शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

डाक सेवकांना मिळतो केवळ ९० रूपये सायकलभत्ता !

By admin | Updated: October 13, 2016 12:47 IST

शासकीय सुविधांपासून वंचित राहिलेल्या डाक सेवकांना महिन्याकाठी ९0 रुपये वाहनभत्ता देऊन विभागामार्फत त्यांची बोळवण केली जात आहे.

ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. १३ -  ग्रामीण डाक सेवक म्हणजे गावाकडचे पोस्टमन. संख्येने तीन लाखांच्याही वर असणारे गावाकडचे डाक सेवक शहरी पोस्टमनसारखंच, तेवढंच काम करूनही खातेबाह्य कर्मचारी ठरलेले आहेत. शासकीय सुविधांपासून वंचित राहिलेल्या या डाक सेवकांना महिन्याकाठी ९0 रुपये वाहनभत्ता देऊन विभागामार्फत त्यांची बोळवण केली जात आहे. महागाईच्या काळात ‘बायसिकल अलाउन्स’ म्हणून दिला जाणारा हा भत्ता अत्यंत तोकडा असल्याचे मत ग्रामीण डाक सेवक संंघटनेच्या पदाधिकाºयांनी व्यक्त केले. 
भारतीय पोस्ट खाते दीडशे वर्षांहून अधिक पुरातन आहे. आज कुरियरच्या जमान्यातही डाकसेवा ही भारतीयांचा अविभाज्य घटक आहे. भ्रष्टाचाराने बोकाळलेल्या आजच्या वातावरणात अद्यापही भारतीय पोस्ट खातेच सर्वाधिक प्रामाणिक समजले जाते. केंद्र सरकारचे हे खाते भारतात खेडोपाडी पसरलेले व इतर खात्यांहून सर्वाधिक प्रमाणात ग्रामवस्त्यांमधून कार्यरत आहे. बँक, पटवारी, शाळा, पक्के रस्ते अशा सोयी नसतील; पण त्या गावी शाखा ग्रामीण डाकघर आहे, अशी शेकडो, हजारो उदाहरणे आहेत. अशा प्रसारणामुळे संपूर्ण देशात काम करणाºया डाक सेवकांची संख्या आजच्या घटकेला तीन लाखाहून अधिक आहे. पूर्ण वेळ शासकीय कर्मचारी असले तरी, ग्रामीण डाक सेवक विभागाच्या अनेक सवलतींपासून वंचित आहेत. थंडी, पाऊस, उन, वादळ-वारा, दुष्काळ, पूर काहीही असो, खातेबाह्य म्हणून ओळख असलेले सर्व डाक सेवक जनतेची सेवा करीत असतात. भारतीय डाक विभागाचा मूळ कणा असलेल्या डाक सेवकांना विभागाकडून वैद्यकीय मदत आणि गणवेष भत्त्यासह वाहनभत्तादेखील दिला जातो; मात्र महागाईच्या या काळात ‘बायसिकल अलाउन्स’ म्हणून महिन्याकाठी ९0 रुपये देऊन त्यांची बोळवण केली जात आहे. ग्रामीण डाक-सेवकांचा पगार एका वेगळ्याच वैधानिक सूत्राप्रमाणे ठरविला जातो. वैधानिक वेतन आयोगानुसार शासकीय कर्मचाºयांना तासांचे वेतन असेल ते ग्रामीण कर्मचाºयांना मिळत नाही. तेच व तसेच काम करूनही ही परिस्थिती स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अद्यापही कायम असल्याची माहिती अकोला ग्रामीण डाक सेवक संघटनेच्या पदाधिकाºयांनी दिली. देशातील बहुतांश ग्रामीण डाक सेवक अजूनही हलाकीच्या परिस्थितीत जगत आहेत. शहरी डाक सेवकांसारखा पगार तर दूर, साध्या निवृत्तीवेतनाचादेखील लाभ मिळत नसल्याने ग्रामीण डाकसेवकांना केंद्रीय कर्मचाºयांचा दर्जा देण्यात यावा, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण डाक सेवक संघटनेने लावून धरली आहे.