शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

हप्त्यातून मिळालेल्या पैशातूनच महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष फोडून सत्ता स्थापन : राहुल गांधी

By अजित मांडके | Updated: March 16, 2024 14:07 IST

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही शनिवारी ठाण्यात आली होती. यावेळी जांभळी नाका येथे झालेल्या सभेत गाडीवरून त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोना काळात वॅक्सिंग बनवणाऱ्या कंपन्यांकडून नरेंद्र मोदी यांनी करोडो रुपये हप्त्याच्या स्वरूपात घेतले असा घनगती आरोप राहुल गांधी यांनी ठाण्यातल्या चिंतामणी चौकातील सभेत करत या हप्त्यातून मिळालेल्या पैशातूनच राज्य सरकार पाडत महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष फोडून सत्ता स्थापन केली असा आरोप देखील राहुल गांधी यांनी ठाण्यात केला.

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही शनिवारी ठाण्यात आली होती. यावेळी जांभळी नाका येथे झालेल्या सभेत गाडीवरून त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. भाजप आणि आरएसएस हे व्यक्ती व्यक्तीमध्ये द्वेष पसरवण्याचे काम करत आहे. असा आरोप त्यांनी केला. मी एक वर्षांपूर्वी भारत जोडो यात्रा केली होती. ही देशाला  जोडणारी यात्रा होती. मात्र भाजपा आणि  आर एस एस चे लोक देशातील नागरिकांमध्ये  एकमेकांशी भांडण लावण्याचे काम करत आहे. असा आरोप राहुल गांधी यांनी केला. हे दोघे मिळून २४ तास देशाला कमजोर करत आहेत. असा असा आरोप ही गांधी यांनी त्यांच्या भाषणातून केला. इलेक्टरॉल बॉण्ड च्या माध्यमातून भाजपला कंपन्या करोडो रुपये देते असे ते म्हणाले. आधी  कंपन्यावर केंद्र सरकार ईडी इन्कम टॅक्स यांना मागे लावते. त्यानंतर या कंपन्यांनी भाजप पक्षाच्या खात्यात पैसे दिल्यावर मग चोकशी थंड होते. काही लोकांना मोठे कंत्राट दिले जाते. ते देण्यापूर्वी जे लोक हे कंत्राट मिळवण्यासाठी रांगेत असतात ते  पैसे देतात. मग त्यांना कंत्राट मिळते असा दावा त्यांनी केला.

नरेंद्र मोदींनी इलेक्टरॉल बॉण्ड च्या माध्यमातून सामान्य जनतेचा पैसा घेतला आहे. प्रभू के गुण गायो आधी रोटी खायो ओर मर जाओ. असा टोला ही त्यांनी लगावला. जनतेचे पैसे २४ तास मोदी लुटत आहे. नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तराचे खंडणी सत्र सुरु केले आहे. हिंदुस्थान मध्ये ५० लाख करोनाने मेले. पण हे लोकांना माहिती नाही. जेव्हा कोरोनाने लोकांचे मृतदेह साचत होते. तेव्हा व्हॅक्सीन वाली कंपनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि त्यांच्या पक्षाला पैसे देत होते असा गंभीर आरोपही त्यांनी केला. एकीकडे जनता थाळ्या वाजवत होते आणि दुसरीकडे पंतप्रधान मोदी हे पैसे काढत होते. मात्र याबाबत जे बोलतात त्यांच्या मागे अमित शहा ईडी इन्कम टॅक्स ची चोकशी लावतात. आज जे आमदार भाजपत पळाले या सर्वांना नरेंद्र मोदींनी पैसे देऊन फिट केले. हे लोक हफ्ते घेतात आणि सरकार तोडतात. महाराष्ट्र गोवात त्यांनी हेच केले. असा आरोप राहुल गांधी यांनी केला. आयोध्येत उभ राहिलेल्या राम मंदिराच्या उदघाट्नाला  एकही गरीब व्यक्ती उपस्थितीत नव्हता. देशाच्या राष्ट्र्पतीना ही त्यांनी सांगितले की उदघाटनाला तुम्ही येऊ शकत नाही. फक्त दोन ते तीन टक्के लोकांना या मंदिराच्या उदघाटनाचे आमंत्रण होते.

आज अदानी म्हणजेच नरेंद्र मोदी आहे आणि मोदी म्हणजे अदानी अशी टीकाही त्यांनी केली.  नफरत के इस बाजार मे आप लोगो ने मोहब्बत की दुकान खोली. असे सांगत राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणाचे शेवट केला. यावेळी त्यांच्यासोबत गाडीत ठाण्याचे खासदार राजन विचारे, कळवा मुंब्रा मतदारसंघांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आदी उपस्थितीत होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेस