शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
2
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
3
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
4
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
5
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
6
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
7
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
8
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
9
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
10
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
11
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
12
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
13
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
14
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
15
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
16
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
17
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
18
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
19
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
20
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश

सप्टेंबरमध्ये पोलीस दलात मोठे फेरबदल

By admin | Updated: April 17, 2015 01:26 IST

सप्टेंबर महिन्यात राज्याचे पोलिस महासंचालक संजीव दयाळ आणि अरुप पटनायक निवृत्त होत असून राकेश मारिया आणि मीरा बोरवणकर यांची महासंचालकपदांवर वर्णी लागण्याची शक्यता आहे.

अतुल कुलकर्णी - मुंबईसप्टेंबर महिन्यात राज्याचे पोलिस महासंचालक संजीव दयाळ आणि अरुप पटनायक निवृत्त होत असून राकेश मारिया आणि मीरा बोरवणकर यांची महासंचालकपदांवर वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर प्रवीण दीक्षित यांना मुख्य पोलिस महासंचालक पदी बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तपद आणि एसीबीचे महासंचालकपदही रिक्त होईल. त्यामुळे सप्टेंबर अखेरीस वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरबदल अपेक्षित आहेत.शिवाय या महिन्यापासून मार्च २०१६ या अकरा महिन्यात सात वरिष्ठ अधिकारी निवृत्तीच्या वाटेवर असल्याने राज्याच्या पोलीस दलात ज्येष्ठांची मोठी फळी देखील कमी होणार आहे. अतिरिक्त महासंचालक सुरेंद्रकुमार (मे), संजीव दयाळ, अरुप पटनायक (सप्टेंबर), जावेद अहमद (जानेवारी २०१६), विजय कांबळे (फेब्रुवारी) आणि पुण्याचे आयुक्त के.के. पाठक (मार्च) महिन्यात निवृत्त होत आहेत.आजपर्यंत सेवाज्येष्ठतेनुसारच मुख्य पोलिस महासंचालकाची निवड झाली. अपवाद फक्त अनामी रॉय यांचा होता. पण तो ही निर्णय बदलला गेला. सध्या एसीबीचे प्रमुख प्रवीण दीक्षित सेवाज्येष्ठतेच्या यादीत सगळ्यात वर आहेत. त्यामुळे ते आता मुख्य महासंचालक होतील. महासंचालकांची सहा पदे तयार झाल्यामुळे मारिया आणि बोरवणकर रिक्त झालेल्या दोन जागांवर जातील. खरी स्पर्धा मुंबई पोलीस आयुक्तपदासाठी असेल. भाजपाला आपल्या विश्वासातला आणि सेवाज्येष्ठतेच्या निकषात बसणारा आयुक्त पाहिजे. मारिया यांच्यानंतर सध्या प्रतिनियुक्तीवर दिल्लीत इंटीलिजन्स ब्युरोत असणारे दत्ता पडसळगीकर आणि पुण्याचे आयुक्त के. के. पाठक यांचा क्रम आहे. मात्र पडसळगीकर महाराष्ट्रात येण्यास उत्सुक नाहीत. पाठक यांना आत्ताच पुण्याचे आयुक्त केले आहे. शिवाय ते मार्चमध्ये निवृत्त होणार असल्याने त्यांना फक्त सहाच महिने मिळतात. नागपूरचे ट्रॅक रेकॉर्डही त्यांना या वेळी अडचणीचे ठरणारे आहे. त्यानंतर येणारे प्रभात रंजन, व्ही. डी. मिश्रा आणि सूर्यप्रकाश गुप्ता यांचा नंबर असला तरी अतिरिक्त महासंचालकांमधून कुणा एकाची निवड मुंबई पोलीस आयुक्तपदासाठी होऊ शकते. दरम्यान, मे महिन्यात जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांच्या बदल्यांवर दयाळ यांची छाप असेल असे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. च्मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या संभाव्य यादीत संजय बर्वे, हिमांशू रॉय, परमवीर सिंग, सुबोधकुमार जैस्वाल अशी काही अतिरिक्त महासंचालकांची नावे आहेत. च्संजय बर्वे यांचे नाव आदर्शमध्ये अशोक चव्हाण यांच्याशी जोडले गेले होते. तर हिमांशू रॉय यांना एकच वर्षाच्या आत एटीएसवरून दूर केले गेले आहे.