शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

महात्मा गांधींची हत्या ही गोडसेंची चूक

By admin | Updated: May 21, 2017 01:58 IST

नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांची हत्या करुन चूक केली, अशा आशयाचे विधान हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रमोद पंडित जोशी यांनी शनिवारी ‘लोकमत’कडे केले.

- लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांची हत्या करुन चूक केली, अशा आशयाचे विधान हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रमोद पंडित जोशी यांनी शनिवारी ‘लोकमत’कडे केले. अखंड भारताच्या विभाजनापासून अनेक समस्यांचे मूळ गांधी नव्हे तर पं. जवाहरलाल नेहरु होते व गोडसे यांना याचे आकलन न झाल्याने त्यांनी मूळावर घाव घातला नाही, असा दावाही जोशी यांनी केला. अखंड भारताचे विभाजन करण्यामागे पं. जवाहरलाल नेहरु यांना गोवळलकर गुरुजींची साथ होती. त्यामुळेच १९४६ ला हिंदू महासभा पराभूत झाली. नेहरु हे सत्तापिपासू होते व म. गांधी यांना पुढे करुन त्यांनी सुभाषचंद्र बोस यांना बाजूला केले. हे त्या वेळच्या पत्रव्यवहारांवरुन स्पष्ट होते, असे जोशी म्हणाले.रत्नागिरीत १९२६ मध्ये स्वा. सावरकर आणि गांधींची भेट झाली तेव्हा सावरकरांनी गांधीजींना ‘महात्मा’ अशी उपाधी दिली. तोपर्यंत त्यांना कोणीही ‘महात्मा’ म्हटले नव्हते. रोलॅक्ट अ‍ॅक्ट हा काळा कायदा आला तेव्हा त्यास विरोध करताना महात्मा गांधी हे १९२० पर्यंत हिंदुमहासभेसोबतच होते, तेव्हा त्यांनी त्या कायद्याविरोधात राष्ट्रीय जनजागरण केले होते. तसेच चंपारण्य आंदोलनाध्येही ते महासभेसोबतच होते, असे जोशी म्हणाले.जवाहरलाल नेहरु यांनी के.आर. दास यांच्या सहकार्याने गांधींवर दबाव आणून त्यांना बाजूला केले व हिंदू महासभेचे प्रमुख विरोधक म्हणून पुढे आणले. गोवळलकर गुरुजींची साथ नेहरुंना नसती तर त्याकाळात काँग्रेस सत्तेत आलीच नसती, असेही जोशी यांचे म्हणणे होते. कल्याणमध्येही नथुरामचे स्मारककल्याणपासून ६ किमी अंतरावर असलेल्या सापाड गावात नथुराम गोडसेंचे स्मारक उभारण्यात येत आहे. एकूण ३ गुंठ्यांच्या जागेत ८ बाय ६ च्या खोलीत गोडसेंची मूर्ती बसवण्यात येणार असून अन्य जागेत गोशाळा, वाचनालय आणि जोशी कुटुंबीयांचे वास्तव्य असेल. यासाठी सुमारे १० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. तो निधी कोणाकडूनही जमा करणार नाही. गोडसेंची ३ टन वजनाची मूर्ती राजस्थानमधील किसनगढ येथे तयार होत असून केवळ दळणवळणाच्या काही अडचणी आहेत, त्या मार्गी लागल्या की, वर्षभरात हे स्मारक पूर्ण होईल, असे जोशी म्हणाले. देशभरात गोडसेंची सध्या दोन ठिकाणी स्मारके असून एक दिल्लीत, तर दुसरे मेरठ येथे आहे. आता हे तिसरे सापडमध्ये असेल असा दावा जोशी यांनी केला.