शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यास जाणूनबुजून केला विलंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 07:04 IST

१२ वर्षे उलटली; विशेष न्यायालयाकडून हायकोर्टात अहवाल दाखल

मुंबई : मालेगावमधील २००८ च्या बॉम्बस्फोटाला १२ वर्षे उलटली तरी खटला सुरूच आहे. या खटल्याला आरोपी किंवा एनआयएचे वकील जाणूनबुजून विलंब करत आहेत, असे विशेष न्यायालयाने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या गोपनीय अहवालात म्हटले आहे. मात्र कोणत्या आरोपींच्या वकिलांकडून विलंब होत आहे, हे स्पष्ट झालेले नाही.मालेगावमध्ये २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा खटला वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिले. मात्र आरोपी व आरोपीचे वकील या खटल्यास विलंब करत असल्याचा आरोप या बॉम्बस्फोटातील आरोपी समीर कुलकर्णी याने उच्च न्यायालयात केला. या याचिकेवरील सुनावणी न्या. भूषण धर्माधिकारी व न्या. एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठापुढे आहे.कुलकर्णीने मंगळवारच्या सुनावणीत सांगितले की, माझ्यापाठून कसाबसह अनेक महत्त्वाचे खटले निकाली निघाले. मात्र, हाच खटला रखडला. ऑक्टोबर २०१८ मध्ये न्यायालयाने हा खटला जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश विशेष एनआयएन न्यायालयाला देण्यात आले. मात्र गेल्या सहा महिन्यांत या प्रकरणी केवळ १४ साक्षीदारांचीच साक्ष नोंदविण्यात आली.२२ जानेवारी २०१९ रोजी उच्च न्यायालयाने कुलकर्णीच्या याचिकेवरील सुनावणीत विशेष न्यायालयाला तपासयंत्रणेच्या किंवा आरोपींच्या वकिलांनी तथ्यहीन कारणावरून सुनावणी तहकूब करण्याची विनंती केली, तर न्यायालयाने त्यांच्या अधिकारांचा वापर करून विनंती फेटाळावी, अशी सूचना केली. तसेच खटला पूर्ण करण्यास एनआयए किंवा आरोपींचे वकील अडथळे आणत असतील तर उच्च न्यायालयाच्या निबंधकांकडे त्यासंदर्भात गोपनीय अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विशेष न्यायालयाने अहवाल सादर केला.२९ सप्टेंबर २००८ रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील एका मशिदीजवळ उभ्या करून ठेवण्यात आलेल्या मोटरसायकलचा स्फोट झाला होता. मोटरसायकलमध्ये स्फोटके ठेवण्यात आली होती. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक जखमी झाले. याप्रकरणी भाजपची खासदार प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी हे आरोपी आहेत.१६ मार्चपर्यंत उत्तर देण्याचे निर्देशउच्च न्यायालयाने विशेष एनआयए न्यायालयाने दाखल केलेल्या गोपनीय अहवालाचा हवाला देत म्हटले की, आरोपीचे वकील खटल्यास जाणूनबुजून विलंब करत आहेत, असे यात म्हटले आहे. या अहवालावरून प्रथमदर्शनी असे वाटते की, खटल्याची प्रगती फारशी प्रभावी झालेली नाही. ही बाब गांभीर्याने घेत न्यायालयाने एनआयएला या विलंबाबत अखेरची संधी म्हणून १६ मार्चपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :Malegaon Blastमालेगाव बॉम्बस्फोट