शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मोबाइल गेम बनवा अन् ५ लाख जिंका, रस्ते सुरक्षा जनजागृती मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 04:59 IST

वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. आता त्यात ‘स्मार्ट’ भर पडल्याचे दिसून आले आहे. रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी मोबाइल गेम बनविण्याचा प्रस्ताव करण्यात येणार आहे.

- महेश चेमटेमुंबई - वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. आता त्यात ‘स्मार्ट’ भर पडल्याचे दिसून आले आहे. रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी मोबाइल गेम बनविण्याचा प्रस्ताव करण्यात येणार आहे. ‘नॅशनल असोसिएशन आॅफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनी (नासकॉम)’ यांच्यामार्फत गेम बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत विजेत्या विकासकाला ५ लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे.रस्ता सुरक्षा जनजागृतीविषयक नासकॉम यांच्यामार्फत मोबाइल गेम बनविण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी नासकॉमला करारापोटी व्यवस्थापन शुल्क म्हणून २ लाख रुपये देण्यात येणार आहे.स्पर्धेच्या आयोजनानंतर पहिल्या ३ क्रमांकांना पारितोषिके देण्यात येणार आहेत.यात पहिल्या क्रमांकाला पाच लाख रुपये, द्वितीय क्रमांकाला ३ लाख रुपये आणि तृतीय क्रमांकाला २ लाख रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. वित्तीय आणि प्रशासकीय विभागाने एकूण १२ लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे.२०१४ साली २७ हजार ८५२ वरून रस्ते अपघातात २०१६ साली ७३ हजार ७८७ पर्यंत वाढ झाली. जानेवारी ते १५ नोव्हेंबर २०१७ या काळात ६३ हजार ०१७ नागरिकांना रस्ते अपघातात जीव गमवावा लागला. रस्ता सुरक्षेसाठी मोबाइल गेममधून किती नागरिकांमध्ये जनजागृती होईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.शुक्रवारी घेतला निर्णयराज्यातील रस्ते अपघात हा सरकारचा चिंतेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे, नुकतेच अपघात रोखण्यासाठी अपघातग्रस्त नागरिकांकडून वाहन नियमांचे पालन करण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. मात्र, त्यामुळे फारसा फरक पडल्याचे दिसून आले नाही. परिणामी, शुक्रवारी रस्ता सुरक्षितताविषयक मोबाइल गेम बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. वाढत्या स्मार्ट फोनधारकांमुळे मोबाइल गेममुळे सर्वांपर्यंत पोहोचणे शक्य होईल. शिवाय रस्ता सुरक्षा आधारित ‘थीम’ गेममुळे नागरिकांमध्ये जनजागृती होईल, असा विश्वास वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकारी व्यक्त करत आहेत.

टॅग्स :MobileमोबाइलGovernmentसरकार