शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

प्रादेशिक योजना एक वर्षात तयार करा

By admin | Updated: July 16, 2016 03:32 IST

राज्यातील ११ जिल्ह्यांसाठी येत्या एक वर्षात प्रादेशिक योजना तयार करून बेकायदेशीर बांधकामांना आळा घालण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असू

यदु जोशी,  मुंबईराज्यातील ११ जिल्ह्यांसाठी येत्या एक वर्षात प्रादेशिक योजना तयार करून बेकायदेशीर बांधकामांना आळा घालण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून, त्यानुसार नगरविकास विभागाने आदेश जारी केला आहे. वर्धा, भंडारा, गोंदिया, धुळे, नंदुरबार, परभणी, बीड, हिंगोली, उस्मानाबाद, बुलडाणा आणि यवतमाळ या ११ जिल्ह्यांसाठी या प्रादेशिक योजना तयार करण्यात येणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक नियोजन मंडळ स्थापन करण्यात आले आहे. त्यात नगररचना संचालक वा त्यांचे प्रतिनिधी, चार तज्ज्ञ व्यक्ती, नगररचना सहायक संचालक, जास्तीतजास्त दोन विधानसभा सदस्य आणि दोन विधान परिषद सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. या ११ जिल्ह्यांमध्ये महापालिका आणि नगरपालिकांची शहरे वगळता अन्य भागासाठी प्रादेशिक योजनाच नसल्याने अनधिकृत बांधकामे बोकाळली होती. बांधकामांबाबतचे अधिकार त्या-त्या ग्रामपंचायतींना असल्याने त्यात भरच पडली. जिल्हाधिकारी वा अन्य कोणत्याही नियोजन प्राधिकाऱ्याचे नियंत्रण नसल्याने अनधिकृत बांधकामांना चाप लावता येत नव्हता. या अकराही जिल्ह्यांमध्ये प्रादेशिक योजना नसल्याने अनधिकृत बांधकामांसाठीची जबाबदारी निश्चित नव्हती. आता वर्षभरात या सर्व जिल्ह्यांमधील जमिनींचे नकाशे तयार करण्यात येतील. सर्वंकष आराखडे तयार करून खासगी, सरकारी जमीन किती, त्यावरील अनधिकृत बांधकामे, अधिकृत बांधकामांसाठीचे नियम, नियोजनबद्ध विकासाची जबाबदारी कोणाची हे निश्चित करण्यात येणार आहे. नकाशे तीन महिन्यांत तयार केले जातील. त्यानंतरच्या तीन महिन्यांत प्रारूप प्रादेशिक योजना तयार केली जाईल. त्या पुढील चार महिन्यांत हरकती, सूचना मागविण्यात येतील आणि एक महिन्यात सुनावणीदेखील दिली जाईल. शेवटच्या एक महिन्यात प्रादेशिक मंडळ हे शासनास अंतिम योजना सादर करेल.