शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
2
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
3
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
4
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
5
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
6
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
7
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
8
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
9
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
10
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
11
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
12
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
14
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
15
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
16
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
17
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
18
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
19
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
20
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल

हप्त्यातून मिळालेल्या पैशातूनच महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष फोडून सत्ता स्थापन : राहुल गांधी

By अजित मांडके | Updated: March 16, 2024 14:07 IST

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही शनिवारी ठाण्यात आली होती. यावेळी जांभळी नाका येथे झालेल्या सभेत गाडीवरून त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोना काळात वॅक्सिंग बनवणाऱ्या कंपन्यांकडून नरेंद्र मोदी यांनी करोडो रुपये हप्त्याच्या स्वरूपात घेतले असा घनगती आरोप राहुल गांधी यांनी ठाण्यातल्या चिंतामणी चौकातील सभेत करत या हप्त्यातून मिळालेल्या पैशातूनच राज्य सरकार पाडत महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष फोडून सत्ता स्थापन केली असा आरोप देखील राहुल गांधी यांनी ठाण्यात केला.

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही शनिवारी ठाण्यात आली होती. यावेळी जांभळी नाका येथे झालेल्या सभेत गाडीवरून त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. भाजप आणि आरएसएस हे व्यक्ती व्यक्तीमध्ये द्वेष पसरवण्याचे काम करत आहे. असा आरोप त्यांनी केला. मी एक वर्षांपूर्वी भारत जोडो यात्रा केली होती. ही देशाला  जोडणारी यात्रा होती. मात्र भाजपा आणि  आर एस एस चे लोक देशातील नागरिकांमध्ये  एकमेकांशी भांडण लावण्याचे काम करत आहे. असा आरोप राहुल गांधी यांनी केला. हे दोघे मिळून २४ तास देशाला कमजोर करत आहेत. असा असा आरोप ही गांधी यांनी त्यांच्या भाषणातून केला. इलेक्टरॉल बॉण्ड च्या माध्यमातून भाजपला कंपन्या करोडो रुपये देते असे ते म्हणाले. आधी  कंपन्यावर केंद्र सरकार ईडी इन्कम टॅक्स यांना मागे लावते. त्यानंतर या कंपन्यांनी भाजप पक्षाच्या खात्यात पैसे दिल्यावर मग चोकशी थंड होते. काही लोकांना मोठे कंत्राट दिले जाते. ते देण्यापूर्वी जे लोक हे कंत्राट मिळवण्यासाठी रांगेत असतात ते  पैसे देतात. मग त्यांना कंत्राट मिळते असा दावा त्यांनी केला.

नरेंद्र मोदींनी इलेक्टरॉल बॉण्ड च्या माध्यमातून सामान्य जनतेचा पैसा घेतला आहे. प्रभू के गुण गायो आधी रोटी खायो ओर मर जाओ. असा टोला ही त्यांनी लगावला. जनतेचे पैसे २४ तास मोदी लुटत आहे. नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तराचे खंडणी सत्र सुरु केले आहे. हिंदुस्थान मध्ये ५० लाख करोनाने मेले. पण हे लोकांना माहिती नाही. जेव्हा कोरोनाने लोकांचे मृतदेह साचत होते. तेव्हा व्हॅक्सीन वाली कंपनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि त्यांच्या पक्षाला पैसे देत होते असा गंभीर आरोपही त्यांनी केला. एकीकडे जनता थाळ्या वाजवत होते आणि दुसरीकडे पंतप्रधान मोदी हे पैसे काढत होते. मात्र याबाबत जे बोलतात त्यांच्या मागे अमित शहा ईडी इन्कम टॅक्स ची चोकशी लावतात. आज जे आमदार भाजपत पळाले या सर्वांना नरेंद्र मोदींनी पैसे देऊन फिट केले. हे लोक हफ्ते घेतात आणि सरकार तोडतात. महाराष्ट्र गोवात त्यांनी हेच केले. असा आरोप राहुल गांधी यांनी केला. आयोध्येत उभ राहिलेल्या राम मंदिराच्या उदघाट्नाला  एकही गरीब व्यक्ती उपस्थितीत नव्हता. देशाच्या राष्ट्र्पतीना ही त्यांनी सांगितले की उदघाटनाला तुम्ही येऊ शकत नाही. फक्त दोन ते तीन टक्के लोकांना या मंदिराच्या उदघाटनाचे आमंत्रण होते.

आज अदानी म्हणजेच नरेंद्र मोदी आहे आणि मोदी म्हणजे अदानी अशी टीकाही त्यांनी केली.  नफरत के इस बाजार मे आप लोगो ने मोहब्बत की दुकान खोली. असे सांगत राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणाचे शेवट केला. यावेळी त्यांच्यासोबत गाडीत ठाण्याचे खासदार राजन विचारे, कळवा मुंब्रा मतदारसंघांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आदी उपस्थितीत होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेस