शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मकरसंक्रांत अशुभ असूच शकत नाही - दा. कृ. सोमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 06:06 IST

सूर्य जेव्हा सायन मकर राशीत प्रवेश करतो, त्या दिवसापासून दिनमान वाढत जाते.

मुंबई : एखादी वाईट घटना घडली की ‘संक्रांत आली’ असे म्हणण्याची प्रथा आहे. परंतु ही प्रथा चुकीची आहे. ‘मकर संक्रांत’ म्हणजे सूर्याने धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करणे. धनू राशीतून सूर्य मकर राशीत जाणे हे वाईट कसे असू शकेल? सूर्याच्या मकर संक्रांतीपासून दिनमान वाढत जाते ही तर चांगली गोष्ट आहे. त्यामुळे मकर संक्रांती अशुभ असू शकणारच नाही, असे मत पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी व्यक्त केले.

या दिवशी देवीने राक्षसाला ठार मारले अशीही एक समजूत आहे. ही गोष्ट देखील वाईट कशी असू शकेल ? म्हणून मकर संक्रांती ही वाईट नाही.

सोमवार (१४ जानेवारी) रोजी रात्री ७ वाजून ५० मिनिटांनी सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करणार आहे. या मकर संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार (१५ जानेवारी) रोजी सकाळी सूर्योदयापासून सायंकाळी सूर्यास्तापर्यंत आहे. मकर संक्रांतीच्या दिवसात काहीजण अफवा पसरवतात. त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये. मकर संक्रांत ही वाईट नसते. अशुभ नसते. त्यामुळे संक्रांतीला घाबरण्याचे काहीच कारण नाही.

उलट मकर संक्रांत आनंदाने साजरी करावी. कुणाशी मतभेद झाले असतील, कुणाशी भांडण झाले असेल, कुणाशी अबोलाधरला गेला असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी त्या व्यक्तीला तिळगूळ देऊन ‘तिळगूळ घ्या आणि गोड बोला’ असे सांगून मकर संक्रांतीच्या दिवसापासून हितसंबंध सुधारण्यासाठी प्रथम आपल्याकडूनच सुरुवात करावी.

‘इतरांना क्षमा करा आणि झाले गेले विसरून जा.’ अशी शिकवण मकर संक्रांतीचा हा गोड सण आपणा सर्वांना देत असतो, असेही भाष्य सोमण यांनी केले.आपली पंचांगे निरयन राशीचक्रावर आधारलेलीसूर्य जेव्हा सायन मकर राशीत प्रवेश करतो, त्या दिवसापासून दिनमान वाढत जाते. भारतात २१ डिसेंबर पासूनच दिनमान वाढू लागले. आपली पंचांगे सायन राशीचक्रावर आधारलेली नसून निरयन राशीचक्रावर आधारलेली आहेत. १४ जानेवारीला रात्री ७.५० वा. सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याने निरयन मकर राशी प्रवेश जर सूर्यास्तानंतर केला तर मकर संक्रांती पुण्यकाल दुसऱ्या दिवशी मानावा असे सांगण्यात आले आहे. २१ डिसेंबरला आपल्या इथे रात्र मोठी असते व या दिवसापासून दिनमान वाढत जाते. २१ मार्च व २३ सप्टेंबर या दिवशी सूर्य विषुववृत्तावर असल्यामुळे सर्वत्र दिनमान व रात्रीमान समान असते. २१ जूनला आपल्या इथे दिनमान मोठे असते.

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांती