सोई-सुविधा पुरविणे, प्लॉट तयार करणे, बसस्थानक बांधणे, गटार बांधणे, संरक्षक भिंत बांधणे, रस्ते तयार करणे, जलनिस्सारण, स्मृतिवन ही कामे सुरू आहेत. जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत, समाजमंदिर, पशुवैद्यकीय दवाखान्यात, पाणीपुरवठा योजना, मलनिस्सारण व भूमिगत गटारे ही ८ कामे सुरू आहेत. यापैकी काही कामे जवळपास संपत आली आहेत. मोठी कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण केली जातील. कामांच्या गुणवत्तेवर लक्ष देण्यात येत आहे. यासाठी ‘थर्ड पार्टीद्वारे कामाचे आॅडिट केले जात आहे. काम सुरू असताना कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमार्फत कामाची दक्षता व गुणनियंत्रण ठेवली जात आहे. पावसाळ््यापर्यंत जास्तीत जास्त कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अजून एक महिन्यानंतर पावसाळा सुरू होत आहे. त्यामुळे पावसाळ््यापूर्वी निम्म्या घरांची कामे पूर्ण करणार व पावसाळा संपल्याबरोबर उर्वरित काम पूर्ण केले जाईल. घरे पूर्ण झाल्यानंतरच घरे ताब्यात दिली जाणार आहेत. कारण घरांबरोबरच बाकीची कामेदेखील पूर्ण होणे आवश्यक आहे. (वार्ताहर)पावसाळ््यानंतर येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. रस्त्याच्या कडेला, मोकळ््या जागेत, स्मृतिवनाच्याभोवती वृक्षलागवड केली जाणार आहे. तसेच नवीन वसाहतीच्या मागे असलेल्या डोंगरावर मातीला थांबून ठेवण्यासाठी बांबूची व घायपात लागवड केली जाणार आहे. माळीणला पाण्यासाठी विहीर घेण्यात आली. दोन ठिकाणी बोअर घेण्यात आले, मात्र तीनही ठिकाणी पाणी लागले नाही. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात जुन्या स्रोतातून पाण्याचा उपसा केला जाणार आहे, त्याचबरोबर स्थानिक स्तरावर विभागामार्फत सुरू असलेल्या पायलडोह बंधाऱ्याचे काम अपूर्ण आहे. हे काम दीड ते दोन महिन्यांत पूर्ण करून यातून वर्षभर पाणी मिळविणार असल्याचे नियोजन करण्यात आले आहे.या वेळी ग्रामस्थांनी पाणी नसल्याबाबत तक्रार करीत धरणातून पाइपलाइन टाकून पाणी द्यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. भविष्यात धरणातून पाइपलाइन टाकण्याची परवानगी जलसंपदा विभागाकडे मागितली जाईल. पायलडोह काम दोन महिन्यांत पूर्ण करून याचा स्रोत माळीणसाठी पाणीपुरवठ्याला वापरला जाईल, असे या वेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले.