शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधींची हत्या ही गोडसेंची चूक

By admin | Updated: May 21, 2017 01:58 IST

नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांची हत्या करुन चूक केली, अशा आशयाचे विधान हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रमोद पंडित जोशी यांनी शनिवारी ‘लोकमत’कडे केले.

- लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांची हत्या करुन चूक केली, अशा आशयाचे विधान हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रमोद पंडित जोशी यांनी शनिवारी ‘लोकमत’कडे केले. अखंड भारताच्या विभाजनापासून अनेक समस्यांचे मूळ गांधी नव्हे तर पं. जवाहरलाल नेहरु होते व गोडसे यांना याचे आकलन न झाल्याने त्यांनी मूळावर घाव घातला नाही, असा दावाही जोशी यांनी केला. अखंड भारताचे विभाजन करण्यामागे पं. जवाहरलाल नेहरु यांना गोवळलकर गुरुजींची साथ होती. त्यामुळेच १९४६ ला हिंदू महासभा पराभूत झाली. नेहरु हे सत्तापिपासू होते व म. गांधी यांना पुढे करुन त्यांनी सुभाषचंद्र बोस यांना बाजूला केले. हे त्या वेळच्या पत्रव्यवहारांवरुन स्पष्ट होते, असे जोशी म्हणाले.रत्नागिरीत १९२६ मध्ये स्वा. सावरकर आणि गांधींची भेट झाली तेव्हा सावरकरांनी गांधीजींना ‘महात्मा’ अशी उपाधी दिली. तोपर्यंत त्यांना कोणीही ‘महात्मा’ म्हटले नव्हते. रोलॅक्ट अ‍ॅक्ट हा काळा कायदा आला तेव्हा त्यास विरोध करताना महात्मा गांधी हे १९२० पर्यंत हिंदुमहासभेसोबतच होते, तेव्हा त्यांनी त्या कायद्याविरोधात राष्ट्रीय जनजागरण केले होते. तसेच चंपारण्य आंदोलनाध्येही ते महासभेसोबतच होते, असे जोशी म्हणाले.जवाहरलाल नेहरु यांनी के.आर. दास यांच्या सहकार्याने गांधींवर दबाव आणून त्यांना बाजूला केले व हिंदू महासभेचे प्रमुख विरोधक म्हणून पुढे आणले. गोवळलकर गुरुजींची साथ नेहरुंना नसती तर त्याकाळात काँग्रेस सत्तेत आलीच नसती, असेही जोशी यांचे म्हणणे होते. कल्याणमध्येही नथुरामचे स्मारककल्याणपासून ६ किमी अंतरावर असलेल्या सापाड गावात नथुराम गोडसेंचे स्मारक उभारण्यात येत आहे. एकूण ३ गुंठ्यांच्या जागेत ८ बाय ६ च्या खोलीत गोडसेंची मूर्ती बसवण्यात येणार असून अन्य जागेत गोशाळा, वाचनालय आणि जोशी कुटुंबीयांचे वास्तव्य असेल. यासाठी सुमारे १० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. तो निधी कोणाकडूनही जमा करणार नाही. गोडसेंची ३ टन वजनाची मूर्ती राजस्थानमधील किसनगढ येथे तयार होत असून केवळ दळणवळणाच्या काही अडचणी आहेत, त्या मार्गी लागल्या की, वर्षभरात हे स्मारक पूर्ण होईल, असे जोशी म्हणाले. देशभरात गोडसेंची सध्या दोन ठिकाणी स्मारके असून एक दिल्लीत, तर दुसरे मेरठ येथे आहे. आता हे तिसरे सापडमध्ये असेल असा दावा जोशी यांनी केला.