शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

आघाडीच्या दरोडेखोरांनी महाराष्ट्र लुटला : फडणवीस

By admin | Updated: October 10, 2014 22:55 IST

पंधरा वर्षात महाराष्ट्रामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पांढरपेशा दरोडेखोरांनी दरोडा

दापोली: गेल्या पंधरा वर्षात महाराष्ट्रामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पांढरपेशा दरोडेखोरांनी दरोडा घातला आहे. येथील शेतकरी कर्जाच्या खाईत अडकला आहे. देशात सीमेवर शत्रूबरोबर युद्ध करताना किंवा आतंकवादाने जेवढी माणसे मारली गेली नसतील त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक म्हणजे तब्बल ६० हजार शेतकऱ्यांनी केवळ महाराष्ट्रात आत्महत्या केल्या. राज्यातील जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी ७० हजार कोटी रुपयांचे राज्य शासनाने कर्ज घेतले. मात्र, एक टक्काही क्षेत्र सिंचनाखाली आले नाही. हा सारा पैसा या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या दरोडेखोरांनी लुटल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केले.राज्यावर सध्या ३ लाख कोटी रुपयांचे कर्ज असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली. राज्यातील प्रत्येक दिवशी जन्माला येणारे नवजात अर्भकही २७ हजार रुपयांचे कर्ज घेऊनच जन्माला येत असल्याचे ते म्हणाले, एवढे कर्ज घेवूनही राज्याच्या तिजोरीत फक्त उंदीर फिरतात. या सर्व पैशांची राष्ट्रवादी व काँग्रेसच्या दरोडेखांरानी विल्हेवाट लावली आहे असा आरोप त्यांनी केला.महाराश्ट्रात युवाशक्ती मजबूत आहे. राज्याचे सरासरी आर्युमान २७ वर्षांचे आहे. यात गेल्या १५ वर्षात्र येईल. युवकाला बेरोजगारीच्या खाईत लोटण्याचे काम आघाडी शासनाने केले असल्याचा आरोप करत फडणवीस पुढे म्हणाले की, राज्यामध्ये रोजगार आहे. मात्र प्रशिक्षित उमेदवारांची कमी असल्याने बेरोजगारी वाढली आहे. विद्यमान शिक्षण प्दधतीने केवळ कारकून निर्माण करण्याचेच काम केले. पदवीधर असलेल्या आताच्या युवकाला साधी चपराशाची नोकरीही मिळत नाही. शिक्षणाचेही खाजगीकरण नि व्यापारीकरण होते आहे. युवकांच्या शक्तीला जर मानव संसाधनेत परावर्तीत केले तर राजयाची परिस्थिती नक्कीच बदलू शकते. यासाठी भाजपच्यावतीने तब्बल २ कोटी नवयुवकांना प्रशिक्षित करण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याची माहितीही आ.फडणवीस यांनी दिली.या सभेमध्ये मंडणगडचे भाजपचे तालुकाध्यक्ष सचिन थोरे, खेडचे तालुकाध्यक्ष संजय बुटाला, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिायचे सरचिटणीस अजित तांबे, अर्चना येलवे, राहुल जाधव यांची भाषणे झाली.(प्रतिनिधी)