शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
6
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
7
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
8
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
9
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
10
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
11
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
12
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
13
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
14
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
15
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
16
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
17
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
18
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
19
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
20
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...

हप्त्यातून मिळालेल्या पैशातूनच महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष फोडून सत्ता स्थापन : राहुल गांधी

By अजित मांडके | Updated: March 16, 2024 14:07 IST

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही शनिवारी ठाण्यात आली होती. यावेळी जांभळी नाका येथे झालेल्या सभेत गाडीवरून त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोना काळात वॅक्सिंग बनवणाऱ्या कंपन्यांकडून नरेंद्र मोदी यांनी करोडो रुपये हप्त्याच्या स्वरूपात घेतले असा घनगती आरोप राहुल गांधी यांनी ठाण्यातल्या चिंतामणी चौकातील सभेत करत या हप्त्यातून मिळालेल्या पैशातूनच राज्य सरकार पाडत महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष फोडून सत्ता स्थापन केली असा आरोप देखील राहुल गांधी यांनी ठाण्यात केला.

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही शनिवारी ठाण्यात आली होती. यावेळी जांभळी नाका येथे झालेल्या सभेत गाडीवरून त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. भाजप आणि आरएसएस हे व्यक्ती व्यक्तीमध्ये द्वेष पसरवण्याचे काम करत आहे. असा आरोप त्यांनी केला. मी एक वर्षांपूर्वी भारत जोडो यात्रा केली होती. ही देशाला  जोडणारी यात्रा होती. मात्र भाजपा आणि  आर एस एस चे लोक देशातील नागरिकांमध्ये  एकमेकांशी भांडण लावण्याचे काम करत आहे. असा आरोप राहुल गांधी यांनी केला. हे दोघे मिळून २४ तास देशाला कमजोर करत आहेत. असा असा आरोप ही गांधी यांनी त्यांच्या भाषणातून केला. इलेक्टरॉल बॉण्ड च्या माध्यमातून भाजपला कंपन्या करोडो रुपये देते असे ते म्हणाले. आधी  कंपन्यावर केंद्र सरकार ईडी इन्कम टॅक्स यांना मागे लावते. त्यानंतर या कंपन्यांनी भाजप पक्षाच्या खात्यात पैसे दिल्यावर मग चोकशी थंड होते. काही लोकांना मोठे कंत्राट दिले जाते. ते देण्यापूर्वी जे लोक हे कंत्राट मिळवण्यासाठी रांगेत असतात ते  पैसे देतात. मग त्यांना कंत्राट मिळते असा दावा त्यांनी केला.

नरेंद्र मोदींनी इलेक्टरॉल बॉण्ड च्या माध्यमातून सामान्य जनतेचा पैसा घेतला आहे. प्रभू के गुण गायो आधी रोटी खायो ओर मर जाओ. असा टोला ही त्यांनी लगावला. जनतेचे पैसे २४ तास मोदी लुटत आहे. नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तराचे खंडणी सत्र सुरु केले आहे. हिंदुस्थान मध्ये ५० लाख करोनाने मेले. पण हे लोकांना माहिती नाही. जेव्हा कोरोनाने लोकांचे मृतदेह साचत होते. तेव्हा व्हॅक्सीन वाली कंपनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि त्यांच्या पक्षाला पैसे देत होते असा गंभीर आरोपही त्यांनी केला. एकीकडे जनता थाळ्या वाजवत होते आणि दुसरीकडे पंतप्रधान मोदी हे पैसे काढत होते. मात्र याबाबत जे बोलतात त्यांच्या मागे अमित शहा ईडी इन्कम टॅक्स ची चोकशी लावतात. आज जे आमदार भाजपत पळाले या सर्वांना नरेंद्र मोदींनी पैसे देऊन फिट केले. हे लोक हफ्ते घेतात आणि सरकार तोडतात. महाराष्ट्र गोवात त्यांनी हेच केले. असा आरोप राहुल गांधी यांनी केला. आयोध्येत उभ राहिलेल्या राम मंदिराच्या उदघाट्नाला  एकही गरीब व्यक्ती उपस्थितीत नव्हता. देशाच्या राष्ट्र्पतीना ही त्यांनी सांगितले की उदघाटनाला तुम्ही येऊ शकत नाही. फक्त दोन ते तीन टक्के लोकांना या मंदिराच्या उदघाटनाचे आमंत्रण होते.

आज अदानी म्हणजेच नरेंद्र मोदी आहे आणि मोदी म्हणजे अदानी अशी टीकाही त्यांनी केली.  नफरत के इस बाजार मे आप लोगो ने मोहब्बत की दुकान खोली. असे सांगत राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणाचे शेवट केला. यावेळी त्यांच्यासोबत गाडीत ठाण्याचे खासदार राजन विचारे, कळवा मुंब्रा मतदारसंघांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आदी उपस्थितीत होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेस