शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

प्रादेशिक योजना एक वर्षात तयार करा

By admin | Updated: July 16, 2016 03:32 IST

राज्यातील ११ जिल्ह्यांसाठी येत्या एक वर्षात प्रादेशिक योजना तयार करून बेकायदेशीर बांधकामांना आळा घालण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असू

यदु जोशी,  मुंबईराज्यातील ११ जिल्ह्यांसाठी येत्या एक वर्षात प्रादेशिक योजना तयार करून बेकायदेशीर बांधकामांना आळा घालण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून, त्यानुसार नगरविकास विभागाने आदेश जारी केला आहे. वर्धा, भंडारा, गोंदिया, धुळे, नंदुरबार, परभणी, बीड, हिंगोली, उस्मानाबाद, बुलडाणा आणि यवतमाळ या ११ जिल्ह्यांसाठी या प्रादेशिक योजना तयार करण्यात येणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक नियोजन मंडळ स्थापन करण्यात आले आहे. त्यात नगररचना संचालक वा त्यांचे प्रतिनिधी, चार तज्ज्ञ व्यक्ती, नगररचना सहायक संचालक, जास्तीतजास्त दोन विधानसभा सदस्य आणि दोन विधान परिषद सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. या ११ जिल्ह्यांमध्ये महापालिका आणि नगरपालिकांची शहरे वगळता अन्य भागासाठी प्रादेशिक योजनाच नसल्याने अनधिकृत बांधकामे बोकाळली होती. बांधकामांबाबतचे अधिकार त्या-त्या ग्रामपंचायतींना असल्याने त्यात भरच पडली. जिल्हाधिकारी वा अन्य कोणत्याही नियोजन प्राधिकाऱ्याचे नियंत्रण नसल्याने अनधिकृत बांधकामांना चाप लावता येत नव्हता. या अकराही जिल्ह्यांमध्ये प्रादेशिक योजना नसल्याने अनधिकृत बांधकामांसाठीची जबाबदारी निश्चित नव्हती. आता वर्षभरात या सर्व जिल्ह्यांमधील जमिनींचे नकाशे तयार करण्यात येतील. सर्वंकष आराखडे तयार करून खासगी, सरकारी जमीन किती, त्यावरील अनधिकृत बांधकामे, अधिकृत बांधकामांसाठीचे नियम, नियोजनबद्ध विकासाची जबाबदारी कोणाची हे निश्चित करण्यात येणार आहे. नकाशे तीन महिन्यांत तयार केले जातील. त्यानंतरच्या तीन महिन्यांत प्रारूप प्रादेशिक योजना तयार केली जाईल. त्या पुढील चार महिन्यांत हरकती, सूचना मागविण्यात येतील आणि एक महिन्यात सुनावणीदेखील दिली जाईल. शेवटच्या एक महिन्यात प्रादेशिक मंडळ हे शासनास अंतिम योजना सादर करेल.