शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
2
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
3
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
6
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
7
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
8
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
9
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
10
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
11
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
12
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
13
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
14
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
15
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
16
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
17
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
18
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
19
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
20
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?

आघाडीच्या दरोडेखोरांनी महाराष्ट्र लुटला : फडणवीस

By admin | Updated: October 10, 2014 22:55 IST

पंधरा वर्षात महाराष्ट्रामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पांढरपेशा दरोडेखोरांनी दरोडा

दापोली: गेल्या पंधरा वर्षात महाराष्ट्रामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पांढरपेशा दरोडेखोरांनी दरोडा घातला आहे. येथील शेतकरी कर्जाच्या खाईत अडकला आहे. देशात सीमेवर शत्रूबरोबर युद्ध करताना किंवा आतंकवादाने जेवढी माणसे मारली गेली नसतील त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक म्हणजे तब्बल ६० हजार शेतकऱ्यांनी केवळ महाराष्ट्रात आत्महत्या केल्या. राज्यातील जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी ७० हजार कोटी रुपयांचे राज्य शासनाने कर्ज घेतले. मात्र, एक टक्काही क्षेत्र सिंचनाखाली आले नाही. हा सारा पैसा या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या दरोडेखोरांनी लुटल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केले.राज्यावर सध्या ३ लाख कोटी रुपयांचे कर्ज असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली. राज्यातील प्रत्येक दिवशी जन्माला येणारे नवजात अर्भकही २७ हजार रुपयांचे कर्ज घेऊनच जन्माला येत असल्याचे ते म्हणाले, एवढे कर्ज घेवूनही राज्याच्या तिजोरीत फक्त उंदीर फिरतात. या सर्व पैशांची राष्ट्रवादी व काँग्रेसच्या दरोडेखांरानी विल्हेवाट लावली आहे असा आरोप त्यांनी केला.महाराश्ट्रात युवाशक्ती मजबूत आहे. राज्याचे सरासरी आर्युमान २७ वर्षांचे आहे. यात गेल्या १५ वर्षात्र येईल. युवकाला बेरोजगारीच्या खाईत लोटण्याचे काम आघाडी शासनाने केले असल्याचा आरोप करत फडणवीस पुढे म्हणाले की, राज्यामध्ये रोजगार आहे. मात्र प्रशिक्षित उमेदवारांची कमी असल्याने बेरोजगारी वाढली आहे. विद्यमान शिक्षण प्दधतीने केवळ कारकून निर्माण करण्याचेच काम केले. पदवीधर असलेल्या आताच्या युवकाला साधी चपराशाची नोकरीही मिळत नाही. शिक्षणाचेही खाजगीकरण नि व्यापारीकरण होते आहे. युवकांच्या शक्तीला जर मानव संसाधनेत परावर्तीत केले तर राजयाची परिस्थिती नक्कीच बदलू शकते. यासाठी भाजपच्यावतीने तब्बल २ कोटी नवयुवकांना प्रशिक्षित करण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याची माहितीही आ.फडणवीस यांनी दिली.या सभेमध्ये मंडणगडचे भाजपचे तालुकाध्यक्ष सचिन थोरे, खेडचे तालुकाध्यक्ष संजय बुटाला, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिायचे सरचिटणीस अजित तांबे, अर्चना येलवे, राहुल जाधव यांची भाषणे झाली.(प्रतिनिधी)