शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडणार

By admin | Updated: July 1, 2015 01:15 IST

राज्यात सध्या काही जिल्ह्णांमध्ये प्रामुख्याने मराठवाडा विभागात खूपच कमी पाऊस पडला आहे. येथील खरीप हंगामदेखील धोक्यात आल्यामुळे या परिसरात कृत्रिम पाऊस

पुणे : राज्यात सध्या काही जिल्ह्णांमध्ये प्रामुख्याने मराठवाडा विभागात खूपच कमी पाऊस पडला आहे. येथील खरीप हंगामदेखील धोक्यात आल्यामुळे या परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्याचा शासनाचा विचार असून, पंधरा दिवसांत याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे,अशी घोषणा कृषी राज्यमंत्री राम शिंदे यांनी मंगळवारी पुण्यात पत्र परिषदेत केली.दिवंगत मुख्यमंंत्री वसंतराव नाईक जयंतीनिमित्त आयोजित कृषी जागृती सप्ताहाची माहिती त्यांनी यावेळी दिली़ शिंदे म्हणाले की, राज्यात आतापर्यंत सरासरीच्या १०५ टक्के पाऊस झाला आहे. परंतु मराठवाड्यातील पाच-सहा जिल्ह्णांमध्ये पावसाने ओढ दिली आहे. यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला असून, येथे कृत्रीम पाऊस पाडावा याचा शासन विचार करत आहे. याबाबत शासनस्तराव बैठका सुरु असून, काही संस्था यासाठी पुढे आल्याची माहिती त्यांनी दिली़ खरीपाच्या एकूण क्षेत्रापैकी ४० टक्के क्षेत्रावर म्हणजे ५० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. काही ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकऱ्यांना बियाणे व खताचा पुरेसा पुरवठा करण्याचे पूर्ण नियोजन कृषी विभागाने केले असल्याचे शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)राज्य शासनाने घेतलेला कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे़ मात्र, त्यासाठी आतापर्यंत किती तयारी पूर्ण झाली आहे, याची माहिती पुढे आली नाही़ विमान व रडार याबाबतची प्राथमिक तयारी पूर्ण झाली असली तरी प्रत्यक्ष प्रयोग राबविण्यास किमान एक महिना कालावधीत लागू शकतो, असे जागतिक हवामान संघटनेचे सदस्य डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले़ कृत्रीम पावसासाठी औरंगाबाद सेंटरराज्यात कृत्रीम पावसाचा प्रयोग करण्यासाठी मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्हा सेंटर धरुन सुमारे २५० किलोमिटरच्या परिघात हा कृत्रीम पाऊस पाडण्याचा विचार सुरु असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.