शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
4
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
5
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
6
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
9
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
10
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
11
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
12
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
13
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
14
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
15
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
16
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?

मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडणार

By admin | Updated: July 1, 2015 01:15 IST

राज्यात सध्या काही जिल्ह्णांमध्ये प्रामुख्याने मराठवाडा विभागात खूपच कमी पाऊस पडला आहे. येथील खरीप हंगामदेखील धोक्यात आल्यामुळे या परिसरात कृत्रिम पाऊस

पुणे : राज्यात सध्या काही जिल्ह्णांमध्ये प्रामुख्याने मराठवाडा विभागात खूपच कमी पाऊस पडला आहे. येथील खरीप हंगामदेखील धोक्यात आल्यामुळे या परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्याचा शासनाचा विचार असून, पंधरा दिवसांत याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे,अशी घोषणा कृषी राज्यमंत्री राम शिंदे यांनी मंगळवारी पुण्यात पत्र परिषदेत केली.दिवंगत मुख्यमंंत्री वसंतराव नाईक जयंतीनिमित्त आयोजित कृषी जागृती सप्ताहाची माहिती त्यांनी यावेळी दिली़ शिंदे म्हणाले की, राज्यात आतापर्यंत सरासरीच्या १०५ टक्के पाऊस झाला आहे. परंतु मराठवाड्यातील पाच-सहा जिल्ह्णांमध्ये पावसाने ओढ दिली आहे. यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला असून, येथे कृत्रीम पाऊस पाडावा याचा शासन विचार करत आहे. याबाबत शासनस्तराव बैठका सुरु असून, काही संस्था यासाठी पुढे आल्याची माहिती त्यांनी दिली़ खरीपाच्या एकूण क्षेत्रापैकी ४० टक्के क्षेत्रावर म्हणजे ५० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. काही ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकऱ्यांना बियाणे व खताचा पुरेसा पुरवठा करण्याचे पूर्ण नियोजन कृषी विभागाने केले असल्याचे शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)राज्य शासनाने घेतलेला कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे़ मात्र, त्यासाठी आतापर्यंत किती तयारी पूर्ण झाली आहे, याची माहिती पुढे आली नाही़ विमान व रडार याबाबतची प्राथमिक तयारी पूर्ण झाली असली तरी प्रत्यक्ष प्रयोग राबविण्यास किमान एक महिना कालावधीत लागू शकतो, असे जागतिक हवामान संघटनेचे सदस्य डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले़ कृत्रीम पावसासाठी औरंगाबाद सेंटरराज्यात कृत्रीम पावसाचा प्रयोग करण्यासाठी मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्हा सेंटर धरुन सुमारे २५० किलोमिटरच्या परिघात हा कृत्रीम पाऊस पाडण्याचा विचार सुरु असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.