शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
3
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
4
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
5
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
6
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
7
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
8
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
9
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
10
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
11
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
12
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
13
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
15
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
16
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
17
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
18
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
19
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
20
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."

तीन वर्षांत राज्यातील मलेरियाचे प्रमाण ३३ टक्क्यांनी घटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 06:10 IST

आरोग्य विभागाचा अहवाल : मलेरियामुळे दगावणाऱ्या रुग्णांची संख्याही झाली कमी

मुंबई : गेल्या तीन वर्षांत राज्यातील मलेरियाचे प्रमाण ३३ टक्क्यांनी कमी झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले आहे. केवळ मलेरियाच्या रुग्णांची संख्याच नव्हे; तर मलेरियामुळे होणाºया मृत्यूचे प्रमाणही घटल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मुंबईत २०१० साली मलेरियाचा उद्रेक झाल्यावर हा आजार रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले गेले. शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये डासनियंत्रण व जनजागृती मोहिमेंतर्गत कार्यक्रम राबविले गेले. त्यानंतर मलेरियाबाबतची स्थिती सुधारल्याचे सरकारी आकडेवारीवरून दिसत आहे. राष्ट्रीय व्हेक्टर रोग नियंत्रण कार्यक्रमानुसार सर्व राज्यांमधून मलेरिया, डेंग्यू आदी आजारांच्या माहितीची नोंद करण्यात येते. अहवालातील नोंदीनुसार राज्यात मुंबई, नवी मुंबई, कल्याण, ठाण्यासह विदर्भात सर्वाधिक मलेरियाच्या रुग्णांची नोंद आहे, तुलनेत पुण्यात मलेरियाचे सर्वाधिक कमी प्रमाण आहे.

या अहवालानुसार, २०१६ साली मलेरियाचे २३ हजार ९८३ रुग्ण आढळले होते. तर २०१७ साली १७ हजार ७१० रुग्णांची नोंद करण्यात आली होती. मात्र गेल्या वर्षी म्हणजेच २०१८ साली हे प्रमाण ९ हजार ३२२ इतके कमी झाले आहे. याखेरीज, २०१६ साली मलेरियामुळे २६ रुग्ण दगावले. २०१७ साली मृत्यूचे हे प्रमाण २० वर आले, तर २०१८ साली हे प्रमाण थेट १० वर आल्याची नोंद आहे.जनजागृतीचे फळयाविषयी डॉ. राजेश गावंडे यांनी सांगितले की, राज्यात गेल्या काही वर्षांपासून मलेरियाचे प्रमाण कमी होत आहे. दोन ते तीन वर्षांत मलेरियाच्या उपचारांवर प्रभावी कार्य करण्यात आले आहे. मलेरियाची लागण झालेल्या परिसरांवर लक्ष ठेवून त्या ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव कमी करण्याबाबत उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळेच हे यश मिळाले आहे.