शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

तीन वर्षांत राज्यातील मलेरियाचे प्रमाण ३३ टक्क्यांनी घटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 06:10 IST

आरोग्य विभागाचा अहवाल : मलेरियामुळे दगावणाऱ्या रुग्णांची संख्याही झाली कमी

मुंबई : गेल्या तीन वर्षांत राज्यातील मलेरियाचे प्रमाण ३३ टक्क्यांनी कमी झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले आहे. केवळ मलेरियाच्या रुग्णांची संख्याच नव्हे; तर मलेरियामुळे होणाºया मृत्यूचे प्रमाणही घटल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मुंबईत २०१० साली मलेरियाचा उद्रेक झाल्यावर हा आजार रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले गेले. शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये डासनियंत्रण व जनजागृती मोहिमेंतर्गत कार्यक्रम राबविले गेले. त्यानंतर मलेरियाबाबतची स्थिती सुधारल्याचे सरकारी आकडेवारीवरून दिसत आहे. राष्ट्रीय व्हेक्टर रोग नियंत्रण कार्यक्रमानुसार सर्व राज्यांमधून मलेरिया, डेंग्यू आदी आजारांच्या माहितीची नोंद करण्यात येते. अहवालातील नोंदीनुसार राज्यात मुंबई, नवी मुंबई, कल्याण, ठाण्यासह विदर्भात सर्वाधिक मलेरियाच्या रुग्णांची नोंद आहे, तुलनेत पुण्यात मलेरियाचे सर्वाधिक कमी प्रमाण आहे.

या अहवालानुसार, २०१६ साली मलेरियाचे २३ हजार ९८३ रुग्ण आढळले होते. तर २०१७ साली १७ हजार ७१० रुग्णांची नोंद करण्यात आली होती. मात्र गेल्या वर्षी म्हणजेच २०१८ साली हे प्रमाण ९ हजार ३२२ इतके कमी झाले आहे. याखेरीज, २०१६ साली मलेरियामुळे २६ रुग्ण दगावले. २०१७ साली मृत्यूचे हे प्रमाण २० वर आले, तर २०१८ साली हे प्रमाण थेट १० वर आल्याची नोंद आहे.जनजागृतीचे फळयाविषयी डॉ. राजेश गावंडे यांनी सांगितले की, राज्यात गेल्या काही वर्षांपासून मलेरियाचे प्रमाण कमी होत आहे. दोन ते तीन वर्षांत मलेरियाच्या उपचारांवर प्रभावी कार्य करण्यात आले आहे. मलेरियाची लागण झालेल्या परिसरांवर लक्ष ठेवून त्या ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव कमी करण्याबाबत उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळेच हे यश मिळाले आहे.