शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

विनाहेल्मेट सुसाट बाईक पळवून मृत्यूमुखी पडणा-यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 10:34 IST

विनाहेल्मेट प्रवास केल्याने दिवसाला 28 दुचाकीस्वारांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

ठळक मुद्देविनाहेल्मेट प्रवास केल्याने दिवसाला 28 दुचाकीस्वारांचा मृत्यूसीटबेल्ट न वापरल्याने दिवसाला 15 वाहनचालकांचा अपघाती मृत्यू दुचाकीस्वारांच्या मृत्यूचा एकूण आकडा 10,135 आहे

नवी दिल्ली, दि. 14 - भारतामध्ये अपघाती मृत्यूंचा वाढणारा आकडा चिंतेचा विषय असून यासाठी नियमांचं होणारं उल्लंघनच अनेकदा कारणीभूत ठरतं असल्याचं समोर येत आहे. विनाहेल्मेट प्रवास केल्याने दिवसाला 28 दुचाकीस्वारांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकीकडे दुचाकीस्वारांचा हा आकडा धक्कादायक असताना, चारचाकी वाहनचालकही बेजबाबदापणे वाहन चालवत असल्याचं समोर येत आहे. सीटबेल्ट न वापरल्याने दिवसाला 15 वाहनचालकांचा अपघाती मृत्यू होत आहे. राज्यांनी वाहतूक मंत्रालयाशी शेअर केलेल्या माहितीमधून हा आकडा समोर आला आहे. 

2017 वर्ष अपघाताचं वर्ष ठरलं आहे असं म्हटलं तरं वावगं ठरणार नाही. यावर्षी 100 अपघातांमधील 31 जणांचा मृत्यू झाला आहे. 2005 मध्ये हा आकडा 21.6 होता, तर 2015 मध्ये 29 होता. 

राज्यांच्या पोलीस आणि वाहतूक विभागाने हेल्मेटचा वापर न केल्याने झालेल्या मृत्यूंची माहिती गोळा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. राज्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दर पाच अपघातांमधील एका दुचाकीस्वाराचा मृत्यू होत आहे. दुचाकीस्वारांच्या मृत्यूचा एकूण आकडा 10,135 आहे. यामध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर (3818) असून त्यानंतर अनुक्रमे तामिळनाडू (3818) आणि महाराष्ट्राचा (1113) क्रमांक आहे.

गतवर्षी संयुक्त राष्ट्राने केलेल्या सर्वेक्षणानुसार, दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर केल्यास त्यांच्या वाचण्याची शक्यता 42 टक्क्यांनी वाढते. राज्यांनी सीटबेल्ट न वापरल्याने झालेल्या अपघाती मृतांचा आकडाही दिला आहे. यानुसार 2016 मध्ये एकूण 2638 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील अपघाती मृतांची संख्या सर्वात जास्त असून एकूण 2741 जणांनी आपला जीव गमावला आहे. 

हे आकडे धक्कादायक असले तरी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्वच अपघातांची यामध्ये नोंद झाली असावी याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे हे कागदावरील आकडे असले, तरी वस्तुस्थितीत हा आकडा खूप मोठा असू शकतो. 

2016 मध्ये एकूण 1.51 लाख रस्ते अपघात झाले आहेत. 2015 मध्ये हा आकडा 1.46 लाख इतका होता. मृत्यूमुखी पडणा-यांमध्ये 18-45 वयोगटातील व्यक्तींची संख्या जास्त आहे. गतवर्षी रस्ते अपघातावर बोलताना केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आणीबाणीची परिस्थिती असल्याचं सांगितलं होतं.