शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यास जाणूनबुजून केला विलंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 07:04 IST

१२ वर्षे उलटली; विशेष न्यायालयाकडून हायकोर्टात अहवाल दाखल

मुंबई : मालेगावमधील २००८ च्या बॉम्बस्फोटाला १२ वर्षे उलटली तरी खटला सुरूच आहे. या खटल्याला आरोपी किंवा एनआयएचे वकील जाणूनबुजून विलंब करत आहेत, असे विशेष न्यायालयाने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या गोपनीय अहवालात म्हटले आहे. मात्र कोणत्या आरोपींच्या वकिलांकडून विलंब होत आहे, हे स्पष्ट झालेले नाही.मालेगावमध्ये २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा खटला वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिले. मात्र आरोपी व आरोपीचे वकील या खटल्यास विलंब करत असल्याचा आरोप या बॉम्बस्फोटातील आरोपी समीर कुलकर्णी याने उच्च न्यायालयात केला. या याचिकेवरील सुनावणी न्या. भूषण धर्माधिकारी व न्या. एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठापुढे आहे.कुलकर्णीने मंगळवारच्या सुनावणीत सांगितले की, माझ्यापाठून कसाबसह अनेक महत्त्वाचे खटले निकाली निघाले. मात्र, हाच खटला रखडला. ऑक्टोबर २०१८ मध्ये न्यायालयाने हा खटला जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश विशेष एनआयएन न्यायालयाला देण्यात आले. मात्र गेल्या सहा महिन्यांत या प्रकरणी केवळ १४ साक्षीदारांचीच साक्ष नोंदविण्यात आली.२२ जानेवारी २०१९ रोजी उच्च न्यायालयाने कुलकर्णीच्या याचिकेवरील सुनावणीत विशेष न्यायालयाला तपासयंत्रणेच्या किंवा आरोपींच्या वकिलांनी तथ्यहीन कारणावरून सुनावणी तहकूब करण्याची विनंती केली, तर न्यायालयाने त्यांच्या अधिकारांचा वापर करून विनंती फेटाळावी, अशी सूचना केली. तसेच खटला पूर्ण करण्यास एनआयए किंवा आरोपींचे वकील अडथळे आणत असतील तर उच्च न्यायालयाच्या निबंधकांकडे त्यासंदर्भात गोपनीय अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विशेष न्यायालयाने अहवाल सादर केला.२९ सप्टेंबर २००८ रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील एका मशिदीजवळ उभ्या करून ठेवण्यात आलेल्या मोटरसायकलचा स्फोट झाला होता. मोटरसायकलमध्ये स्फोटके ठेवण्यात आली होती. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक जखमी झाले. याप्रकरणी भाजपची खासदार प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी हे आरोपी आहेत.१६ मार्चपर्यंत उत्तर देण्याचे निर्देशउच्च न्यायालयाने विशेष एनआयए न्यायालयाने दाखल केलेल्या गोपनीय अहवालाचा हवाला देत म्हटले की, आरोपीचे वकील खटल्यास जाणूनबुजून विलंब करत आहेत, असे यात म्हटले आहे. या अहवालावरून प्रथमदर्शनी असे वाटते की, खटल्याची प्रगती फारशी प्रभावी झालेली नाही. ही बाब गांभीर्याने घेत न्यायालयाने एनआयएला या विलंबाबत अखेरची संधी म्हणून १६ मार्चपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :Malegaon Blastमालेगाव बॉम्बस्फोट