शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

विनाहेल्मेट सुसाट बाईक पळवून मृत्यूमुखी पडणा-यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 10:34 IST

विनाहेल्मेट प्रवास केल्याने दिवसाला 28 दुचाकीस्वारांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

ठळक मुद्देविनाहेल्मेट प्रवास केल्याने दिवसाला 28 दुचाकीस्वारांचा मृत्यूसीटबेल्ट न वापरल्याने दिवसाला 15 वाहनचालकांचा अपघाती मृत्यू दुचाकीस्वारांच्या मृत्यूचा एकूण आकडा 10,135 आहे

नवी दिल्ली, दि. 14 - भारतामध्ये अपघाती मृत्यूंचा वाढणारा आकडा चिंतेचा विषय असून यासाठी नियमांचं होणारं उल्लंघनच अनेकदा कारणीभूत ठरतं असल्याचं समोर येत आहे. विनाहेल्मेट प्रवास केल्याने दिवसाला 28 दुचाकीस्वारांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकीकडे दुचाकीस्वारांचा हा आकडा धक्कादायक असताना, चारचाकी वाहनचालकही बेजबाबदापणे वाहन चालवत असल्याचं समोर येत आहे. सीटबेल्ट न वापरल्याने दिवसाला 15 वाहनचालकांचा अपघाती मृत्यू होत आहे. राज्यांनी वाहतूक मंत्रालयाशी शेअर केलेल्या माहितीमधून हा आकडा समोर आला आहे. 

2017 वर्ष अपघाताचं वर्ष ठरलं आहे असं म्हटलं तरं वावगं ठरणार नाही. यावर्षी 100 अपघातांमधील 31 जणांचा मृत्यू झाला आहे. 2005 मध्ये हा आकडा 21.6 होता, तर 2015 मध्ये 29 होता. 

राज्यांच्या पोलीस आणि वाहतूक विभागाने हेल्मेटचा वापर न केल्याने झालेल्या मृत्यूंची माहिती गोळा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. राज्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दर पाच अपघातांमधील एका दुचाकीस्वाराचा मृत्यू होत आहे. दुचाकीस्वारांच्या मृत्यूचा एकूण आकडा 10,135 आहे. यामध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर (3818) असून त्यानंतर अनुक्रमे तामिळनाडू (3818) आणि महाराष्ट्राचा (1113) क्रमांक आहे.

गतवर्षी संयुक्त राष्ट्राने केलेल्या सर्वेक्षणानुसार, दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर केल्यास त्यांच्या वाचण्याची शक्यता 42 टक्क्यांनी वाढते. राज्यांनी सीटबेल्ट न वापरल्याने झालेल्या अपघाती मृतांचा आकडाही दिला आहे. यानुसार 2016 मध्ये एकूण 2638 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील अपघाती मृतांची संख्या सर्वात जास्त असून एकूण 2741 जणांनी आपला जीव गमावला आहे. 

हे आकडे धक्कादायक असले तरी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्वच अपघातांची यामध्ये नोंद झाली असावी याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे हे कागदावरील आकडे असले, तरी वस्तुस्थितीत हा आकडा खूप मोठा असू शकतो. 

2016 मध्ये एकूण 1.51 लाख रस्ते अपघात झाले आहेत. 2015 मध्ये हा आकडा 1.46 लाख इतका होता. मृत्यूमुखी पडणा-यांमध्ये 18-45 वयोगटातील व्यक्तींची संख्या जास्त आहे. गतवर्षी रस्ते अपघातावर बोलताना केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आणीबाणीची परिस्थिती असल्याचं सांगितलं होतं.