शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

महावितरण: 14 लाख वीज मीटर खराब, 4% भरतात वापरापेक्षा जादा पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 06:45 IST

कारवाईनंतरही नोव्हेंबरमध्ये ६.९ टक्के रीडिंग चुकीचे 

- कमल शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :  राज्यातील १४ लाख ८६ हजार ३११ ग्राहकांचे वीज मीटर ‘फॉल्टी’ (खराब) आहेत. ६.९% रीडिंग सदोष आढळून आले आहेत. तसेच ४ टक्के ग्राहकांना सरासरी बिल पाठवले जात आहे. त्यांना वापरापेक्षा अधिक बिल भरावे लागत आहे. आर्थिक परिस्थिती बिघडल्याचा हवाला महावितरणतर्फे दिला जात असला तरी या प्रकारातून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे दिसून येते.

अचूक मीटर रीडिंगबाबत महावितरणने कठोर भूमिका घेतली. अनेक मीटर रीडिंग एजन्सींना निलंबित करण्यात आले; परंतु त्याचा परिणाम मात्र झाला नाही. नोव्हेंबर महिन्यातसुद्धा ६.९ टक्के रीडिंग चुकीचे आढळून आले. ऑक्टोबरमध्ये ही संख्या ७.२ टक्के होती. जून महिन्यातही इतकीच टक्केवारी होती. राज्यभरात ४ टक्के ग्राहकांना सरासरी बिल दिले जात आहे. 

सरासरी मागील तीन महिन्यांच्या रीडिंगच्या आधारावर निश्चित केली जाते. तो काळ उन्हाळ्याचा होता. त्यामुळे स्वाभाविकपणे हिवाळ्यातही ग्राहकांना अधिक वापराचे बिल भरावे लागत आहे. 

मीटर बदलण्यास सुरुवात : महावितरण महावितरणचे अधिकारी यासंदर्भात काहीही बोलायला तयार नाही. कंपनीतील सूत्रानुसार, कंपनीकडे आता मीटरची टंचाईसुद्धा नाही. त्यामुळे फॉल्टी मीटर बदलण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. कंपनी सरासरी बिल बंद करण्याच्या प्रयत्नात असून, रीडिंगमधील चुकीबाबतही गंभीर आहे. 

तपासाची कूर्मगतीहे मीटर चुकीचे रीडिंग दाखवतात. कंपनीला याची माहिती असूनही केवळ २.२ टक्के म्हणजे ३२,२६९ वीज मीटरचाच आढावा घेण्यात आला. तपासात केवळ २,८५९ मीटर व्यवस्थित आढळून आले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज