शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

भिकारी मुलांसाठी धोरण करा

By admin | Updated: March 16, 2016 08:37 IST

शहरात भीक मागणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी सर्वसमावेशक धोरण आखा, अशी सूचना उच्च न्यायालयाने सरकारला केली. भीक मागण्यामध्ये मुलांची संख्या वाढत

मुंबई : शहरात भीक मागणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी सर्वसमावेशक धोरण आखा, अशी सूचना उच्च न्यायालयाने सरकारला केली. भीक मागण्यामध्ये मुलांची संख्या वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत न्या. अभय ओक व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने मुलांना यामधून बाहेर काढत त्यांच्या शिक्षणाची व राहण्याची सोय करण्याची सूचना केली.याआधीच्या सुनावणीवेळी खंडपीठाने रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांची संख्या किती आहे? त्यातील किती मुले अनाथ आहेत? तसेच किती मुलांचे पालक आहेत, इत्यादीची तपशीलवार माहिती सादर करण्याचे निर्देश सरकारला दिले होते. यासंदर्भात टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशन सायन्सच्या (टिस) आशा मुकुंदाना यांनी २०१३मध्ये भीक मागणाऱ्या मुलांच्या केलेल्या जनगणनेचा आधार घेण्याची सूचनाही खंडपीठाने सरकारला केली होती.किती मुलांना या धंद्यात जबरदस्तीने आणले जाते किंवा ते स्वत:हून यामध्ये सहभागी होतात, याची माहिती सरकारने मिळवावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. मुले देशाचे भविष्य आहेत. त्यामुळे त्यांना शिक्षण मिळाले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत त्यांना भीक मागायला भाग पाडले जाऊ नये, याची काळजी सरकारने घ्यावी. विस्थापित मुलांची काळजी घेणे, हे सरकारचे कर्तव्य आहे,’ असे याचिकेत म्हटले आहे. (प्रतिनिधी)