शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

राज्यातील महाविकास आघाडीने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला : चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2020 21:52 IST

राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा विषय व्यवस्थित मांडता आला नाही.

ठळक मुद्देपिंपरीत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

पिंपरी : मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयात व्यवस्थित मांडता आला नाही. त्यामुळे न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. 

पिंपरी येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ‘‘काँग्रेसच्या नेत्यांना सुरवातीपासूनच मराठा आरक्षण मान्य नव्हते. त्यामुळेच त्यांनी १५ वर्षांच्या सत्ताकाळात आरक्षण दिले नाही. मागासवर्गीय आयोगाने २७ पानांचा अहवाल दिला होता. या अहवाला आधारे उच्च न्यायालयाने आरक्षणाला मान्यता दिली. मात्र, आयोगाचा हा अहवाल राज्य सरकारचे वकील सर्वोच्च न्यायालयात व्यवस्थित मांडू शकले नाहीत. वकील दिशाहीन होते. इंदिरा सहानी प्रकरणात असाधारण परिस्थितीत ५० टक्केहून अधिक आरक्षण देण्यात आले. मात्र, ही बाजू शासनाला मांडता न आल्याने आरक्षणाला स्थगिती देण्यात आली, असे पाटील यांनी सांगितले.  --------------आरडाओरडा, धाकधपटशाही काय कामांची... उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काम न केल्यास बदलीचा इशारा शुक्रवारी दिला होता. याविषयी पाटील म्हणाले,  ‘‘ केवळ धाकधपटशाही व आरडाओरडा करून माणस काम करीत नाहीत. त्यांच्या अडचणी समजून घेऊन प्रेमानेही कामे करता येतात. प्रत्येकाची कामाची पध्दत वेगळी असते. अजित पवार यांनी आठवड्यातून एक दिवस पुण्यात येऊन धाक दाखविण्याऐवजी रोज मुंबईहून पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये आले पाहिजे.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaratha Reservationमराठा आरक्षणchandrakant patilचंद्रकांत पाटीलState Governmentराज्य सरकार