शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

विनाहेल्मेट सुसाट बाईक पळवून मृत्यूमुखी पडणा-यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 10:34 IST

विनाहेल्मेट प्रवास केल्याने दिवसाला 28 दुचाकीस्वारांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

ठळक मुद्देविनाहेल्मेट प्रवास केल्याने दिवसाला 28 दुचाकीस्वारांचा मृत्यूसीटबेल्ट न वापरल्याने दिवसाला 15 वाहनचालकांचा अपघाती मृत्यू दुचाकीस्वारांच्या मृत्यूचा एकूण आकडा 10,135 आहे

नवी दिल्ली, दि. 14 - भारतामध्ये अपघाती मृत्यूंचा वाढणारा आकडा चिंतेचा विषय असून यासाठी नियमांचं होणारं उल्लंघनच अनेकदा कारणीभूत ठरतं असल्याचं समोर येत आहे. विनाहेल्मेट प्रवास केल्याने दिवसाला 28 दुचाकीस्वारांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकीकडे दुचाकीस्वारांचा हा आकडा धक्कादायक असताना, चारचाकी वाहनचालकही बेजबाबदापणे वाहन चालवत असल्याचं समोर येत आहे. सीटबेल्ट न वापरल्याने दिवसाला 15 वाहनचालकांचा अपघाती मृत्यू होत आहे. राज्यांनी वाहतूक मंत्रालयाशी शेअर केलेल्या माहितीमधून हा आकडा समोर आला आहे. 

2017 वर्ष अपघाताचं वर्ष ठरलं आहे असं म्हटलं तरं वावगं ठरणार नाही. यावर्षी 100 अपघातांमधील 31 जणांचा मृत्यू झाला आहे. 2005 मध्ये हा आकडा 21.6 होता, तर 2015 मध्ये 29 होता. 

राज्यांच्या पोलीस आणि वाहतूक विभागाने हेल्मेटचा वापर न केल्याने झालेल्या मृत्यूंची माहिती गोळा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. राज्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दर पाच अपघातांमधील एका दुचाकीस्वाराचा मृत्यू होत आहे. दुचाकीस्वारांच्या मृत्यूचा एकूण आकडा 10,135 आहे. यामध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर (3818) असून त्यानंतर अनुक्रमे तामिळनाडू (3818) आणि महाराष्ट्राचा (1113) क्रमांक आहे.

गतवर्षी संयुक्त राष्ट्राने केलेल्या सर्वेक्षणानुसार, दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर केल्यास त्यांच्या वाचण्याची शक्यता 42 टक्क्यांनी वाढते. राज्यांनी सीटबेल्ट न वापरल्याने झालेल्या अपघाती मृतांचा आकडाही दिला आहे. यानुसार 2016 मध्ये एकूण 2638 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील अपघाती मृतांची संख्या सर्वात जास्त असून एकूण 2741 जणांनी आपला जीव गमावला आहे. 

हे आकडे धक्कादायक असले तरी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्वच अपघातांची यामध्ये नोंद झाली असावी याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे हे कागदावरील आकडे असले, तरी वस्तुस्थितीत हा आकडा खूप मोठा असू शकतो. 

2016 मध्ये एकूण 1.51 लाख रस्ते अपघात झाले आहेत. 2015 मध्ये हा आकडा 1.46 लाख इतका होता. मृत्यूमुखी पडणा-यांमध्ये 18-45 वयोगटातील व्यक्तींची संख्या जास्त आहे. गतवर्षी रस्ते अपघातावर बोलताना केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आणीबाणीची परिस्थिती असल्याचं सांगितलं होतं.