शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

पावसाळ्यापूर्वी माळीणकरांना मिळणार घर

By admin | Updated: May 11, 2016 00:58 IST

माळीण दुर्घटनाग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम सुरू झाले आहे. घरबांधकामे सुरू करण्यात आली असून पावसाळ््यापूर्वी ६७ पैकी निम्मी घरे पूर्ण करण्यात येणार आहेत.

घोडेगाव : माळीण दुर्घटनाग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम सुरू झाले आहे. घरबांधकामे सुरू करण्यात आली असून पावसाळ््यापूर्वी ६७ पैकी निम्मी घरे पूर्ण करण्यात येणार आहेत. दिवाळीपर्र्यंत घरे, मूलभूत सोई-सुविधा अशी सर्व कामे पूर्ण करून घरे ताब्यात देण्याचे नियोजन असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.माळीण ग्रामस्थांसाठी सुरू असलेल्या कायमस्वरूपी पुनर्वसनाच्या कामाची पाहणी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केली. या वेळी प्रांताधिकारी कल्याणराव पांढरे, कार्यकारी अभियंता एस. बी. देवढे, जे. आर. विभूते, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एम. कुलकर्णी, वास्तुविशारद योगेश राठी, प्रकल्पाधिकारी चेतना मोरे, तहसीलदार बी. जे. गोरे, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, पंचायत समितीचे उपसभापती सुभाष तळपे, सदस्य संजय गवारी, सरपंच दिगंबर भालचिम आदी उपस्थित होते. राव म्हणाले, ‘‘सध्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्राथमिक सोई-सुविधा पुरविणे, प्लॉट तयार करणे, बसस्थानक बांधणे, गटार बांधणे, संरक्षक भिंत बांधणे, रस्ते तयार करणे, जलनिस्सारण, स्मृतिवन ही कामे सुरू आहेत. जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत, समाजमंदिर, पशुवैद्यकीय दवाखान्यात, पाणीपुरवठा योजना, मलनिस्सारण व भूमिगत गटारे ही ८ कामे सुरू आहेत. यापैकी काही कामे जवळपास संपत आली आहेत. मोठी कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण केली जातील. कामांच्या गुणवत्तेवर लक्ष देण्यात येत आहे. यासाठी ‘थर्ड पार्टीद्वारे कामाचे आॅडिट केले जात आहे. काम सुरू असताना कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमार्फत कामाची दक्षता व गुणनियंत्रण ठेवली जात आहे. पावसाळ््यापर्यंत जास्तीत जास्त कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अजून एक महिन्यानंतर पावसाळा सुरू होत आहे. त्यामुळे पावसाळ््यापूर्वी निम्म्या घरांची कामे पूर्ण करणार व पावसाळा संपल्याबरोबर उर्वरित काम पूर्ण केले जाईल. घरे पूर्ण झाल्यानंतरच घरे ताब्यात दिली जाणार आहेत. कारण घरांबरोबरच बाकीची कामेदेखील पूर्ण होणे आवश्यक आहे. (वार्ताहर)पावसाळ््यानंतर येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. रस्त्याच्या कडेला, मोकळ््या जागेत, स्मृतिवनाच्याभोवती वृक्षलागवड केली जाणार आहे. तसेच नवीन वसाहतीच्या मागे असलेल्या डोंगरावर मातीला थांबून ठेवण्यासाठी बांबूची व घायपात लागवड केली जाणार आहे. माळीणला पाण्यासाठी विहीर घेण्यात आली. दोन ठिकाणी बोअर घेण्यात आले, मात्र तीनही ठिकाणी पाणी लागले नाही. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात जुन्या स्रोतातून पाण्याचा उपसा केला जाणार आहे, त्याचबरोबर स्थानिक स्तरावर विभागामार्फत सुरू असलेल्या पायलडोह बंधाऱ्याचे काम अपूर्ण आहे. हे काम दीड ते दोन महिन्यांत पूर्ण करून यातून वर्षभर पाणी मिळविणार असल्याचे नियोजन करण्यात आले आहे.या वेळी ग्रामस्थांनी पाणी नसल्याबाबत तक्रार करीत धरणातून पाइपलाइन टाकून पाणी द्यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. भविष्यात धरणातून पाइपलाइन टाकण्याची परवानगी जलसंपदा विभागाकडे मागितली जाईल. पायलडोह काम दोन महिन्यांत पूर्ण करून याचा स्रोत माळीणसाठी पाणीपुरवठ्याला वापरला जाईल, असे या वेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले.