शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मोबाइल गेम बनवा अन् ५ लाख जिंका, रस्ते सुरक्षा जनजागृती मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 04:59 IST

वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. आता त्यात ‘स्मार्ट’ भर पडल्याचे दिसून आले आहे. रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी मोबाइल गेम बनविण्याचा प्रस्ताव करण्यात येणार आहे.

- महेश चेमटेमुंबई - वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. आता त्यात ‘स्मार्ट’ भर पडल्याचे दिसून आले आहे. रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी मोबाइल गेम बनविण्याचा प्रस्ताव करण्यात येणार आहे. ‘नॅशनल असोसिएशन आॅफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनी (नासकॉम)’ यांच्यामार्फत गेम बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत विजेत्या विकासकाला ५ लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे.रस्ता सुरक्षा जनजागृतीविषयक नासकॉम यांच्यामार्फत मोबाइल गेम बनविण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी नासकॉमला करारापोटी व्यवस्थापन शुल्क म्हणून २ लाख रुपये देण्यात येणार आहे.स्पर्धेच्या आयोजनानंतर पहिल्या ३ क्रमांकांना पारितोषिके देण्यात येणार आहेत.यात पहिल्या क्रमांकाला पाच लाख रुपये, द्वितीय क्रमांकाला ३ लाख रुपये आणि तृतीय क्रमांकाला २ लाख रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. वित्तीय आणि प्रशासकीय विभागाने एकूण १२ लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे.२०१४ साली २७ हजार ८५२ वरून रस्ते अपघातात २०१६ साली ७३ हजार ७८७ पर्यंत वाढ झाली. जानेवारी ते १५ नोव्हेंबर २०१७ या काळात ६३ हजार ०१७ नागरिकांना रस्ते अपघातात जीव गमवावा लागला. रस्ता सुरक्षेसाठी मोबाइल गेममधून किती नागरिकांमध्ये जनजागृती होईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.शुक्रवारी घेतला निर्णयराज्यातील रस्ते अपघात हा सरकारचा चिंतेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे, नुकतेच अपघात रोखण्यासाठी अपघातग्रस्त नागरिकांकडून वाहन नियमांचे पालन करण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. मात्र, त्यामुळे फारसा फरक पडल्याचे दिसून आले नाही. परिणामी, शुक्रवारी रस्ता सुरक्षितताविषयक मोबाइल गेम बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. वाढत्या स्मार्ट फोनधारकांमुळे मोबाइल गेममुळे सर्वांपर्यंत पोहोचणे शक्य होईल. शिवाय रस्ता सुरक्षा आधारित ‘थीम’ गेममुळे नागरिकांमध्ये जनजागृती होईल, असा विश्वास वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकारी व्यक्त करत आहेत.

टॅग्स :MobileमोबाइलGovernmentसरकार