शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

राज्यभर सरसकट दारुबंदी करा

By admin | Updated: June 14, 2015 02:39 IST

चंद्रपूरमधील दारुबंदीविरोधात न्यायालयात गेलेले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी शनिवारी श्रीरामपूर येथे ‘लोकमत’शी बोलताना

राधाकृष्ण विखे : राज्यभरात समान धोरणाची मागणी

श्रीरामपूर (अहमदनगर) : चंद्रपूरमधील दारुबंदीविरोधात न्यायालयात गेलेले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी शनिवारी श्रीरामपूर येथे ‘लोकमत’शी बोलताना केवळ एखाद्या जिल्ह्यापुरती दारुबंदी न करता राज्यभरात सरसकट एकदाच दारुबंदी करा, अशी जाहीर भूमिका प्रथमच मांडली.राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी ते शनिवारी येथे आले होते. डॉ. केळकर समितीने शेतकरी आत्महत्येमागे दारूचे व्यसन हे एक कारण आहे. त्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, की वर्धा जिल्ह्यात फार वर्षांपासून संपूर्ण दारुबंदी करण्यात आली आहे. पण तेथेच सर्वाधिक दारुविक्री होते. आता युती सरकारने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी जाहीर केली आहे. हा निर्णय पूर्णपणे राजकीय स्वरूपाचा आहे. एखाददुसऱ्या जिल्ह्यात दारुबंदी करण्याचा निर्णय चुकीचा आहे. त्याऐवजी सरसकट संपूर्ण राज्यात दारुबंदी झाली पाहिजे. आमचा कारखाना गेल्या ४० वर्षांपासून दारुनिर्मिती करतो. तिची चंद्रपूरसह राज्यभरात विक्री होते. त्यातून कारखान्यास आर्थिक उत्पन्न मिळते. दारुबंदीचे स्वागतचचंद्रपूरच्या दारुबंदीमुळे कारखान्याचा निश्चित आर्थिक तोटा होणार आहे, म्हणून विखे साखर कारखाना न्यायालयात गेला आहे. पण आम्ही दारुबंदीविरोधात नाही. दारुबंदीच्या निर्णयाचे मी स्वागतच करतो. पण राज्यभरात एकच कायदा व समान धोरण असले पाहिजे, असे विखे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)