शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

वाढवण बंदरामुळे पुढील ५० वर्ष महाराष्ट्र नंबर वन राहील - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 15:37 IST

Devendra Fadnavis : १९८० च्या दशकात वाढवण बंदर करण्याचे स्वप्न पाहिले गेले होतं. मात्र, ते २०२४ मध्ये प्रत्यक्षात उतरत आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis : पालघर : वाढवण बंदरामुळे (Vadhavan Port) पुढील ५० वर्ष महाराष्ट्र नंबर वन राहील. हे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे होणार आहे. १९८० च्या दशकात वाढवण बंदर करण्याचे स्वप्न पाहिले गेले होतं. मात्र, ते २०२४ मध्ये प्रत्यक्षात उतरत आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. केंद्र सरकारचा महत्वकांक्षी असलेल्या प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते.

मुंबई आणि हा सर्व भाग देशाची आर्थिक राजधानी झाला आहे. कारण मुंबई पोर्ट आणि जेएनपीटी पोर्ट आहे. त्यामुळे आपण नंबर वन ठरलो आहोत. आता त्यापेक्षा तिप्पट मोठं बंदर वाढवणमध्ये होत आहे. या बंदरामुळे पुढील ५० वर्ष महाराष्ट्र नंबर वन राहील. हे फक्त  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे होणार आहे. १९८० च्या दशकात वाढवण बंदर करण्याचे स्वप्न पाहिले गेले होते. पण ते २०२४ मध्ये प्रत्यक्षात उतरत आहे. मोदी यांच्या नेतृत्वात सरकार आले आणि वाढवण बंदर सुरू करण्याच्या कामाला वेग आला, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

याचबरोबर, आता पुढील २०० वर्ष हे बंदर राहील आणि नरेंद्र मोदी यांचे नावही राहील. भारताला पुढे नेण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले आहे. जगातील सर्व एअरपोर्ट रिक्लमेन्शन करून तयार केले आहे, असे वाढवण बंदर पाहून लोक म्हणतील. येत्या काळात मुंबई वाढणार आहे. वसई विरारमध्ये वाढणार आहे. येथील भूमिपुत्रांना नोकरीच्या संधी मिळणार आहेत. आपण बंदराचं रिक्लेमेन्शन करणार आहोत, असे सांगत या ठिकाणी एअरपोर्टचेही रिक्लेमन्शन केले पाहिजे आणि तिसरे विमानतळ झाले तर महाराष्ट्र अधिक पुढे जाईल, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

दरम्यान, केंद्र सरकारचा महत्वकांक्षी असलेल्या प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. या प्रकल्पासाठी तब्बल ७६००० कोटी खर्च करण्यात येणार आहे. या भूमिपूजन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसpalgharपालघरNarendra Modiनरेंद्र मोदी